शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पेंडाखळेच्या खुरप्यांची ‘धार’च न्यारी

By admin | Updated: March 19, 2017 23:40 IST

महाराष्ट्रातून मागणी : शंभराहून अधिक तरुण व्यवसायात; मशिनरीच्या वापराने पारंपरिक व्यवसायाला आधुनिक लूक-- लोकमत संगे जाणून घेऊ

कोल्हापूर जिल्ह्यास जसा जाज्वल्य इतिहास आहे, तसा या जिल्ह्याचा भूगोलही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या जिल्ह्यात अशी अनेक गावे आहेत, की त्यांचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. ‘लोकमत’ने गतवर्षी जिल्ह्यातील चांगल्या सांस्कृतिक संस्थांची ओळख वर्षभर करून दिली. यावर्षी त्याच मालिकेत ‘लोकमत‘ अशा वेगळ््या वाटेने जाणाऱ्या गावांची महती उलगडून सांगणार आहे. प्रत्येक सोमवारी या सदरात एक न्यारे गाव तुम्हाला भेटायला येईल..राजाराम लोंढे -- कोल्हापूरअस्सल पोलादाचा वापर, धार लावण्याची खासियत व टिकाऊपणा यांमुळे शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखळेच्या खुरप्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अक्षरश: भुरळ घातली आहे. गेल्या साठ-सत्तर वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या खुरप्यांच्या व्यवयायाला सध्या आधुनिक ‘लूक’ आला असून, या व्यवसायामध्ये गावातील शंभराहून अधिक तरुण गुंतले आहेत. उत्तम खुरपी करणारे गाव अशी या गावाची ओळख महाराष्ट्रात रुजली आहे. शाहूवाडी तालुका डोंगरकपारींतच वसला आहे. बाजारभोगावपासून पुढे गेले की, कासारी नदीपलीकडे पेंडाखळे गाव लागते. शाहूवाडी तालुका एका बाजूला पसरलेला आणि दक्षिणेकडे ‘घुंगूरचा कडा’ या डोंगराच्या पायथ्याशी हे छोटे गाव वसले आहे. तसा तालुक्याशी फारसा संपर्क येत नसल्याने कामानिमित्त या गावाला बाजारभोगाव, कोल्हापूरवरच अवलंबून राहावे लागते. गावची लोकसंख्या १७८०. त्यापैकी सुतारवाडीत २० कुटुंबे राहतात. सुतारवाडीत गेल्या ७० वर्षांपासून खुरपी तयार केली जातात. कोल्हापूर, मलकापूर, शिराळा येथून जुन्या बाजारांत चारचाकी गाड्यांचे कमानपाटे खरेदी करायचे आणि त्यापासून खुरपी करण्याचा व्यवसाय सुरू आहे. या पाट्यांचे साडेपाच, सहा, आठ इंचांचे तुकडे करून खुरपी तयार केली जातात. पूर्वी हाताने ओढायच्या भात्यातून पोलादाचे तुकडे गरम करून त्याला घणाने खुरप्याचा आकार दिला जायाचा. त्यामुळे एक खुरपे करण्यास वेळ लागायचा. साधारणता पाटा तोडण्यापासून खुरप्याला लाकडी मुठ बसवून धार लावेपर्यंत (पाणी देणे) आठवड्याला तीस खुरपी व्हायची. दणकट व टिकाऊपणामुळे पेंडाखळेची खुरपी शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली. एकदा खुरपे खरेदी केले की पाच-सहा वर्षे नवीन घ्यावे लागत नसल्याने येथील खुरप्यांना मागणी वाढत गेली. संपूर्ण महाराष्ट्रात ‘पेंडाखळेचे खुरपे’ प्रसिद्ध झाले. आजही या खुरप्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. या व्यवसायात आता तरुण पिढी उतरली असून त्यांनी आधुनिकता आणण्याचा प्रयत्न केला. दिवसभर