शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांचे न्याय हक्क जोपासण्याचा प्रयत्न--

By admin | Updated: April 30, 2015 00:28 IST

कामगार आणि मालकांनी सुसंवाद ठेवावा : सुहास कदम

संघटित आणि असंघटित क्षेत्रांतील कामगारांना किमान वेतन, मूलभूत सोयी पुरविण्यासह त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अशा योजनांची जिल्ह्यात झालेली अंमलबजावणी, वेतनवाढ, आदींबाबत कामगार-मालक यांच्यातील दुवा म्हणून कामगार आयुक्त कार्यालयाने निभावलेली भूमिका, मालक आणि कामगार यांच्यासमोरील आव्हाने, आदींबाबत कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर सहायक कामगार आयुक्त सुहास कदम यांच्यासमवेत साधलेला हा थेट संवाद...प्रश्न : घरेलू, बांधकाम कामगारांच्या दृष्टीने काय केले आहे?उत्तर : राज्य शासन बांधकाम कामगारांसाठी विविध स्वरूपांतील १६ योजना महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे राबविते. जिल्ह्यात सर्वाधिक ४१ हजार बांधकाम कामगारांची नोंदणी आहे. शासन राबवीत असलेल्या योजनांपैकी ‘मेडिकेअर’ ही एक महत्त्वाची योजना आहे. त्याअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्च दिला जातो. आॅगस्ट २०१४ अखेर मेडिकेअर योजना सुरू झाली. त्यावर राज्यात १० कोटी खर्च झाले असून, त्यातील सात कोटी रुपये कोल्हापूरवर खर्च झाले आहेत. मंडळाने संबंधित कामगारांना गृहोपयोगी वस्तू खरेदीसाठी तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत जिल्ह्यातील १४३३९ कामगारांना चार कोटी ६८ लाख रुपये वितरित केले आहेत. शैक्षणिक साधनांतर्गत व्यक्तिमत्त्व विकासाच्या आठ पुस्तकांचा समावेश असलेले १३१२९ संच कोल्हापूरसाठी प्राप्त झाले आहेत. त्यापैकी साडेचार हजारांचे वितरण केले आहे. प्रसूती लाभ, शैक्षणिक योजना, आदींच्या माध्यमातून ४५९ लाभार्थ्यांना ४४ लाख २४ हजार ४०० रुपयांचे वितरण केले आहे. घरेलू कामगारांना सन्मानधन, प्रसूती लाभ, आदींद्वारे ४६ लाख रुपयांचे वाटप केले आहे.प्रश्न : औद्योगिक सलोखा, सामंजस्याच्या दृष्टीने काय केले आहे?उत्तर : कामगार आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औद्योगिक सलोखा चांगल्या पद्धतीने राखला आहे. कामगार-मालक यांच्यातील वातावरण सामंजस्य व सौहार्दाचे राहावे, या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. काही प्रसंगी तणाव निर्माण झाल्यास अशा स्थितीत वाटाघाटीने प्रश्न सोडविले आहेत. त्याला कामगार आणि मालकांनी चांगली साथ दिली. कामगारांना त्यांच्या हक्कांसाठी कायदेशीरपणे लढा देण्याच्या पद्धतीबाबत मूलभूत प्रबोधन केले. तसेच मालकांनादेखील कायदेशीर बाबींबाबत मार्गदर्शन केले जाते. त्याचा परिणाम म्हणजे एक-दोन अपवाद वगळता माझ्या कार्यालयाच्या कार्यकक्षेत संप, टाळेबंदीचे प्रकार थांबले आहेत.प्रश्न : कामगिरीच्या तुलनेत कार्यालय राज्यात कोठे आहे?उत्तर : जिल्ह्यात साखर, अभियांत्रिकी, सूतगिरणी, यंत्रमाग, शेती, चर्मोद्योग, आदींमध्ये सुमारे दोन लाख ९३ हजार २२७ कामगार कार्यरत आहेत. कामगारांचे न्याय्य हक्क जोपासण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. बांधकाम कर्मचारी महामंडळ व घरेलू कामगार महामंडळाची अतिरिक्त जबाबदारी आमच्या कार्यालयावर देण्यात आली आहे. कार्यालयातील ५५ टक्के पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे कामांच्या पूर्ततेला विलंब होतो. त्यावर शासनाने आउटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची लवकरच अंमलबजावणी होईल. कामगारांसाठी अग्रक्रमाने अत्यावश्यक कामांचा वेगाने निपटारा करण्यावर आमचा भर आहे. याचे उदाहरण म्हणजे रॅमकी कंपनीकडून कोल्हापूर महापलिकेच्या १०३१ कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यांतर्गत तीन कोटी सात लाखांचा फरक मिळवून दिला. त्याचे वितरण कामगार आयुक्त कार्यालयाने केले. इतक्या प्रमाणात फरक देण्याचा राज्यातील पहिलाच प्रकार होता. विकास आयुक्तालयाचे अतिरिक्त काम असूनदेखील घरेलू व बांधकाम कामगारांची नोंदणी, त्यांना लाभ मिळवून देणे, आदींबाबत कोल्हापूर कार्यालय अव्वल आहे.प्रश्न : कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर काय संदेश द्याल?उत्तर : औद्योगिक शांतता आणि सुव्यवस्थेसाठी या दोन्ही घटकांनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे. त्यांनी एकमेकांमधील विवाद टाळून सुसंवाद साधला पाहिजे. उद्योजकांनी कामगारांना कुटुंबातील एक सदस्य समजून त्यांच्याकडून काम करवून घेतले तर उत्पादनात भर पडेल. आर्थिक व सामाजिक स्वास्थ्य जपण्यासाठी कामगार आणि मालक यांनी बदललेले आंतरराष्ट्रीय धोरण व ग्राहकाभिमुख सेवा यांचा विचार करून कार्यरत राहावे. शिवाय शासनाची बदलती धोरणे, पद्धती लक्षात घ्यावात. जागतिकीकरणामुळे स्पर्धा वाढली असून, उद्योग टिकविणे कठीण बनले आहे. ते कामगारांनी लक्षात घ्यावे. कायद्यांचा अभ्यास करावा. कामगारांनी कार्यक्षमता वाढवून राष्ट्रीय उत्पन्नवाढीला हातभार लावावा.- संतोष मिठारी