शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शाळांतून संकलित होणारा 'ई कचरा'

By admin | Updated: December 17, 2014 23:58 IST

‘रोटरी क्लब आॅफ करवीर’चा उपक्रम

कोल्हापूर : जागतिक पातळीवर ई कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, त्याबाबत समाजात जागृती निर्माण करण्याच्या हेतूने येथील रोटरी क्लब आॅफ करवीरच्यावतीने २० डिसेंबर व २३ जुलै अशा दोन दिवशी ‘ई कचरा संकलन’ उपक्रम आयोजित करण्यात आला असून, या उपक्रमात शहरातील २३३ शाळांतील हजारो विद्यार्थी सहभागी होत असल्याची माहिती रोटरी करवीरचे अध्यक्ष हरेश पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितली. ई कचरा ठेवायला जागा मिळत नाही, या वस्तू दररोजच्या कचऱ्यात सापडतात. ओल्या कचऱ्यात अशा वस्तू मिसळल्यामुळे त्याचा मानवी शरीरावर परिणाम होतो. ई कचरा जळून किंवा जमिनीत पुरूनही नष्ट होत नाहीत. त्या उघड्यावरही टाकून चालत नाही. ई कचऱ्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. त्यासाठी समाजात जागृती करण्याच्या हेतूने २० डिसेंबरला संत गाडगेबाबा पुण्यतिथीदिनी तर २३ जुलै ‘वनसंवर्धन दिन’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शहरातील महानगरपालिका, खासगी शाळांतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या घर, परिसरातील ई कचरा आणून तो शाळेत जमा करायचा आहे. शाळांमध्ये ‘रोटरी’तर्फे मोठ्या आकाराची पितळी पिशव्या देण्यात येणार असून, त्या पिशवीत ई-कचरा टाकायचा आहे. हा कचरा त्याच दिवशी सायंकाळपर्यंत एका ठिकाणी संकलित करून ठेवला जाईल नंतर तो टेंडर काढून विकण्यात येणार असल्याचे एस. एन. पाटील यांनी सांगितले. पर्यावरणसंबंधित या उपक्रमात भाग घेऊन जास्तीत जास्त ई कचरा संकलित करणाऱ्या शाळेस रोटरी ‘आंतरराष्ट्रीय कम्युनिटी सर्व्हिस अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमास महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ , जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग यांचे सहकार्य मिळाले असून ‘रोटरी’चे १२० स्वयंसेवक त्यात भाग घेणार आहेत. यावेळी प्रमोद चौगले यांनी उपक्रमाबाबत प्रेझेंटेशन दिले. (प्रतिनिधी)