शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

शाळांतून संकलित होणारा 'ई कचरा'

By admin | Updated: December 17, 2014 23:58 IST

‘रोटरी क्लब आॅफ करवीर’चा उपक्रम

कोल्हापूर : जागतिक पातळीवर ई कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, त्याबाबत समाजात जागृती निर्माण करण्याच्या हेतूने येथील रोटरी क्लब आॅफ करवीरच्यावतीने २० डिसेंबर व २३ जुलै अशा दोन दिवशी ‘ई कचरा संकलन’ उपक्रम आयोजित करण्यात आला असून, या उपक्रमात शहरातील २३३ शाळांतील हजारो विद्यार्थी सहभागी होत असल्याची माहिती रोटरी करवीरचे अध्यक्ष हरेश पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितली. ई कचरा ठेवायला जागा मिळत नाही, या वस्तू दररोजच्या कचऱ्यात सापडतात. ओल्या कचऱ्यात अशा वस्तू मिसळल्यामुळे त्याचा मानवी शरीरावर परिणाम होतो. ई कचरा जळून किंवा जमिनीत पुरूनही नष्ट होत नाहीत. त्या उघड्यावरही टाकून चालत नाही. ई कचऱ्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. त्यासाठी समाजात जागृती करण्याच्या हेतूने २० डिसेंबरला संत गाडगेबाबा पुण्यतिथीदिनी तर २३ जुलै ‘वनसंवर्धन दिन’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शहरातील महानगरपालिका, खासगी शाळांतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या घर, परिसरातील ई कचरा आणून तो शाळेत जमा करायचा आहे. शाळांमध्ये ‘रोटरी’तर्फे मोठ्या आकाराची पितळी पिशव्या देण्यात येणार असून, त्या पिशवीत ई-कचरा टाकायचा आहे. हा कचरा त्याच दिवशी सायंकाळपर्यंत एका ठिकाणी संकलित करून ठेवला जाईल नंतर तो टेंडर काढून विकण्यात येणार असल्याचे एस. एन. पाटील यांनी सांगितले. पर्यावरणसंबंधित या उपक्रमात भाग घेऊन जास्तीत जास्त ई कचरा संकलित करणाऱ्या शाळेस रोटरी ‘आंतरराष्ट्रीय कम्युनिटी सर्व्हिस अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमास महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ , जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग यांचे सहकार्य मिळाले असून ‘रोटरी’चे १२० स्वयंसेवक त्यात भाग घेणार आहेत. यावेळी प्रमोद चौगले यांनी उपक्रमाबाबत प्रेझेंटेशन दिले. (प्रतिनिधी)