शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

खा की खा !

By admin | Updated: May 11, 2017 00:52 IST

समाजभान

परवा एका वृत्तवाहिनीवर नको असलेले अर्थात आरोग्यास हानिकारक पदार्थ खाल्ले की काय होते, हे सांगणारे एक वृत्त दाखविण्यात येत होते. ते होते एका माणसाळलेल्या वानराचे. पर्यटकांनी दिलेले खाद्यपदार्थ, शीतपेये ते आवडीने खात होते. शीतपेयाची बाटली माणसाप्रमाणे तोंडाला लावून पित होते. हे सर्व बघत असतानाच एका गोष्टीकडे लक्ष जात होते ते म्हणजे त्याचे पोट. कोणत्याही वानराचे पोट सुटलेले आपण पाहिले आहे का? तर याचे उत्तर नाही असेच येते; पण या वानराचे पोट माणसाप्रमाणे सुटलेले होते. यामुळे सर्वसामान्य वानराप्रमाणे उड्या मारणे तर दूरच त्याला चालणे मुश्कील बनल्याचे दिसत होते. म्हणजेच निसर्गाने जो आहार, विहार सांगितला आहे तो डावलून भलतेच खाणे-पिणे चालू केले की काय होते, याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. मनुष्य असो की एखादा अन्य प्राणी सर्वांनाच हे तत्त्व लागू पडते. हे सर्व आता आठवायचे करण म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शाळांच्या उपहारगृहांमध्ये जंक फूड विक्रीवर बंदी घातली आहे. शालेय मुलांच्या आरोग्यावर जंक फूडचा होणारा अनिष्ठ परिणाम टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या उपहारगृहात कोणते पदार्थ विकता येतील आणि कोणते येणार नाहीत याची यादीही या आदेशात देण्यात आली आहे. या निर्णयामुळे केवळ शाळांच्या उपहारगृहामध्ये मिळणारे जंक फूड बंद झाले. बाहेर ते मिळणारच आहे. शिवाय केवळ विद्यार्थीच काय, अख्खी तरुणाई जंक फूडच्या मागे लागली आहे. तिचे काय करणार? आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे गेले की त्यांचा पहिला प्रश्न असतो काय वेगळे खाल्ले आहे का? बाहेर कुठे खाल्लंय का? हो, असे उत्तर दिले की असे पदार्थ खात जाऊ नका किंवा कमी खा, असा सल्ला दिला जातो. शिवाय कोणत्याही आरोग्य शिबिरात अथवा डॉक्टरांच्या व्याख्यानात जंक फूड अथवा फास्ट फूड खाऊ नका. अगदीच खायचे झाले तर कमी खा, असे सांगितले जाते; पण लक्षात कोण घेतो? वडा पाव, भजी, पिझ्झा, बर्गर, समोसा, फ्रेंच फ्राइज, रोल्स आणि रॅप्स, चिप्स, नुडल्स, टिक्का, पाणीपुरी, सर्व प्रकारचे चॉकलेट, केक, बिस्किटस, पेस्ट्री, जाम, जेली, गुलाबजाम, पेढा, कलाकंद आदींचा समावेश जंक फूडमध्ये होतो. यातील कोणताही पदार्थ समोर आला की तोंडाला पाणी सुटतेच; पण याचे घातक परिणाम पाहावयाचे झाले तर यामुळे मधुमेह, रक्तातील साखर कमी जास्त होणे, लठ्ठपणा वाढणे, पचनाचे विकार, बद्धकोष्ठता, थकवा , दुबळेपणा, नैराश्य, ह्््दयरोग, मेंदूचे विकार, किडनीचे विकार जडू शकतात. मुळात ‘जंक’ या शब्दाचा अर्थच निरुपयोगी किंवा भंगार असा आहे. या निरुपयोगी पदार्थांचेच आपल्याला जादा आकर्षण आहे. रस्त्या-रस्त्यावर अशा पदार्थांचे स्टॉल्स्, हॉटेल्स् किंवा दुकाने आहेत. या जंक फूडमुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला असला, उलाढाल कोट्यवधींची होत असली तरी मानवी शरीरावर त्याचे होणारे परिणाम पाहता केवळ शाळांमधील उपहारगृहामध्ये विक्रीला बंदी न घालता त्यांच्या उत्पादनावरच मर्यादा आणायला हवी किंवा त्यांवर दारू, सिगारेटप्रमाणे मोठ्या प्रमाणात ऐशारामी कर लावायला हवा. त्याचबरोबर काय खावे काय नको, याबाबत मोठ्या प्रमाणात जनप्रबोधन मोहीम हाती घ्यायला हवी. कोल्हापुरातील शिवाजी मराठा हायस्कूलचे शिक्षक आणि चिल्लर पार्टी चळवळीचे मिलिंद यादव हे चळवळीच्या कोणत्याही कार्यक्रमात सुरुवातीला जंक फूडचे दुष्परिणाम सांगून मुलांना घरी बनविलेले पदार्थच खा, असे सांगत असतात. वैयक्तिक पातळीवर काहीजण अशी मोहीम राबवित असले तरी समाजानेही त्याला साथ द्यायला हवी. शासनानेही याबाबत योग्य ती पावले उचलायला हवीत, तरच आपले पर्यायाने समाजाचे आरोग्य चांगले राहील.- चंद्रकांत कित्तुरे    kollokmatpratisad@gmail.com