शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

खा की खा !

By admin | Updated: May 11, 2017 00:52 IST

समाजभान

परवा एका वृत्तवाहिनीवर नको असलेले अर्थात आरोग्यास हानिकारक पदार्थ खाल्ले की काय होते, हे सांगणारे एक वृत्त दाखविण्यात येत होते. ते होते एका माणसाळलेल्या वानराचे. पर्यटकांनी दिलेले खाद्यपदार्थ, शीतपेये ते आवडीने खात होते. शीतपेयाची बाटली माणसाप्रमाणे तोंडाला लावून पित होते. हे सर्व बघत असतानाच एका गोष्टीकडे लक्ष जात होते ते म्हणजे त्याचे पोट. कोणत्याही वानराचे पोट सुटलेले आपण पाहिले आहे का? तर याचे उत्तर नाही असेच येते; पण या वानराचे पोट माणसाप्रमाणे सुटलेले होते. यामुळे सर्वसामान्य वानराप्रमाणे उड्या मारणे तर दूरच त्याला चालणे मुश्कील बनल्याचे दिसत होते. म्हणजेच निसर्गाने जो आहार, विहार सांगितला आहे तो डावलून भलतेच खाणे-पिणे चालू केले की काय होते, याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. मनुष्य असो की एखादा अन्य प्राणी सर्वांनाच हे तत्त्व लागू पडते. हे सर्व आता आठवायचे करण म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शाळांच्या उपहारगृहांमध्ये जंक फूड विक्रीवर बंदी घातली आहे. शालेय मुलांच्या आरोग्यावर जंक फूडचा होणारा अनिष्ठ परिणाम टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या उपहारगृहात कोणते पदार्थ विकता येतील आणि कोणते येणार नाहीत याची यादीही या आदेशात देण्यात आली आहे. या निर्णयामुळे केवळ शाळांच्या उपहारगृहामध्ये मिळणारे जंक फूड बंद झाले. बाहेर ते मिळणारच आहे. शिवाय केवळ विद्यार्थीच काय, अख्खी तरुणाई जंक फूडच्या मागे लागली आहे. तिचे काय करणार? आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे गेले की त्यांचा पहिला प्रश्न असतो काय वेगळे खाल्ले आहे का? बाहेर कुठे खाल्लंय का? हो, असे उत्तर दिले की असे पदार्थ खात जाऊ नका किंवा कमी खा, असा सल्ला दिला जातो. शिवाय कोणत्याही आरोग्य शिबिरात अथवा डॉक्टरांच्या व्याख्यानात जंक फूड अथवा फास्ट फूड खाऊ नका. अगदीच खायचे झाले तर कमी खा, असे सांगितले जाते; पण लक्षात कोण घेतो? वडा पाव, भजी, पिझ्झा, बर्गर, समोसा, फ्रेंच फ्राइज, रोल्स आणि रॅप्स, चिप्स, नुडल्स, टिक्का, पाणीपुरी, सर्व प्रकारचे चॉकलेट, केक, बिस्किटस, पेस्ट्री, जाम, जेली, गुलाबजाम, पेढा, कलाकंद आदींचा समावेश जंक फूडमध्ये होतो. यातील कोणताही पदार्थ समोर आला की तोंडाला पाणी सुटतेच; पण याचे घातक परिणाम पाहावयाचे झाले तर यामुळे मधुमेह, रक्तातील साखर कमी जास्त होणे, लठ्ठपणा वाढणे, पचनाचे विकार, बद्धकोष्ठता, थकवा , दुबळेपणा, नैराश्य, ह्््दयरोग, मेंदूचे विकार, किडनीचे विकार जडू शकतात. मुळात ‘जंक’ या शब्दाचा अर्थच निरुपयोगी किंवा भंगार असा आहे. या निरुपयोगी पदार्थांचेच आपल्याला जादा आकर्षण आहे. रस्त्या-रस्त्यावर अशा पदार्थांचे स्टॉल्स्, हॉटेल्स् किंवा दुकाने आहेत. या जंक फूडमुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला असला, उलाढाल कोट्यवधींची होत असली तरी मानवी शरीरावर त्याचे होणारे परिणाम पाहता केवळ शाळांमधील उपहारगृहामध्ये विक्रीला बंदी न घालता त्यांच्या उत्पादनावरच मर्यादा आणायला हवी किंवा त्यांवर दारू, सिगारेटप्रमाणे मोठ्या प्रमाणात ऐशारामी कर लावायला हवा. त्याचबरोबर काय खावे काय नको, याबाबत मोठ्या प्रमाणात जनप्रबोधन मोहीम हाती घ्यायला हवी. कोल्हापुरातील शिवाजी मराठा हायस्कूलचे शिक्षक आणि चिल्लर पार्टी चळवळीचे मिलिंद यादव हे चळवळीच्या कोणत्याही कार्यक्रमात सुरुवातीला जंक फूडचे दुष्परिणाम सांगून मुलांना घरी बनविलेले पदार्थच खा, असे सांगत असतात. वैयक्तिक पातळीवर काहीजण अशी मोहीम राबवित असले तरी समाजानेही त्याला साथ द्यायला हवी. शासनानेही याबाबत योग्य ती पावले उचलायला हवीत, तरच आपले पर्यायाने समाजाचे आरोग्य चांगले राहील.- चंद्रकांत कित्तुरे    kollokmatpratisad@gmail.com