शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

खतांची विक्री ई पॉज मशीनने

By admin | Updated: April 17, 2017 23:50 IST

गैरप्रकारांना बसणार आळा : १ जूनपासून संपूर्ण राज्यात होणार अंमलबजावणी

आयुब मुल्ला ल्ल खोचीरासायनिक खतांची विक्री आता शेतकऱ्यांना विक्रेत्यांनी ई पॉज मशीनद्वारेच करणे बंधनकारक होणार आहे. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी १ जूनपासून संपूर्ण राज्यात होणार आहे. त्यामुळे रासायनिक खतांवर मिळणाऱ्या शासनाच्या अनुदानावर डल्ला मारण्याच्या पद्धतीस आळा बसणार आहे. खतविक्रीच पारदर्शी होणार असल्याने नेमकी विक्री व अनुदान यांचा आता मेळ बसणे शक्य होईल. केंद्र सरकार शेतकऱ्यांना रासायनिक खतांवर अनुदान देते. किमान ५० टक्क्यांपर्यंत अनुदानाचा रेशिओ आहे. हे अनुदान खतविक्रेत्यांना मिळते. म्हणजे विक्रेते अनुदानाची रक्कम वजा जाता उरलेली रक्कम स्वीकारतात. परंतु यामध्ये प्रचंड गोलमाल झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यानुसार शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रासायनिक खतांची विक्री पारदर्शी होत नसल्याने हे धोरण पुढे आले आहे. शेतकरी प्रत्यक्ष खरेदी करीत होता, त्या तुलनेत खतांची उपलब्धता विक्रेत्यांकडे असते. किंबहुना अधिकही असू शकते. त्यामुळे काही खतांची विक्री काळ्या बाजाराने होते. औद्योगिक वापरासाठीही ती विकली जातात. हा वापर वेगळ्या पद्धतीने होतो. त्यावरचे अनुदान मात्र विक्रेते लाटतात. म्हणजे विक्री जादा दराने करून अनुदानही मिळवायची म्हणजे ‘डल्ला डबल’ करण्याची पद्धत रूढ झाली आहे. याचा सर्व अभ्यास कृषी विभागाने केला. त्यानुसार ही पद्धत राबविण्याचा निर्णय झाला. प्रायोगिकतत्त्वावर असा प्रकल्प शासनाने नाशिक व रायगड जिल्ह्यांत राबविला. देशात सोळा जिल्ह्यांत तो राबविला; त्यामध्ये हे दोन जिल्हे होते. त्यास यश आल्याने संपूर्ण राज्यातच आता याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अशी आहे प्रक्रिया 1 विक्रेत्यांना शासन पीओएस हे १७ हजार रुपये किमतीचे मशीन मोफत देणार. त्यासाठी विक्रेत्यांनी एमएफएस या वेबसाईटवर १५ एप्रिल २०१७ पर्यंत आॅनलाईन नोंदणी करावयाची आहे. त्याद्वारे प्राप्त झालेला सहा अंकी आयडी क्रमांक तालुका कृषी अधिकारी (पंचायत समिती) यांना कळवावा. 2 जे नोंदणी करणार नाहीत त्यांना खतांची विक्री करता येणार नाही. शेतकऱ्यांनी खरेदीस जाताना आधारकार्ड नेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या बोटाचा ठसा पीओएस मशीनवर घेऊन आधारकार्ड नंबर नोंद करावयाचा आहे. 3 असे झाले तरच विक्रीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर शेतकऱ्याने रक्कम अनुदान वजा जाता द्यावयाची आहे. यामुळे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांची प्रत्यक्षात माहिती शासनाला मिळणे सोपे होणार आहे.