शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

गलेलठ्ठ पगार, तरीही अपहाराची बुद्धी ?

By admin | Updated: August 11, 2016 00:33 IST

कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबद्दल संताप : जिल्हा बॅँकेच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह

कोल्हापूर : ‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ पगार असूनही त्यांना अपहार करण्याची बुद्धी होतेच कशी?’ असा संतप्त सवाल बॅँकेचे ठेवीदार व ग्राहकांमधून केला जात आहे. दर तीन-चार महिन्यांतून असा एखादा प्रकार घडतच असल्याने बॅँकेच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शेतकरी, बचत गटाच्या महिला यांसह सामान्य ग्राहक जिल्हा बॅँकेशी संलग्न आहेत. ग्रामीण भागात खेडोपाडी शाखा असल्याने जिल्हा बॅँक ही सामान्य माणसाला आपली बॅँक वाटते; पण या बॅँकेत त्या पद्धतीने सेवा दिली जाते का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. जिल्हा बॅँकेसमोर खासगी व राष्ट्रीयीकृत बॅँकांचे आव्हान आहे. खासगी बॅँका थेट ग्राहकांच्या दारात पोहोचल्या आहेत. अशा परिस्थितीत अधिकाधिक ग्राहकाभिमुख सेवा देणे गरजेचे असताना तसे होत नाही. उलट अपहार करून ग्राहकांना वेठीस धरण्याचे प्रकार वाढत आहेत. ही बाब बॅँकेच्या दृष्टीने ‘चिंते’ची तर संचालकांच्या दृष्टीने ‘चिंतना’ची आहे. राज्यात कोणत्याही जिल्हा बॅँकेतील कर्मचाऱ्यांना पगार नाहीत, तेवढे पगार कोल्हापूर जिल्हा बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना आहेत. येथे कर्मचाऱ्यांना २५ हजारांपासून ५० हजारांपर्यंत पगार आहेत. तरीही या कर्मचाऱ्यांना बॅँकेत अपहार करण्याची बुद्धी सुचतेच कशी? गेल्या आठवड्यात राशिवडे (ता. राधानगरी) शाखेत एका कर्मचाऱ्याने दोन संस्थांनी भरावयास दिलेल्या रकमेचे चलन केले आणि ती परस्पर हडप केली. प्रथमदर्शनी तीन लाखांचा अपहार असला तरी बॅँकेतर्फे त्याची चौकशी सुरू आहे. यामध्ये आणखी आकडा वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अपहाराचे अनेक प्रकार झाले आहेत; पण ते दडपण्याचे काम झाल्याने कर्मचाऱ्यांवर कोणाचा धाक नसल्याची चर्चा सुरू आहे. गलेलठ्ठ पगार असूनही सामान्य माणसाच्या पैशांवर हात मारण्याची बुद्धी कर्मचाऱ्यांना होतेच कशी? बॅँक प्रशासनही संबंधित कर्मचाऱ्यांकडून वसुली करून त्यावर पडदा टाकण्यासाठीच प्रयत्न करीत असल्याने पुन:पुन्हा असे प्रकार होत आहेत. बॅँकेचे संचालक पाच हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. बॅँकेकडे ठेवी या फक्त विश्वासावर येतात; पण असे अपहाराचे प्रकार होत असतील तर ग्राहकांवर त्याचा विपरीत परिणाम होतो, याचे भान संचालकांनी व त्यांनी लाडावून ठेवलेल्या कर्मचाऱ्यांनी ठेवणे गरजेचे आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई केली तरच अशा प्रवृत्तीला चाप बसेल. (प्रतिनिधी)