शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

पेंडाखळेच्या खुरप्यांची ‘धार’च न्यारी

By admin | Updated: March 19, 2017 23:40 IST

महाराष्ट्रातून मागणी : शंभराहून अधिक तरुण व्यवसायात; मशिनरीच्या वापराने पारंपरिक व्यवसायाला आधुनिक लूक-- लोकमत संगे जाणून घेऊ

कोल्हापूर जिल्ह्यास जसा जाज्वल्य इतिहास आहे, तसा या जिल्ह्याचा भूगोलही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या जिल्ह्यात अशी अनेक गावे आहेत, की त्यांचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. ‘लोकमत’ने गतवर्षी जिल्ह्यातील चांगल्या सांस्कृतिक संस्थांची ओळख वर्षभर करून दिली. यावर्षी त्याच मालिकेत ‘लोकमत‘ अशा वेगळ््या वाटेने जाणाऱ्या गावांची महती उलगडून सांगणार आहे. प्रत्येक सोमवारी या सदरात एक न्यारे गाव तुम्हाला भेटायला येईल..राजाराम लोंढे -- कोल्हापूरअस्सल पोलादाचा वापर, धार लावण्याची खासियत व टिकाऊपणा यांमुळे शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखळेच्या खुरप्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अक्षरश: भुरळ घातली आहे. गेल्या साठ-सत्तर वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या खुरप्यांच्या व्यवयायाला सध्या आधुनिक ‘लूक’ आला असून, या व्यवसायामध्ये गावातील शंभराहून अधिक तरुण गुंतले आहेत. उत्तम खुरपी करणारे गाव अशी या गावाची ओळख महाराष्ट्रात रुजली आहे. शाहूवाडी तालुका डोंगरकपारींतच वसला आहे. बाजारभोगावपासून पुढे गेले की, कासारी नदीपलीकडे पेंडाखळे गाव लागते. शाहूवाडी तालुका एका बाजूला पसरलेला आणि दक्षिणेकडे ‘घुंगूरचा कडा’ या डोंगराच्या पायथ्याशी हे छोटे गाव वसले आहे. तसा तालुक्याशी फारसा संपर्क येत नसल्याने कामानिमित्त या गावाला बाजारभोगाव, कोल्हापूरवरच अवलंबून राहावे लागते. गावची लोकसंख्या १७८०. त्यापैकी सुतारवाडीत २० कुटुंबे राहतात. सुतारवाडीत गेल्या ७० वर्षांपासून खुरपी तयार केली जातात. कोल्हापूर, मलकापूर, शिराळा येथून जुन्या बाजारांत चारचाकी गाड्यांचे कमानपाटे खरेदी करायचे आणि त्यापासून खुरपी करण्याचा व्यवसाय सुरू आहे. या पाट्यांचे साडेपाच, सहा, आठ इंचांचे तुकडे करून खुरपी तयार केली जातात. पूर्वी हाताने ओढायच्या भात्यातून पोलादाचे तुकडे गरम करून त्याला घणाने खुरप्याचा आकार दिला जायाचा. त्यामुळे एक खुरपे करण्यास वेळ लागायचा. साधारणता पाटा तोडण्यापासून खुरप्याला लाकडी मुठ बसवून धार लावेपर्यंत (पाणी देणे) आठवड्याला तीस खुरपी व्हायची. दणकट व टिकाऊपणामुळे पेंडाखळेची खुरपी शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली. एकदा खुरपे खरेदी केले की पाच-सहा वर्षे नवीन घ्यावे लागत नसल्याने येथील खुरप्यांना मागणी वाढत गेली. संपूर्ण महाराष्ट्रात ‘पेंडाखळेचे खुरपे’ प्रसिद्ध झाले. आजही या खुरप्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. या व्यवसायात आता तरुण पिढी उतरली असून त्यांनी आधुनिकता आणण्याचा प्रयत्न