शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

लोंघेत पन्नास वर्षांपासून इको-फ्रेंडली गणेशोत्सव

By admin | Updated: September 10, 2016 00:54 IST

शाडूच्या मूर्ती बसविण्याचा गावकऱ्यांचा निर्णय : घरगुती, सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींना रंग नाही

चंद्रकांत पाटील --गगनबावडाअलीकडे प्रदूषणप्रश्नी सर्वसामान्यांमध्येही मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. त्यामुळे ‘इको-फ्रेंडली’ चळवळ तळागाळापर्यंत रूजू लागली आहे. पण गगनबावडा तालुक्यातील अख्खं गावच ‘इको-फ्रेंडली’ आहे हे सांगूनही पटणार नाही, पण असे गाव आहे. ते गाव म्हणजे लोंघे. लोंघेकरांची ही इको-फ्रेंडली परंपरा एक-दोन वर्षांची नव्हे तर तब्बल ५० हून अधिक वर्षांपासून सुरू आहे.घरोघरी गणपतीची मूर्ती रंगीत न बसविता फक्त शाडूच्या मूर्ती बसविण्याचा निर्णय सर्व गावाने घेतला व आजपर्यंत परंपरा अखंडितपणे सुरू आहे. लोंघे गावचा आदर्श जिल्ह्याला मार्गदर्शक ठरला आहे. येथे घरोघरी व मंडळाच्या माध्यमातून गणपतीच्या रंगीत मूर्तीची प्रतिष्ठापना न करता शाडूच्या न रंगविलेल्या गणेशमूर्तीची पूजा केली जाते, हे एक वेगळेच वैशिष्ट्य म्हणावे लागेल.कोल्हापूरपासून अवघ्या २५ ते ३० कि. मी. अंतरावर कुंभी-कासारी काठावर हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावाने संस्कृतीची परंपरा जपत अभिनव उपक्रम राबवला आहे. सेवाभावी संस्था, राज्य शासनाने दखल घ्यावी, असेच चांगले कार्य या गावाने केले आहे, याचे सर्व श्रेय जुन्या-जाणत्या वर्गालाच द्यावे लागेल, यात शंका नाही. अफाट दूरदृष्टी असलेल्या या जुन्या मंडळीनी गावाला पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले असून त्याचे पालनही आजपर्यंत तरी चांगल्याप्रकारे होत आहे. गणेशोत्सवामुळे येथे कायम एकोपा नांदत आहे, हे या गावचे वैशिष्ट्य आहे. गावात गणेशाची मूर्ती पूर्णपणे चिखलमातीची बनविल्यामुळे कोणत्याही रासायनिक घटकांचा समावेश केलेला आढळून येत नाही. दोन महिने मातीसाठी प्रयत्न करूनही बनविलेल्या चिखलापासून मूर्तीची निर्मिती केली जाते. या मूर्ती नदी, विहिरींमध्ये विसर्जित केल्या तरी प्रदूषण होत नाही.जलप्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, जलप्रदूषण थांबले नाही तर गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल. असे असताना इतर गावांनी लोंघे गावचा आदर्श घेणे गरजेचे आहे. वास्तवत: रुढी परंपरा यांना धक्का न लावता पुरोगामी विचाराने ही परंपरा गावाने राखली असून शाडूच्या मूर्ती (न रंगविलेल्या) गावात निर्माण करून ग्रामस्थांनी आपल्या घरोघरी पूजन करून सर्वच गणेशभक्तांना एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.