शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

कोल्हापूर पूर्वपदाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:59 IST

कोल्हापूर : शहरासह आसपासच्या परिसरातील पूर ओसरू लागला असून, कोल्हापूर पूर्वपदाकडे निघाले आहे. शिरोली येथे राष्टÑीय महामार्गावर तीन फूट ...

कोल्हापूर : शहरासह आसपासच्या परिसरातील पूर ओसरू लागला असून, कोल्हापूर पूर्वपदाकडे निघाले आहे. शिरोली येथे राष्टÑीय महामार्गावर तीन फूट पाणी असल्याने तो रविवारीही बंद राहीला. आज, सोमवारी पाणी पातळी कमी झाल्यावर महामार्ग सुरू होण्याची शक्यता असून, इंधनाची वाहने प्राधान्याने सोडली जाणार आहेत. शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थिती गंभीर असून, मदतकार्य वेगाने सुरू आहे. रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर व कर्नाटकची हवाई पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली. ‘गोकुळ’ दूध संघाने कोकणमार्गे मुंबईकडे दोन लाख लिटर दूध रवाना केले. आजअखेर पुरामुळे सहाजणांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यातील पूर ओसरू लागला असून, शहरासह आसपासच्या भागातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शहरातील गवत मंडई येथील पाणी ओसरल्याने येथून वाहतूक सुरू झाली. पाणी ओसरलेल्या भागात स्वच्छता मोहीम गतीमान करण्यात आली आहे. त्याचबरोबर भुदरगड, गडहिंग्लज, कागल येथील काही मार्ग पाणी ओसरल्यामुळे सुरू झाले. गेले सहा दिवस महामार्ग बंद असल्याने ‘गोकुळ’चे टॅँकर मुंबईकडे गेले नसल्याने नुकसान झाले होते; त्यामुळे कोकणमार्गे रविवारी दोन लाख लिटर दूध टॅँकरद्वारे मुंबईला पाठविले. कोल्हापूर जिल्ह्यातील व कर्नाटकातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विमानाद्वारे हवाई पाहणी करून आढावा घेतला. शिरोळ तालुक्यातील पूरस्थिती अजूनही गंभीरच आहे. या ठिकाणी मदतकार्य गतीने वाढविण्यात आले असून, बोटींची संख्याही वाढविण्यात आली आहे. सकाळी २५ तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक मुंबईहून कोल्हापुरात दाखल झाले असून, ते शिरोळकडे पाठविण्यात आले. शिरोली येथे अजूनही तीन फूट पाणी असल्याने महामार्ग बंद राहिला; परंतु आपत्ती व्यवस्थापनात असलेल्या विमानांसह वाहनांसाठी इंधनाची तातडीची आवश्यकता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन दिवसभरात तीनवेळा पाहणी केली. यावेळी चाचणीद्वारे पोकलॅनच्या सहाय्याने इंधनाचे पाच टॅँकर व सिलिंडरचे एक वाहन शिरोलीतून कोल्हापुरात आणण्यात आले.जीवनावश्यक वस्तूंची अभूतपूर्व टंचाईशहरात जीवनावश्यक वस्तूंची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली असून, त्यावर प्रशासकीय यंत्रणेचे नियंत्रण राहिलेले नाही. पुणे-बंगलोर राष्टÑीय महामार्ग बंद असल्याने टंचाई दूर करण्यात अपयश येत आहे. पेट्रोल-डिझेल, भाजीपाला, पिण्याचे पाणी याची मोठी टंचाई आहे. गॅस, भाजीपाला, पिण्याचे पाणी, वीज नाही; त्यामुळे हॉटेल व्यवसाय कसा सुरू करायचा, असा प्रश्न पडलेल्या व्यावसायिकांनी आपले व्यवसायच बंद ठेवले.प्रशासनाचा कारभार ‘ढिम्म’च: उल्हास पाटीलकोयना धरण ८0 टक्के भरल्यानंतर ३१ जुलैला शिरोळ तालुक्याला महापुराचा धोका असल्याचा इशारा मी जिल्हाधिकारी यांना भेटून दिला होता. तसे लेखी पत्रही दिले होते. मात्र त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे या परिस्थितीला प्रशासनाचा ‘ढिम्म’ कारभार कारणीभूत आहे, असा आरोप आमदार उल्हास पाटील यांनी रविवारी केला. -