शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

‘दत्त’ गाळप क्षमता वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:17 IST

शिरोळ : कारखाना कार्यक्षेत्रातील उसाची उपलब्धता लक्षात घेऊन कारखान्याने पहिल्या टप्प्यात गाळप क्षमता प्रतिटन ९ हजारवरुन १२ हजार मे. ...

शिरोळ : कारखाना कार्यक्षेत्रातील उसाची उपलब्धता लक्षात घेऊन कारखान्याने पहिल्या टप्प्यात गाळप क्षमता प्रतिटन ९ हजारवरुन १२ हजार मे. टन इतकी वाढविण्याबरोबरच डिस्टिलरी व इथेनॉल उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी व्यवस्थापन विचाराधीन आहे. यासाठी ३३० कोटी भांडवली गुंतवणूकदेखील अपेक्षित असून, कारखान्याच्या व डिस्टिलरीच्या विस्तारिकरणामुळे कारखान्यास व सभासदांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली.

शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ५१ वी वार्षिक सभा झाली. कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. कोरोनाचे नियम पाळत खेळीमेळीच्या वातावरणात सभासदांनी टाळ्यांच्या गजरात सर्व विषयांना मंजुरी दिली. दरम्यान, चॅरिटेबल ट्रस्टच्या तेराव्या वार्षिक सभेचे विषयही मंजूर करण्यात आले.

अध्यक्ष पाटील म्हणाले, ऊस विकास योजनेमुळे एकरी उत्पादकता वाढली आहे. क्षारमुक्त जमीन प्रकल्पामुळे कार्यक्षेत्रातील ऊस पिकाखाली येत असून, कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे पंधरा हजार हेक्टर ऊस क्षेत्र गाळपासाठी नोंदविले जाते. त्यामुळे १५ लाख ५० हजार मे. टन गाळपासाठी उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळेच गाळप क्षमता वाढविण्याचा विचार असून, विस्तारिकरणाचे प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

सभेस उपाध्यक्ष श्रेणिक पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, संचालक विनया घोरपडे, अनिलकुमार यादव, शेखर पाटील, प्रमोद पाटील, इंद्रजित पाटील, शरदचंद्र पाठक, अरुणकुमार देसाई, महेंद्र बागे, विश्वनाथ माने, निजामसाहेब पाटील, बाबासाहेब पाटील, अमर यादव, आण्णासाहेब पाटील, रघुनाथ पाटील, संगीता पाटील-कोथळीकर, यशोदा कोळी यांच्यासह संचालक, सभासद, कामगार उपस्थित होते. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.

फोटो ३११२२०२०-जेएवाय-०२

फोटो ओळ - शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत गणपतराव पाटील यांनी मार्गदर्शन केले.