शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

सहवीज प्रकल्पातून कारखान्याला आर्थिक बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:40 IST

दत्ता लोकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कसरवडे : बिद्री येथील दुधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक पार्श्वभूमीवर महालक्ष्मी आघाडीचे प्रमुख, ‘बिद्री’चे माजी अध्यक्ष के. पी. पाटील यांनी कारखान्यात गेल्या दहा वर्षांत केलेल्या हिताच्या कारभाराचा ‘लोकमत’च्या खास मुलाखतीवेळी चढता आलेख मांडला. ते म्हणाले गेल्या दहा वर्षांत सातत्याने ऊस ऊत्पादकांना उच्चांकी दर तसेच कारखान्याच्या ...

दत्ता लोकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कसरवडे : बिद्री येथील दुधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक पार्श्वभूमीवर महालक्ष्मी आघाडीचे प्रमुख, ‘बिद्री’चे माजी अध्यक्ष के. पी. पाटील यांनी कारखान्यात गेल्या दहा वर्षांत केलेल्या हिताच्या कारभाराचा ‘लोकमत’च्या खास मुलाखतीवेळी चढता आलेख मांडला. ते म्हणाले गेल्या दहा वर्षांत सातत्याने ऊस ऊत्पादकांना उच्चांकी दर तसेच कारखान्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा सहवीज प्रकल्प उभारला.विरोधकांनी अनंत अडचणी निर्माण केल्या. मात्र, त्यावर मात करून हा प्रकल्प उभारला. त्यामुळेच कारखाना अधिकच आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला. गाळप क्षमता ७५०० मे. टन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येईल. यापुढेही सभासदांना उच्चांकी दर देत विमा संरक्षण देऊन कारखान्याच्या ऊस उत्पादकांचे हित हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी आत्मविश्वासपूर्वक सांगितले.गेल्या शतकापूर्वी आमच्या हाती सभासदांनी मोठ्या विश्वासाने सत्ता दिली. साखर कारखानदारीसमोर अनेक अडचणी येत असताना त्यावर मात करून ऊस उत्पादकांना घामाचे दाम देण्याचे काम केले आहे. त्या परिस्थितीत कोट्यवधी रुपयांच्या कर्जात असणारा कारखाना कर्जमुक्त केला. शिवाय सातत्याने उच्चांकी दर देण्यात अग्रभागी राहिलो. या कालावधीत ऊसदराबाबत अनेकदा कोंडी निर्माण होत होती. ती कोंडी फोडण्याचा प्रश्न ज्या ज्यावेळी निर्माण झाला, त्या त्या वेळी शेतकºयांच्या हितासाठी ऊसदर जाहीर करून कोंडी फोडण्याचे काम आम्ही केले.रोजंदारीच्या कामगारांसंबंधी बोलताना ते म्हणाले, कारखान्याच्या गळीत हंगामात तात्पुरत्या कर्मचाºयांची गरज भासते. त्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकºयांच्या मुलांना रोजंदारीच्या कामावर घेतले जाते. हा निर्णय संस्थेच्या गरजेसाठी घेतला जातो. मात्र, काही मंडळी बोगसगिरी म्हणतात, हे योग्य नाही. आरोप करणारी मंडळीसुद्धा एकेकाळी या कारखान्यावर कार्यकर्त्यांना रोजंदारीच्या कामासाठी पाठवत होते.यापुढे सभासदांना उच्चांकी दर, याचबरोबरच उत्पादन वाढीसाठी भरीव स्वरूपाची मदत, गाळप क्षमता ७५०० मे. टन करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री उभारणी, तोडणी कार्यक्रम अ‍ॅपद्वारे संगणकीकरण करून मोबाईलद्वारे सभासदांना कळवीत सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.सहवीज प्रकल्पाच्या मुद्द्याला हात घालताना ते म्हणाले, ऊर्जाअंकुर योजनेनुसार वीज प्रकल्प भाडेतत्त्वावर उभारणे हे कारखान्याच्या हिताचे ठरणार नसून, कारखान्याच्या सभासदांच्या मालकीचा सहवीज प्रकल्प उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यासाठी केंद्र व राज्य पातळीवरील वित्तीय संस्थांची मदत घेतली. मात्र, विद्युत वाहिनी टॉवरना विरोधकांनी विरोध केला. यामुळे कोटीत तोटा सहन करावा लागला. या प्रकल्पामुळे कारखाना डबघाईस येईल, कारखान्यावर पत्रेसुद्धा राहणार नाहीत, असा आरोप ही मंडळी करत होती. मात्र, आता या प्रकल्पामुळे आर्थिक सुबत्ता आली अशी दुटप्पी भूमिका घेणाºया विरोधकांना सभासद त्यांची जागा या निवडणुकीत दाखवतील.