शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पेंडाखळेच्या खुरप्यांची ‘धार’च न्यारी

By admin | Updated: March 19, 2017 23:40 IST

महाराष्ट्रातून मागणी : शंभराहून अधिक तरुण व्यवसायात; मशिनरीच्या वापराने पारंपरिक व्यवसायाला आधुनिक लूक-- लोकमत संगे जाणून घेऊ

कोल्हापूर जिल्ह्यास जसा जाज्वल्य इतिहास आहे, तसा या जिल्ह्याचा भूगोलही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या जिल्ह्यात अशी अनेक गावे आहेत, की त्यांचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. ‘लोकमत’ने गतवर्षी जिल्ह्यातील चांगल्या सांस्कृतिक संस्थांची ओळख वर्षभर करून दिली. यावर्षी त्याच मालिकेत ‘लोकमत‘ अशा वेगळ््या वाटेने जाणाऱ्या गावांची महती उलगडून सांगणार आहे. प्रत्येक सोमवारी या सदरात एक न्यारे गाव तुम्हाला भेटायला येईल..राजाराम लोंढे -- कोल्हापूरअस्सल पोलादाचा वापर, धार लावण्याची खासियत व टिकाऊपणा यांमुळे शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखळेच्या खुरप्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अक्षरश: भुरळ घातली आहे. गेल्या साठ-सत्तर वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या खुरप्यांच्या व्यवयायाला सध्या आधुनिक ‘लूक’ आला असून, या व्यवसायामध्ये गावातील शंभराहून अधिक तरुण गुंतले आहेत. उत्तम खुरपी करणारे गाव अशी या गावाची ओळख महाराष्ट्रात रुजली आहे. शाहूवाडी तालुका डोंगरकपारींतच वसला आहे. बाजारभोगावपासून पुढे गेले की, कासारी नदीपलीकडे पेंडाखळे गाव लागते. शाहूवाडी तालुका एका बाजूला पसरलेला आणि दक्षिणेकडे ‘घुंगूरचा कडा’ या डोंगराच्या पायथ्याशी हे छोटे गाव वसले आहे. तसा तालुक्याशी फारसा संपर्क येत नसल्याने कामानिमित्त या गावाला बाजारभोगाव, कोल्हापूरवरच अवलंबून राहावे लागते. गावची लोकसंख्या १७८०. त्यापैकी सुतारवाडीत २० कुटुंबे राहतात. सुतारवाडीत गेल्या ७० वर्षांपासून खुरपी तयार केली जातात. कोल्हापूर, मलकापूर, शिराळा येथून जुन्या बाजारांत चारचाकी गाड्यांचे कमानपाटे खरेदी करायचे आणि त्यापासून खुरपी करण्याचा व्यवसाय सुरू आहे. या पाट्यांचे साडेपाच, सहा, आठ इंचांचे तुकडे करून खुरपी तयार केली जातात. पूर्वी हाताने ओढायच्या भात्यातून पोलादाचे तुकडे गरम करून त्याला घणाने खुरप्याचा आकार दिला जायाचा. त्यामुळे एक खुरपे करण्यास वेळ लागायचा. साधारणता पाटा तोडण्यापासून खुरप्याला लाकडी मुठ बसवून धार लावेपर्यंत (पाणी देणे) आठवड्याला तीस खुरपी व्हायची. दणकट व टिकाऊपणामुळे पेंडाखळेची खुरपी शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली. एकदा खुरपे खरेदी केले की पाच-सहा वर्षे नवीन घ्यावे लागत नसल्याने येथील खुरप्यांना मागणी वाढत गेली. संपूर्ण महाराष्ट्रात ‘पेंडाखळेचे खुरपे’ प्रसिद्ध झाले. आजही या खुरप्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. या व्यवसायात आता तरुण पिढी उतरली असून त्यांनी आधुनिकता आणण्याचा प्रयत्न केला. दिवसभर