शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पृथ्वी माझी माता ! मी तिचा रक्षणकर्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:05 IST

भारत पाटील ‘आरोग्य सौख्य नांदेल घराघरा! जर निरोगी असेल वसुंधरा!’ सजीव सृष्टी व समृद्ध निसर्गसंपत्ती असलेला सूर्यमालेतील ‘पृथ्वी’ हा ...

भारत पाटील‘आरोग्य सौख्य नांदेल घराघरा! जर निरोगी असेल वसुंधरा!’ सजीव सृष्टी व समृद्ध निसर्गसंपत्ती असलेला सूर्यमालेतील ‘पृथ्वी’ हा एकमेव ग्रह आहे. हवा, पाणी, जंगले व विविध साधनसंपत्ती निसर्गाने आपणाला भरभरून दिली आहे; परंतु आपण मानवाने प्रगतीच्या नावाखाली राक्षसी महत्त्वाकांक्षेचा अंगीकार केल्यामुळे निसर्गाची व पर्यावरणाची आपण सर्वांनी खूप मोठी हानी केली आहे. आपल्या डोळ्यांवर विकासाची धुंदी चढली आहे. या धुंदीमध्ये आपण हवा, पाणी व जमीन यांसह सर्व निसर्गचक्रामध्ये खूप हस्तक्षेप केल्यामुळे आज पर्यावरणाचा पूर्णत: समतोल ढासळला आहे. यामुळे जागतिक तपमान वाढ, प्रदूषण व नैसर्गिक आपत्ती यांमुळे पृथ्वी व त्यावर राहणारी सगळी सजीव सृष्टीच धोक्यात आली आहे.१९६९ मध्ये कॅलिफॉनिर्या येथील सांता बार्बरा समुद्रात तेल गळती झाल्यामुळे पाण्यावर तवंग आला होता. यामुळे मोठे प्रदूषण झाले होते. यामुळे समुद्रातील जीवसृष्टी मोठ्या प्रमाणात नाश पावली होती. या प्रदूषण आपत्तीमुळे लोकांमध्ये खूप नाराजी व घबराट पसरली होती. या गंभीर समस्येवर लोकांचे प्रबोधन करावे, लोकजागर करावा, यासाठी अमेरिकेतील विन्स्कोन्सिन राज्याचे सिनेटर गेलोर्ड नेल्सन यांनी पहिल्यांदा २२ एप्रिल १९७0 रोजी ‘वसुंधरा दिन’ साजरा केला. त्यावेळी लोकांमध्ये जनजागरण करण्यासाठी एं१३ँ ऊं८ ठी३६ङ्म१’ (एऊठ) या संस्थेची स्थापना केली. हवा, जमीन व पाणी निरोगी व स्वच्छ राहावे, शाश्वत व संतुलित पर्यावरण मानवाला मिळावे, यासाठी ही संस्था सतत काम करीत आहे. हवेतील ‘कार्बनचे उत्सर्जन व ओझोन वायूचा ºहास ही जागतिक तपमान वाढीची प्रमुख कारणे आहेत.’ यासाठी १९८५ मध्ये कार्बनची निर्मिती व उत्सर्जन याविषयी व्हिएन्ना येथील परिषदेमध्ये सर्व देशांमध्ये एक करार करण्यात आला. वाढत्या तापमानामुळे पूर्णत: निसर्गचक्रच बिघडले आहे. यामुळे ग्लोबल वॉर्मिंग, ओला व सुका दुष्काळ, हिमाच्छादित प्रदेशातील बर्फ झपाट्याने वितळले जातेय. यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ, ढगफुटी, महापूर, हवेचे, पाण्याचे व जमिनीचे प्रदूषण ही संकटे निर्माण झाली आहेत. यामुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टीबरोबरच पृथ्वीचेच अस्तित्व धोक्यात आले आहे. भविष्यातील या संकटामुळे सर्व जग आता खडबडून जागे झाले आहे आणि यामुळेच १९९0 साली जगतील १४१ देशांतील जवळजवळ २0 कोटी लोक ‘वसुंधरादिना’मध्ये सहभागी झाले होते. टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करून फीू८ू’ी आणि फी४२ी ही नवीन संकल्पना समोर आली आहे. कार्बन, प्लास्टिक व प्रदूषण यावरती सखोल चर्चा सुरू झाल्या. संयुक्त राष्ट्रसंघाच्यावतीने १९९२ ला जागतिक वसुंधरा शिखर परिषद घेण्यात आली. यामध्ये जागतिक तपमान वाढ, पर्यावरण, पाणी, जंगल संपत्ती, प्रदूषण व हवामानातील होणारे बदल याविषयी गंभीर दखल घेण्यात आली. ‘४0 वा वसुंधरादिन’ हा चीनमधील बिन्जिग शहरात घेण्यात आला. त्यावेळी १९२ देश सहभागी झाले होते. त्यावेळी वनसंपदा, कार्बन क्रेडिट, कार्बन उत्सर्जन याचे मानवावर होणारे दुष्परिणाम व शुद्ध हवा, शुद्ध पाणी यावरती सूक्ष्म अभ्यास करण्यात आला. यातून ‘अ इ्र’’्रंल्ल अू३२ ङ्मा ॠ१ीील्ल’ या लोकचळवळीला चालना मिळाली. पृथ्वी वाचविली तरंच आपण जिवंत राहू, हे सत्य आता समजून आले आहे. ‘पृथ्वी माझी माता! मी तिचा रक्षण कर्ता!’ ही पवित्र भूमिका आपणाला साकारावी लागणार आहे. यासाठी पर्यावरण, प्रदूषण, वृक्षारोपण, जंगलतोड, पाण्याचे महत्त्व, वापर या बाबींवर प्रभावी कार्यक्रम राबविणे ही सर्वांच्या हिताचे गरजेचे बनले आहे.(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्ती चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते आहेत)