शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ग्राम पंचायतीकडून जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:31 IST

* लोकमत इफेक्ट उदगाव : चिंचवाड (ता. शिरोळ) येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाचे अधिकारी व ...

* लोकमत इफेक्ट

उदगाव : चिंचवाड (ता. शिरोळ) येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी भेट दिली. ‘लोकमत’ने ‘चिंचवाडात अपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्याचा दाखला’ या मथळ्याखाली रविवारी (दि. ६) वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन चिंचवाड ग्राम पंचायतीने जोरदार हालचाली करीत प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

चिंचवाड येथे तत्कालीन पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या फंडातून जलशुद्धीदीकरण प्रकल्प मंजूर झाला होता. त्याचे काम हायटेक स्विटवॉटर टेक्नॉलॉजी, सुरत यांना देण्यात आले होते. मात्र, ग्राम पंचायतीकडून प्रकल्प सुरू नसताना देखील सुरू असल्याचा दाखला ऑक्टोबर २०२० मध्ये दिला होता. त्याबाबत ‘लोकमत’ने दिलेल्या वृत्ताची दखल घेत यांत्रिकी विभागाचे सुरेश आइंगडे व दिगंबर मालुसरे यांनी या प्रकल्पाला भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे व आप्पासोा कदम यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने प्रकल्प सुरू करण्याच्या मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्या. परंतु मंगळवारी पुन्हा या प्रकल्पाची पाहणी करण्यात येणार असल्याचे ग्राम पंचायतीकडून सांगण्यात आले.

चौकट -

ग्रामस्थांना २ रुपयांत पाणी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होणार असून, दोन रुपयांत वीस लिटर पाणी मिळणार आहे. तसेच त्यासाठी एटीएम कार्डाची सोय करण्यात आली आहे. ज्यांना कार्ड हवे असेल त्यांनी ग्राम पंचायतीशी संपर्क साधावा, असे आवाहन सरपंच ज्योती काटकर यांनी केले.