शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

बालिंगा उपसा केंद्र सुरू करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:24 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात निर्माण झालेली भीषण पाणी टंचाई दूर करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत आहे. पुराच्या पाण्यात ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात निर्माण झालेली भीषण पाणी टंचाई दूर करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या मोटार बाहेर काढून आवश्यक त्या दुरुस्तीसह बालिंका उपसा केंद्र सुरू करण्यास प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून, सोमवारी रात्रीपर्यंत उपसा केंद्र सुरू करण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, शहराच्या विविध भागात महानगरपालिकेच्या ६० टँकरसह खासगी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून सुमारे १५० टँकरच्या माध्यमातून शहरातील नागरिकांची पाण्याची गरज भागविण्याचे प्रयत्न होत आहेत.

कोल्हापूर महानगरपालिकेकडे रविवारपर्यंत २९ टँकर होते, त्यातून पाणी देण्यात येत होते. सांगली, सातारा, सोलापूर येथून भाड्याने आणलेले टँकर शिरोली फाट्यावर अडकून पडले होते. सोमवारी दुपारी यातील ३५ टँकर महापालिकेच्या सेवेत दाखल झाले. पुणे व मुंबई महानगरपालिकेचे १७ टँकरसुद्धा पोहोचले आहेत. महानगरपालिका अधिकाऱ्यांनी त्याचे प्रत्येक प्रभागनिहाय वाटप सुरू केले आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची जबाबदारी निखिल मोरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सोमवारी प्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी टँकर वाटपचा आढावा घेतला.

भीषण पाणी टंचाईच्या काळात सामाजिक कार्यकर्ते, भावी नगरसेवक नागरिकांच्या मदतीला धावून आले आहेत. कार्यकर्त्यांनी जवळपास साठ ते सत्तर टँकर भाड्याने आणले असून, त्याद्वारे आपापल्या भागात पाणी पुरवठा करीत आहेत. महापालिका प्रशासनास त्याची खूप मदत झाली. टँकरवर पाणी घेण्यासाठी शहरात सर्वत्र गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. नागरिक काही खासगी कुपनलिकेवरूनही पाणी घेत आहेत. रंकाळा तलावातील पाणी घेण्यासाठीही टँकरचालक जात आहेत.

बालिंगा रात्री सुरू होणार?

बालिंगा जलशुद्धीकरणाकडील उपसा केंद्र सोमवारी मध्यरात्री सुरू होण्याची शक्यता आहे. रविवारी पुराच्या पाण्यात जाऊन कर्मचाऱ्यांनी तेथील मोटारी बाहेर आणल्या. शिरोली एमआयडीसीमध्ये त्याची दुरुस्ती रात्रंदिवस करण्यात येत होती. रात्री आठ वाजेपर्यंत मोटारी मिळाल्या की त्या जोडायला घेतल्या जाणार आहेत. मध्यरात्रीपासून हे उपसा केंद्र सुरू होईल, असे हायड्रोलिक अभियंता जयेश कदम यांनी सांगितले. बालिंगा सुरू झाल्यानंतर ए, बी, सी व डी भागात रोज एकदिवस आड पुरेशा दाबाने पुरवठा केला जाऊ शकतो. निम्म्या शहराचा पाणी पुरवठा सुरू झाल्यास टँकरवरील ताणदेखील कमी होऊ शकतो.