गरम पोलादाला घण मारत बसण्यापेक्षा येथील तरुणांनी यांत्रिकीकरणाचा आधार घेतला. टाकाऊ स्क्रॅपपासून त्यांनी विद्युत मोटारीवर चालणारा घण तयार केला. त्याचबरोबर हाताने भाता फुलविण्याऐवजी तिथे विद्युत मोटरीच्या साहाय्याने भाता फुलविल्याने पोलाद लवकर तापते. एका युनिटवर तीन तरुण काम करतात. पूर्वी आठवड्याला तीस खुरपी पूर्ण व्हायची; पण आता त्यात गतिमानता आली असून दिवसाला तीस खुरपी केली जातात. कोपार्डे (ता. करवीर) येथील जनावरांच्या आठवडी बाजारात काही सुतारबांधव खुरपी घेऊन विक्रीसाठी जातात; पण बहुतांश खुरप्यांची विक्री ही जाग्यावरूनच विक्री होते. कोल्हापूरसह कऱ्हाड, सांगोला, आटपाडी, पंढरपूर, सांगली, पुणे, नाशिक येथून खुरप्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कसदार पाणीच ‘धारे’ची जादू!कोणत्याही खुरप्याची धार ही त्याला तो कारागीर पाणी कसे देतो त्यावरच अवलंबून असते. येथील सुतार बंधंूना याबाबत विचारले असता, डोंगरकपारीतून येणारे पाणी आम्ही धार देण्यासाठी वापरतो. या पाण्याचा वेगळा गुणधर्म असल्याने खुरप्याचा कितीही व कसाही वापर केला तरी त्याची धार जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पाच वर्षांची गॅरंटीखुरपे वापरणाऱ्या शेतकऱ्याने निसण्यावर रोज चोळणी व्यवस्थित केली तर किमान सहा वर्षे पुन्हा पाणी देण्याची गरज भासत नाही. धारेला खुरपे वाकले तर ते बदलून दिले जाते.पाणी कसे देतात ?४खुरप्याला लाकडी मूठ घातल्यानंतर शेवटची प्रक्रिया म्हणजे पाणी देणे. ही प्रक्रिया अतिशय जागरूकतेने करावी लागते. खुरपे मध्यम गरम करून त्यावर हळूहळू पाणी ओतल्यास तीक्ष्ण अशी धार येते; पण पोलाद जादा गरम झाले तर खुरप्याचे तुकडे पडतात. त्यामुळे खुरप्याला दिलेले तापमान व पाण्याचे प्रमाण यांचा ताळमेळ घालूनच पाणी द्यावे लागते. दृष्टिक्षेपात पेंडाखळेकुटुंबे-२३१लोकसंख्या-१७८०महिलांची संख्या-८२५ग्रामदैवत-विठलाईदेवीएकूण क्षेत्र-२५० हेक्टर (बागायत)व्यवसाय-शेती, दुग्ध व्यवसाय व खुरपी तयार करणेदूध संस्था-२प्रतिदिनी दूध उत्पादन-१ हजार लिटरप्राथमिक शिक्षण-गावातचमाध्यमिक -माळापुडेसाक्षरतेचे प्रमाण-९० टक्केशासकीय नोकरांची संख्या-१ तलाठी, १ वनपाल, १ वनमजूर, १ ग्रामसेवक, २ शिक्षक, २ साखर कामगार.गावातील साक्षरतेचे प्रमाण खूप चांगले असले तरी शेती, दुग्धव्यवसाय व सुतारकामातच अधिक लोक कार्यरत आहेत. ‘खुरप्यांचे गाव’ म्हणून आमची ओळख असली तरी येथील कारागिरांनी आतापर्यंत ही ओळख जिवंत ठेवण्याचे प्रामाणिक काम केले.- सुनीता युवराज पाटील, सरपंच, पेंडाखळेपारंपरिकतेला थोडीशी आधुनिकतेची जोड देऊन व्यवसाय सुरू असला तरी गुणवत्तेबाबत कोठेही तडजोड केली जात नाही. कोळशाच्या तुटवड्यामुळे या व्यवसायात अडचणी निर्माण झाल्या आहेत. - गजानन सुतार, कारागीरआतापर्यंत आम्ही प्रामाणिकपणे हा व्यवसाय टिकवून धरला. आता तरुण मुले यामध्ये उतरली आहेत. आधुनिक यंत्रामुळे खुरपी तयार करण्याचा वेगही वाढला आहे. - महादेव लोहार, कारागीर