गरम पोलादाला घण मारत बसण्यापेक्षा येथील तरुणांनी यांत्रिकीकरणाचा आधार घेतला. टाकाऊ स्क्रॅपपासून त्यांनी विद्युत मोटारीवर चालणारा घण तयार केला. त्याचबरोबर हाताने भाता फुलविण्याऐवजी तिथे विद्युत मोटरीच्या साहाय्याने भाता फुलविल्याने पोलाद लवकर तापते. एका युनिटवर तीन तरुण काम करतात. पूर्वी आठवड्याला तीस खुरपी पूर्ण व्हायची; पण आता त्यात गतिमानता आली असून दिवसाला तीस खुरपी केली जातात. कोपार्डे (ता. करवीर) येथील जनावरांच्या आठवडी बाजारात काही सुतारबांधव खुरपी घेऊन विक्रीसाठी जातात; पण बहुतांश खुरप्यांची विक्री ही जाग्यावरूनच विक्री होते. कोल्हापूरसह कऱ्हाड, सांगोला, आटपाडी, पंढरपूर, सांगली, पुणे, नाशिक येथून खुरप्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कसदार पाणीच ‘धारे’ची जादू!कोणत्याही खुरप्याची धार ही त्याला तो कारागीर पाणी कसे देतो त्यावरच अवलंबून असते. येथील सुतार बंधंूना याबाबत विचारले असता, डोंगरकपारीतून येणारे पाणी आम्ही धार देण्यासाठी वापरतो. या पाण्याचा वेगळा गुणधर्म असल्याने खुरप्याचा कितीही व कसाही वापर केला तरी त्याची धार जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पाच वर्षांची गॅरंटीखुरपे वापरणाऱ्या शेतकऱ्याने निसण्यावर रोज चोळणी व्यवस्थित केली तर किमान सहा वर्षे पुन्हा पाणी देण्याची गरज भासत नाही. धारेला खुरपे वाकले तर ते बदलून दिले जाते.पाणी कसे देतात ?४खुरप्याला लाकडी मूठ घातल्यानंतर शेवटची प्रक्रिया म्हणजे पाणी देणे. ही प्रक्रिया अतिशय जागरूकतेने करावी लागते. खुरपे मध्यम गरम करून त्यावर हळूहळू पाणी ओतल्यास तीक्ष्ण अशी धार येते; पण पोलाद जादा गरम झाले तर खुरप्याचे तुकडे पडतात. त्यामुळे खुरप्याला दिलेले तापमान व पाण्याचे प्रमाण यांचा ताळमेळ घालूनच पाणी द्यावे लागते. दृष्टिक्षेपात पेंडाखळेकुटुंबे-२३१लोकसंख्या-१७८०महिलांची संख्या-८२५ग्रामदैवत-विठलाईदेवीएकूण क्षेत्र-२५० हेक्टर (बागायत)व्यवसाय-शेती, दुग्ध व्यवसाय व खुरपी तयार करणेदूध संस्था-२प्रतिदिनी दूध उत्पादन-१ हजार लिटरप्राथमिक शिक्षण-गावातचमाध्यमिक -माळापुडेसाक्षरतेचे प्रमाण-९० टक्केशासकीय नोकरांची संख्या-१ तलाठी, १ वनपाल, १ वनमजूर, १ ग्रामसेवक, २ शिक्षक, २ साखर कामगार.गावातील साक्षरतेचे प्रमाण खूप चांगले असले तरी शेती, दुग्धव्यवसाय व सुतारकामातच अधिक लोक कार्यरत आहेत. ‘खुरप्यांचे गाव’ म्हणून आमची ओळख असली तरी येथील कारागिरांनी आतापर्यंत ही ओळख जिवंत ठेवण्याचे प्रामाणिक काम केले.- सुनीता युवराज पाटील, सरपंच, पेंडाखळेपारंपरिकतेला थोडीशी आधुनिकतेची जोड देऊन व्यवसाय सुरू असला तरी गुणवत्तेबाबत कोठेही तडजोड केली जात नाही. कोळशाच्या तुटवड्यामुळे या व्यवसायात अडचणी निर्माण झाल्या आहेत. - गजानन सुतार, कारागीरआतापर्यंत आम्ही प्रामाणिकपणे हा व्यवसाय टिकवून धरला. आता तरुण मुले यामध्ये उतरली आहेत. आधुनिक यंत्रामुळे खुरपी तयार करण्याचा वेगही वाढला आहे. - महादेव लोहार, कारागीर