शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

खतांची विक्री ई पॉज मशीनने

By admin | Updated: April 17, 2017 23:50 IST

गैरप्रकारांना बसणार आळा : १ जूनपासून संपूर्ण राज्यात होणार अंमलबजावणी

आयुब मुल्ला ल्ल खोचीरासायनिक खतांची विक्री आता शेतकऱ्यांना विक्रेत्यांनी ई पॉज मशीनद्वारेच करणे बंधनकारक होणार आहे. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी १ जूनपासून संपूर्ण राज्यात होणार आहे. त्यामुळे रासायनिक खतांवर मिळणाऱ्या शासनाच्या अनुदानावर डल्ला मारण्याच्या पद्धतीस आळा बसणार आहे. खतविक्रीच पारदर्शी होणार असल्याने नेमकी विक्री व अनुदान यांचा आता मेळ बसणे शक्य होईल. केंद्र सरकार शेतकऱ्यांना रासायनिक खतांवर अनुदान देते. किमान ५० टक्क्यांपर्यंत अनुदानाचा रेशिओ आहे. हे अनुदान खतविक्रेत्यांना मिळते. म्हणजे विक्रेते अनुदानाची रक्कम वजा जाता उरलेली रक्कम स्वीकारतात. परंतु यामध्ये प्रचंड गोलमाल झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यानुसार शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रासायनिक खतांची विक्री पारदर्शी होत नसल्याने हे धोरण पुढे आले आहे. शेतकरी प्रत्यक्ष खरेदी करीत होता, त्या तुलनेत खतांची उपलब्धता विक्रेत्यांकडे असते. किंबहुना अधिकही असू शकते. त्यामुळे काही खतांची विक्री काळ्या बाजाराने होते. औद्योगिक वापरासाठीही ती विकली जातात. हा वापर वेगळ्या पद्धतीने होतो. त्यावरचे अनुदान मात्र विक्रेते लाटतात. म्हणजे विक्री जादा दराने करून अनुदानही मिळवायची म्हणजे ‘डल्ला डबल’ करण्याची पद्धत रूढ झाली आहे. याचा सर्व अभ्यास कृषी विभागाने केला. त्यानुसार ही पद्धत राबविण्याचा निर्णय झाला. प्रायोगिकतत्त्वावर असा प्रकल्प शासनाने नाशिक व रायगड जिल्ह्यांत राबविला. देशात सोळा जिल्ह्यांत तो राबविला; त्यामध्ये हे दोन जिल्हे होते. त्यास यश आल्याने संपूर्ण राज्यातच आता याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अशी आहे प्रक्रिया 1 विक्रेत्यांना शासन पीओएस हे १७ हजार रुपये किमतीचे मशीन मोफत देणार. त्यासाठी विक्रेत्यांनी एमएफएस या वेबसाईटवर १५ एप्रिल २०१७ पर्यंत आॅनलाईन नोंदणी करावयाची आहे. त्याद्वारे प्राप्त झालेला सहा अंकी आयडी क्रमांक तालुका कृषी अधिकारी (पंचायत समिती) यांना कळवावा. 2 जे नोंदणी करणार नाहीत त्यांना खतांची विक्री करता येणार नाही. शेतकऱ्यांनी खरेदीस जाताना आधारकार्ड नेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या बोटाचा ठसा पीओएस मशीनवर घेऊन आधारकार्ड नंबर नोंद करावयाचा आहे. 3 असे झाले तरच विक्रीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर शेतकऱ्याने रक्कम अनुदान वजा जाता द्यावयाची आहे. यामुळे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांची प्रत्यक्षात माहिती शासनाला मिळणे सोपे होणार आहे.