शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

शाळी नदीसही प्रदूषणाचे ग्रहण

By admin | Updated: March 24, 2015 00:10 IST

पाण्याला दुर्गंधी : दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

राजाराम कांबळे - मलकापूर शहराजवळून वाहणाऱ्या शाळी नदीच्या पाण्याचे प्रदूषण झाले आहे. शाळी नदीचे पाणी काळेकुट्ट झाले आहे. पाण्याला उग्र वास येत असून, मलकापूर, उचत, माण, परळे कोपार्डे, येळाणे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे नदीकाठची शेतीही धोक्यात आली आहे. पालिकेची नळ पाणीपुरवठा योजना बंद ठेवण्यात आली आहे. पालेश्वर धरणातील पाणी सोडण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.उन्हाळ्यात पालेश्वर धरणातील पाण्याचा विसर्ग कमी होतो. शाळी नदीतील पाण्याचा प्रवाह कमी होतो. शाळी नदीवरील येळाणे येथे पाटबंधारे विभागाच्या वतीने पाणी अडविले जाते. नदीमध्ये मलकापूर शहरातील गटारींचे पाणी, उचत येथील गटारांचे पाणी मिसळते. त्यात नदीकाठावरील गावातील महिला नदीच्या पाण्यामध्ये कपडे धुतात. तसेच शेतकऱ्यांकडून जनावरेदेखील धुतली जातात. पाणी वाहत नसल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होत आहे. पाण्याला उग्र वास येत असून, संपूर्ण नदीचे पाणी काळेकुट्ट झाले आहे.शाळी नदीतून दहा गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांना शुद्ध पाण्यासाठी विहीर व कूपनलिकांचा आधार घ्यावा लागत आहे. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली असली तरी शेतीला या पाण्याशिवाय पर्याय नसल्याने काळ्या पाण्यामुळे शेती नापिक बनत आहे.मलकापूर नगरपालिकेने या प्रदूषित पाण्यामुळे शाळी नदीवरील योजना बंद ठेवली आहे. कडवी नदीवरील जॅकवेलवरुन नागरिकांना फिल्टरचे पाणी पुरविले जाते. मात्र, खर्चासाठी नागरिकांना विहीर, कूपनलिका यांचे पाणी वापरावे लागते. शहरातील सर्व गटारींचे पाणी शाळी नदीत मिसळते. पालिकेने यासाठी कोणतीच उपाययोजना केलेली नाही. प्रदूषण मंडळाने या नदीचे पाणी तपासून यावर उपाययोजना करावी व नदीकाठच्या गावांना प्रदूषित पाण्यापासून मुक्ती द्यावी, अशी मागणी नदीकाठच्या गावातील नागरिकांतून होत आहे.पाटबंधारे विभागाने पालेश्वर धरणातून नियमित पाणी सोडावे, तरच पाण्याचा प्रवाह सुरू राहून पाणी दूषित होणार नाही.- बाबासाहेब पाटील, नगराध्यक्षशाळी नदीतील दूषित पाण्यामुळे नदीकाठची शेती धोक्यात आली आहे. पालिकेने उपाययोजना करावी.- राजू प्रभावळकर, शेतकरी.