शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
2
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
3
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
4
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
5
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
6
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
7
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
8
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
9
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
10
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
11
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
12
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
13
सीएसएमटी परिसरातून अखेर दोन दिवसांनी धावली वाहने
14
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
15
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
16
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
17
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
18
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
19
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
20
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!

गलेलठ्ठ पगार, तरीही अपहाराची बुद्धी ?

By admin | Updated: August 11, 2016 00:33 IST

कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबद्दल संताप : जिल्हा बॅँकेच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह

कोल्हापूर : ‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ पगार असूनही त्यांना अपहार करण्याची बुद्धी होतेच कशी?’ असा संतप्त सवाल बॅँकेचे ठेवीदार व ग्राहकांमधून केला जात आहे. दर तीन-चार महिन्यांतून असा एखादा प्रकार घडतच असल्याने बॅँकेच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शेतकरी, बचत गटाच्या महिला यांसह सामान्य ग्राहक जिल्हा बॅँकेशी संलग्न आहेत. ग्रामीण भागात खेडोपाडी शाखा असल्याने जिल्हा बॅँक ही सामान्य माणसाला आपली बॅँक वाटते; पण या बॅँकेत त्या पद्धतीने सेवा दिली जाते का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. जिल्हा बॅँकेसमोर खासगी व राष्ट्रीयीकृत बॅँकांचे आव्हान आहे. खासगी बॅँका थेट ग्राहकांच्या दारात पोहोचल्या आहेत. अशा परिस्थितीत अधिकाधिक ग्राहकाभिमुख सेवा देणे गरजेचे असताना तसे होत नाही. उलट अपहार करून ग्राहकांना वेठीस धरण्याचे प्रकार वाढत आहेत. ही बाब बॅँकेच्या दृष्टीने ‘चिंते’ची तर संचालकांच्या दृष्टीने ‘चिंतना’ची आहे. राज्यात कोणत्याही जिल्हा बॅँकेतील कर्मचाऱ्यांना पगार नाहीत, तेवढे पगार कोल्हापूर जिल्हा बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना आहेत. येथे कर्मचाऱ्यांना २५ हजारांपासून ५० हजारांपर्यंत पगार आहेत. तरीही या कर्मचाऱ्यांना बॅँकेत अपहार करण्याची बुद्धी सुचतेच कशी? गेल्या आठवड्यात राशिवडे (ता. राधानगरी) शाखेत एका कर्मचाऱ्याने दोन संस्थांनी भरावयास दिलेल्या रकमेचे चलन केले आणि ती परस्पर हडप केली. प्रथमदर्शनी तीन लाखांचा अपहार असला तरी बॅँकेतर्फे त्याची चौकशी सुरू आहे. यामध्ये आणखी आकडा वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अपहाराचे अनेक प्रकार झाले आहेत; पण ते दडपण्याचे काम झाल्याने कर्मचाऱ्यांवर कोणाचा धाक नसल्याची चर्चा सुरू आहे. गलेलठ्ठ पगार असूनही सामान्य माणसाच्या पैशांवर हात मारण्याची बुद्धी कर्मचाऱ्यांना होतेच कशी? बॅँक प्रशासनही संबंधित कर्मचाऱ्यांकडून वसुली करून त्यावर पडदा टाकण्यासाठीच प्रयत्न करीत असल्याने पुन:पुन्हा असे प्रकार होत आहेत. बॅँकेचे संचालक पाच हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. बॅँकेकडे ठेवी या फक्त विश्वासावर येतात; पण असे अपहाराचे प्रकार होत असतील तर ग्राहकांवर त्याचा विपरीत परिणाम होतो, याचे भान संचालकांनी व त्यांनी लाडावून ठेवलेल्या कर्मचाऱ्यांनी ठेवणे गरजेचे आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई केली तरच अशा प्रवृत्तीला चाप बसेल. (प्रतिनिधी)