केला. दिवसभर गरम पोलादाला घण मारत बसण्यापेक्षा येथील तरुणांनी यांत्रिकीकरणाचा आधार घेतला. टाकाऊ स्क्रॅपपासून त्यांनी विद्युत मोटारीवर चालणारा घण तयार केला. त्याचबरोबर हाताने भाता फुलविण्याऐवजी तिथे विद्युत मोटरीच्या साहाय्याने भाता फुलविल्याने पोलाद लवकर तापते. एका युनिटवर तीन तरुण काम करतात. पूर्वी आठवड्याला तीस खुरपी पूर्ण व्हायची; पण आता त्यात गतिमानता आली असून दिवसाला तीस खुरपी केली जातात. कोपार्डे (ता. करवीर) येथील जनावरांच्या आठवडी बाजारात काही सुतारबांधव खुरपी घेऊन विक्रीसाठी जातात; पण बहुतांश खुरप्यांची विक्री ही जाग्यावरूनच विक्री होते. कोल्हापूरसह कऱ्हाड, सांगोला, आटपाडी, पंढरपूर, सांगली, पुणे, नाशिक येथून खुरप्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कसदार पाणीच ‘धारे’ची जादू!कोणत्याही खुरप्याची धार ही त्याला तो कारागीर पाणी कसे देतो त्यावरच अवलंबून असते. येथील सुतार बंधंूना याबाबत विचारले असता, डोंगरकपारीतून येणारे पाणी आम्ही धार देण्यासाठी वापरतो. या पाण्याचा वेगळा गुणधर्म असल्याने खुरप्याचा कितीही व कसाही वापर केला तरी त्याची धार जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पाच वर्षांची गॅरंटीखुरपे वापरणाऱ्या शेतकऱ्याने निसण्यावर रोज चोळणी व्यवस्थित केली तर किमान सहा वर्षे पुन्हा पाणी देण्याची गरज भासत नाही. धारेला खुरपे वाकले तर ते बदलून दिले जाते.पाणी कसे देतात ?४खुरप्याला लाकडी मूठ घातल्यानंतर शेवटची प्रक्रिया म्हणजे पाणी देणे. ही प्रक्रिया अतिशय जागरूकतेने करावी लागते. खुरपे मध्यम गरम करून त्यावर हळूहळू पाणी ओतल्यास तीक्ष्ण अशी धार येते; पण पोलाद जादा गरम झाले तर खुरप्याचे तुकडे पडतात. त्यामुळे खुरप्याला दिलेले तापमान व पाण्याचे प्रमाण यांचा ताळमेळ घालूनच पाणी द्यावे लागते. दृष्टिक्षेपात पेंडाखळेकुटुंबे-२३१लोकसंख्या-१७८०महिलांची संख्या-८२५ग्रामदैवत-विठलाईदेवीएकूण क्षेत्र-२५० हेक्टर (बागायत)व्यवसाय-शेती, दुग्ध व्यवसाय व खुरपी तयार करणेदूध संस्था-२प्रतिदिनी दूध उत्पादन-१ हजार लिटरप्राथमिक शिक्षण-गावातचमाध्यमिक -माळापुडेसाक्षरतेचे प्रमाण-९० टक्केशासकीय नोकरांची संख्या-१ तलाठी, १ वनपाल, १ वनमजूर, १ ग्रामसेवक, २ शिक्षक, २ साखर कामगार.गावातील साक्षरतेचे प्रमाण खूप चांगले असले तरी शेती, दुग्धव्यवसाय व सुतारकामातच अधिक लोक कार्यरत आहेत. ‘खुरप्यांचे गाव’ म्हणून आमची ओळख असली तरी येथील कारागिरांनी आतापर्यंत ही ओळख जिवंत ठेवण्याचे प्रामाणिक काम केले.- सुनीता युवराज पाटील, सरपंच, पेंडाखळेपारंपरिकतेला थोडीशी आधुनिकतेची जोड देऊन व्यवसाय सुरू असला तरी गुणवत्तेबाबत कोठेही तडजोड केली जात नाही. कोळशाच्या तुटवड्यामुळे या व्यवसायात अडचणी निर्माण झाल्या आहेत. - गजानन सुतार, कारागीरआतापर्यंत आम्ही प्रामाणिकपणे हा व्यवसाय टिकवून धरला. आता तरुण मुले यामध्ये उतरली आहेत. आधुनिक यंत्रामुळे खुरपी तयार करण्याचा वेगही वाढला आहे. - महादेव लोहार, कारागीर