शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

बालिंगा उपसा केंद्र सुरू करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:24 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात निर्माण झालेली भीषण पाणी टंचाई दूर करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत आहे. पुराच्या पाण्यात ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात निर्माण झालेली भीषण पाणी टंचाई दूर करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या मोटार बाहेर काढून आवश्यक त्या दुरुस्तीसह बालिंका उपसा केंद्र सुरू करण्यास प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून, सोमवारी रात्रीपर्यंत उपसा केंद्र सुरू करण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, शहराच्या विविध भागात महानगरपालिकेच्या ६० टँकरसह खासगी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून सुमारे १५० टँकरच्या माध्यमातून शहरातील नागरिकांची पाण्याची गरज भागविण्याचे प्रयत्न होत आहेत.

कोल्हापूर महानगरपालिकेकडे रविवारपर्यंत २९ टँकर होते, त्यातून पाणी देण्यात येत होते. सांगली, सातारा, सोलापूर येथून भाड्याने आणलेले टँकर शिरोली फाट्यावर अडकून पडले होते. सोमवारी दुपारी यातील ३५ टँकर महापालिकेच्या सेवेत दाखल झाले. पुणे व मुंबई महानगरपालिकेचे १७ टँकरसुद्धा पोहोचले आहेत. महानगरपालिका अधिकाऱ्यांनी त्याचे प्रत्येक प्रभागनिहाय वाटप सुरू केले आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची जबाबदारी निखिल मोरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सोमवारी प्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी टँकर वाटपचा आढावा घेतला.

भीषण पाणी टंचाईच्या काळात सामाजिक कार्यकर्ते, भावी नगरसेवक नागरिकांच्या मदतीला धावून आले आहेत. कार्यकर्त्यांनी जवळपास साठ ते सत्तर टँकर भाड्याने आणले असून, त्याद्वारे आपापल्या भागात पाणी पुरवठा करीत आहेत. महापालिका प्रशासनास त्याची खूप मदत झाली. टँकरवर पाणी घेण्यासाठी शहरात सर्वत्र गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. नागरिक काही खासगी कुपनलिकेवरूनही पाणी घेत आहेत. रंकाळा तलावातील पाणी घेण्यासाठीही टँकरचालक जात आहेत.

बालिंगा रात्री सुरू होणार?

बालिंगा जलशुद्धीकरणाकडील उपसा केंद्र सोमवारी मध्यरात्री सुरू होण्याची शक्यता आहे. रविवारी पुराच्या पाण्यात जाऊन कर्मचाऱ्यांनी तेथील मोटारी बाहेर आणल्या. शिरोली एमआयडीसीमध्ये त्याची दुरुस्ती रात्रंदिवस करण्यात येत होती. रात्री आठ वाजेपर्यंत मोटारी मिळाल्या की त्या जोडायला घेतल्या जाणार आहेत. मध्यरात्रीपासून हे उपसा केंद्र सुरू होईल, असे हायड्रोलिक अभियंता जयेश कदम यांनी सांगितले. बालिंगा सुरू झाल्यानंतर ए, बी, सी व डी भागात रोज एकदिवस आड पुरेशा दाबाने पुरवठा केला जाऊ शकतो. निम्म्या शहराचा पाणी पुरवठा सुरू झाल्यास टँकरवरील ताणदेखील कमी होऊ शकतो.