शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

गलेलठ्ठ पगार, तरीही अपहाराची बुद्धी ?

By admin | Updated: August 11, 2016 00:33 IST

कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबद्दल संताप : जिल्हा बॅँकेच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह

कोल्हापूर : ‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ पगार असूनही त्यांना अपहार करण्याची बुद्धी होतेच कशी?’ असा संतप्त सवाल बॅँकेचे ठेवीदार व ग्राहकांमधून केला जात आहे. दर तीन-चार महिन्यांतून असा एखादा प्रकार घडतच असल्याने बॅँकेच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शेतकरी, बचत गटाच्या महिला यांसह सामान्य ग्राहक जिल्हा बॅँकेशी संलग्न आहेत. ग्रामीण भागात खेडोपाडी शाखा असल्याने जिल्हा बॅँक ही सामान्य माणसाला आपली बॅँक वाटते; पण या बॅँकेत त्या पद्धतीने सेवा दिली जाते का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. जिल्हा बॅँकेसमोर खासगी व राष्ट्रीयीकृत बॅँकांचे आव्हान आहे. खासगी बॅँका थेट ग्राहकांच्या दारात पोहोचल्या आहेत. अशा परिस्थितीत अधिकाधिक ग्राहकाभिमुख सेवा देणे गरजेचे असताना तसे होत नाही. उलट अपहार करून ग्राहकांना वेठीस धरण्याचे प्रकार वाढत आहेत. ही बाब बॅँकेच्या दृष्टीने ‘चिंते’ची तर संचालकांच्या दृष्टीने ‘चिंतना’ची आहे. राज्यात कोणत्याही जिल्हा बॅँकेतील कर्मचाऱ्यांना पगार नाहीत, तेवढे पगार कोल्हापूर जिल्हा बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना आहेत. येथे कर्मचाऱ्यांना २५ हजारांपासून ५० हजारांपर्यंत पगार आहेत. तरीही या कर्मचाऱ्यांना बॅँकेत अपहार करण्याची बुद्धी सुचतेच कशी? गेल्या आठवड्यात राशिवडे (ता. राधानगरी) शाखेत एका कर्मचाऱ्याने दोन संस्थांनी भरावयास दिलेल्या रकमेचे चलन केले आणि ती परस्पर हडप केली. प्रथमदर्शनी तीन लाखांचा अपहार असला तरी बॅँकेतर्फे त्याची चौकशी सुरू आहे. यामध्ये आणखी आकडा वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अपहाराचे अनेक प्रकार झाले आहेत; पण ते दडपण्याचे काम झाल्याने कर्मचाऱ्यांवर कोणाचा धाक नसल्याची चर्चा सुरू आहे. गलेलठ्ठ पगार असूनही सामान्य माणसाच्या पैशांवर हात मारण्याची बुद्धी कर्मचाऱ्यांना होतेच कशी? बॅँक प्रशासनही संबंधित कर्मचाऱ्यांकडून वसुली करून त्यावर पडदा टाकण्यासाठीच प्रयत्न करीत असल्याने पुन:पुन्हा असे प्रकार होत आहेत. बॅँकेचे संचालक पाच हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. बॅँकेकडे ठेवी या फक्त विश्वासावर येतात; पण असे अपहाराचे प्रकार होत असतील तर ग्राहकांवर त्याचा विपरीत परिणाम होतो, याचे भान संचालकांनी व त्यांनी लाडावून ठेवलेल्या कर्मचाऱ्यांनी ठेवणे गरजेचे आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई केली तरच अशा प्रवृत्तीला चाप बसेल. (प्रतिनिधी)