शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

शाळी नदीसही प्रदूषणाचे ग्रहण

By admin | Updated: March 24, 2015 00:10 IST

पाण्याला दुर्गंधी : दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

राजाराम कांबळे - मलकापूर शहराजवळून वाहणाऱ्या शाळी नदीच्या पाण्याचे प्रदूषण झाले आहे. शाळी नदीचे पाणी काळेकुट्ट झाले आहे. पाण्याला उग्र वास येत असून, मलकापूर, उचत, माण, परळे कोपार्डे, येळाणे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे नदीकाठची शेतीही धोक्यात आली आहे. पालिकेची नळ पाणीपुरवठा योजना बंद ठेवण्यात आली आहे. पालेश्वर धरणातील पाणी सोडण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.उन्हाळ्यात पालेश्वर धरणातील पाण्याचा विसर्ग कमी होतो. शाळी नदीतील पाण्याचा प्रवाह कमी होतो. शाळी नदीवरील येळाणे येथे पाटबंधारे विभागाच्या वतीने पाणी अडविले जाते. नदीमध्ये मलकापूर शहरातील गटारींचे पाणी, उचत येथील गटारांचे पाणी मिसळते. त्यात नदीकाठावरील गावातील महिला नदीच्या पाण्यामध्ये कपडे धुतात. तसेच शेतकऱ्यांकडून जनावरेदेखील धुतली जातात. पाणी वाहत नसल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होत आहे. पाण्याला उग्र वास येत असून, संपूर्ण नदीचे पाणी काळेकुट्ट झाले आहे.शाळी नदीतून दहा गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांना शुद्ध पाण्यासाठी विहीर व कूपनलिकांचा आधार घ्यावा लागत आहे. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली असली तरी शेतीला या पाण्याशिवाय पर्याय नसल्याने काळ्या पाण्यामुळे शेती नापिक बनत आहे.मलकापूर नगरपालिकेने या प्रदूषित पाण्यामुळे शाळी नदीवरील योजना बंद ठेवली आहे. कडवी नदीवरील जॅकवेलवरुन नागरिकांना फिल्टरचे पाणी पुरविले जाते. मात्र, खर्चासाठी नागरिकांना विहीर, कूपनलिका यांचे पाणी वापरावे लागते. शहरातील सर्व गटारींचे पाणी शाळी नदीत मिसळते. पालिकेने यासाठी कोणतीच उपाययोजना केलेली नाही. प्रदूषण मंडळाने या नदीचे पाणी तपासून यावर उपाययोजना करावी व नदीकाठच्या गावांना प्रदूषित पाण्यापासून मुक्ती द्यावी, अशी मागणी नदीकाठच्या गावातील नागरिकांतून होत आहे.पाटबंधारे विभागाने पालेश्वर धरणातून नियमित पाणी सोडावे, तरच पाण्याचा प्रवाह सुरू राहून पाणी दूषित होणार नाही.- बाबासाहेब पाटील, नगराध्यक्षशाळी नदीतील दूषित पाण्यामुळे नदीकाठची शेती धोक्यात आली आहे. पालिकेने उपाययोजना करावी.- राजू प्रभावळकर, शेतकरी.