शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

कोल्हापूर पूर्वपदाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:59 IST

कोल्हापूर : शहरासह आसपासच्या परिसरातील पूर ओसरू लागला असून, कोल्हापूर पूर्वपदाकडे निघाले आहे. शिरोली येथे राष्टÑीय महामार्गावर तीन फूट ...

कोल्हापूर : शहरासह आसपासच्या परिसरातील पूर ओसरू लागला असून, कोल्हापूर पूर्वपदाकडे निघाले आहे. शिरोली येथे राष्टÑीय महामार्गावर तीन फूट पाणी असल्याने तो रविवारीही बंद राहीला. आज, सोमवारी पाणी पातळी कमी झाल्यावर महामार्ग सुरू होण्याची शक्यता असून, इंधनाची वाहने प्राधान्याने सोडली जाणार आहेत. शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थिती गंभीर असून, मदतकार्य वेगाने सुरू आहे. रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर व कर्नाटकची हवाई पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली. ‘गोकुळ’ दूध संघाने कोकणमार्गे मुंबईकडे दोन लाख लिटर दूध रवाना केले. आजअखेर पुरामुळे सहाजणांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यातील पूर ओसरू लागला असून, शहरासह आसपासच्या भागातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शहरातील गवत मंडई येथील पाणी ओसरल्याने येथून वाहतूक सुरू झाली. पाणी ओसरलेल्या भागात स्वच्छता मोहीम गतीमान करण्यात आली आहे. त्याचबरोबर भुदरगड, गडहिंग्लज, कागल येथील काही मार्ग पाणी ओसरल्यामुळे सुरू झाले. गेले सहा दिवस महामार्ग बंद असल्याने ‘गोकुळ’चे टॅँकर मुंबईकडे गेले नसल्याने नुकसान झाले होते; त्यामुळे कोकणमार्गे रविवारी दोन लाख लिटर दूध टॅँकरद्वारे मुंबईला पाठविले. कोल्हापूर जिल्ह्यातील व कर्नाटकातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विमानाद्वारे हवाई पाहणी करून आढावा घेतला. शिरोळ तालुक्यातील पूरस्थिती अजूनही गंभीरच आहे. या ठिकाणी मदतकार्य गतीने वाढविण्यात आले असून, बोटींची संख्याही वाढविण्यात आली आहे. सकाळी २५ तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक मुंबईहून कोल्हापुरात दाखल झाले असून, ते शिरोळकडे पाठविण्यात आले. शिरोली येथे अजूनही तीन फूट पाणी असल्याने महामार्ग बंद राहिला; परंतु आपत्ती व्यवस्थापनात असलेल्या विमानांसह वाहनांसाठी इंधनाची तातडीची आवश्यकता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन दिवसभरात तीनवेळा पाहणी केली. यावेळी चाचणीद्वारे पोकलॅनच्या सहाय्याने इंधनाचे पाच टॅँकर व सिलिंडरचे एक वाहन शिरोलीतून कोल्हापुरात आणण्यात आले.जीवनावश्यक वस्तूंची अभूतपूर्व टंचाईशहरात जीवनावश्यक वस्तूंची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली असून, त्यावर प्रशासकीय यंत्रणेचे नियंत्रण राहिलेले नाही. पुणे-बंगलोर राष्टÑीय महामार्ग बंद असल्याने टंचाई दूर करण्यात अपयश येत आहे. पेट्रोल-डिझेल, भाजीपाला, पिण्याचे पाणी याची मोठी टंचाई आहे. गॅस, भाजीपाला, पिण्याचे पाणी, वीज नाही; त्यामुळे हॉटेल व्यवसाय कसा सुरू करायचा, असा प्रश्न पडलेल्या व्यावसायिकांनी आपले व्यवसायच बंद ठेवले.प्रशासनाचा कारभार ‘ढिम्म’च: उल्हास पाटीलकोयना धरण ८0 टक्के भरल्यानंतर ३१ जुलैला शिरोळ तालुक्याला महापुराचा धोका असल्याचा इशारा मी जिल्हाधिकारी यांना भेटून दिला होता. तसे लेखी पत्रही दिले होते. मात्र त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे या परिस्थितीला प्रशासनाचा ‘ढिम्म’ कारभार कारणीभूत आहे, असा आरोप आमदार उल्हास पाटील यांनी रविवारी केला. -