शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

पृथ्वी माझी माता ! मी तिचा रक्षणकर्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:05 IST

भारत पाटील ‘आरोग्य सौख्य नांदेल घराघरा! जर निरोगी असेल वसुंधरा!’ सजीव सृष्टी व समृद्ध निसर्गसंपत्ती असलेला सूर्यमालेतील ‘पृथ्वी’ हा ...

भारत पाटील‘आरोग्य सौख्य नांदेल घराघरा! जर निरोगी असेल वसुंधरा!’ सजीव सृष्टी व समृद्ध निसर्गसंपत्ती असलेला सूर्यमालेतील ‘पृथ्वी’ हा एकमेव ग्रह आहे. हवा, पाणी, जंगले व विविध साधनसंपत्ती निसर्गाने आपणाला भरभरून दिली आहे; परंतु आपण मानवाने प्रगतीच्या नावाखाली राक्षसी महत्त्वाकांक्षेचा अंगीकार केल्यामुळे निसर्गाची व पर्यावरणाची आपण सर्वांनी खूप मोठी हानी केली आहे. आपल्या डोळ्यांवर विकासाची धुंदी चढली आहे. या धुंदीमध्ये आपण हवा, पाणी व जमीन यांसह सर्व निसर्गचक्रामध्ये खूप हस्तक्षेप केल्यामुळे आज पर्यावरणाचा पूर्णत: समतोल ढासळला आहे. यामुळे जागतिक तपमान वाढ, प्रदूषण व नैसर्गिक आपत्ती यांमुळे पृथ्वी व त्यावर राहणारी सगळी सजीव सृष्टीच धोक्यात आली आहे.१९६९ मध्ये कॅलिफॉनिर्या येथील सांता बार्बरा समुद्रात तेल गळती झाल्यामुळे पाण्यावर तवंग आला होता. यामुळे मोठे प्रदूषण झाले होते. यामुळे समुद्रातील जीवसृष्टी मोठ्या प्रमाणात नाश पावली होती. या प्रदूषण आपत्तीमुळे लोकांमध्ये खूप नाराजी व घबराट पसरली होती. या गंभीर समस्येवर लोकांचे प्रबोधन करावे, लोकजागर करावा, यासाठी अमेरिकेतील विन्स्कोन्सिन राज्याचे सिनेटर गेलोर्ड नेल्सन यांनी पहिल्यांदा २२ एप्रिल १९७0 रोजी ‘वसुंधरा दिन’ साजरा केला. त्यावेळी लोकांमध्ये जनजागरण करण्यासाठी एं१३ँ ऊं८ ठी३६ङ्म१’ (एऊठ) या संस्थेची स्थापना केली. हवा, जमीन व पाणी निरोगी व स्वच्छ राहावे, शाश्वत व संतुलित पर्यावरण मानवाला मिळावे, यासाठी ही संस्था सतत काम करीत आहे. हवेतील ‘कार्बनचे उत्सर्जन व ओझोन वायूचा ºहास ही जागतिक तपमान वाढीची प्रमुख कारणे आहेत.’ यासाठी १९८५ मध्ये कार्बनची निर्मिती व उत्सर्जन याविषयी व्हिएन्ना येथील परिषदेमध्ये सर्व देशांमध्ये एक करार करण्यात आला. वाढत्या तापमानामुळे पूर्णत: निसर्गचक्रच बिघडले आहे. यामुळे ग्लोबल वॉर्मिंग, ओला व सुका दुष्काळ, हिमाच्छादित प्रदेशातील बर्फ झपाट्याने वितळले जातेय. यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ, ढगफुटी, महापूर, हवेचे, पाण्याचे व जमिनीचे प्रदूषण ही संकटे निर्माण झाली आहेत. यामुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टीबरोबरच पृथ्वीचेच अस्तित्व धोक्यात आले आहे. भविष्यातील या संकटामुळे सर्व जग आता खडबडून जागे झाले आहे आणि यामुळेच १९९0 साली जगतील १४१ देशांतील जवळजवळ २0 कोटी लोक ‘वसुंधरादिना’मध्ये सहभागी झाले होते. टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करून फीू८ू’ी आणि फी४२ी ही नवीन संकल्पना समोर आली आहे. कार्बन, प्लास्टिक व प्रदूषण यावरती सखोल चर्चा सुरू झाल्या. संयुक्त राष्ट्रसंघाच्यावतीने १९९२ ला जागतिक वसुंधरा शिखर परिषद घेण्यात आली. यामध्ये जागतिक तपमान वाढ, पर्यावरण, पाणी, जंगल संपत्ती, प्रदूषण व हवामानातील होणारे बदल याविषयी गंभीर दखल घेण्यात आली. ‘४0 वा वसुंधरादिन’ हा चीनमधील बिन्जिग शहरात घेण्यात आला. त्यावेळी १९२ देश सहभागी झाले होते. त्यावेळी वनसंपदा, कार्बन क्रेडिट, कार्बन उत्सर्जन याचे मानवावर होणारे दुष्परिणाम व शुद्ध हवा, शुद्ध पाणी यावरती सूक्ष्म अभ्यास करण्यात आला. यातून ‘अ इ्र’’्रंल्ल अू३२ ङ्मा ॠ१ीील्ल’ या लोकचळवळीला चालना मिळाली. पृथ्वी वाचविली तरंच आपण जिवंत राहू, हे सत्य आता समजून आले आहे. ‘पृथ्वी माझी माता! मी तिचा रक्षण कर्ता!’ ही पवित्र भूमिका आपणाला साकारावी लागणार आहे. यासाठी पर्यावरण, प्रदूषण, वृक्षारोपण, जंगलतोड, पाण्याचे महत्त्व, वापर या बाबींवर प्रभावी कार्यक्रम राबविणे ही सर्वांच्या हिताचे गरजेचे बनले आहे.(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्ती चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते आहेत)