शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

दाट धुक्यात शहर गुडूप; वाहतूक ठप्प

By admin | Updated: February 13, 2016 00:39 IST

जनजीवनावर परिणाम : किरकोळ अपघात; सकाळी साडेदहापर्यंत धुके; रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता

कोल्हापूर : कोल्हापूर शहर व आसपासच्या परिसरातील नागरिकांची शुक्रवारची पहाट उजाडली ती दाट धुक्याची चादर बाजूला सारतच. एरव्ही साधारणपणे आठच्या सुमारास गडप होणाऱ्या धुक्याने शुक्रवारी मात्र साधारणपणे साडेदहापर्यंत शहर गुडूप केले होते. विशेषत: पंचगंगा नदी काठच्या पट्ट्यात धुक्याची तीव्रता अधिक असल्याने एक फूट अंतरावरीलही दिसत नव्हते त्यामुळे वाहनधारक हेडलाईट लावूनच प्रवास करत होते. पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूकही धिम्यागतीने सुरु होती.गतवर्षीच्या तुलनेत यंदा हिवाळ्यातील वातावरण चांगले राहिले आहे. मागील वर्षी प्रत्येक महिन्यात अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे ऋतुमानच बदलल्याचा अनुभव कोल्हापूरकरांनी घेतला होता. यंदा पाऊस कमी पडला असला तरी आॅक्टोबरनंतर हवामान स्वच्छ राहिले आहे. थंडी कमी राहिली असली तरी त्यात सातत्य राहिल्याने पिकांना पोषक ठरले. चांगल्या वातावरणामुळे फळे, भाजीपाला जोमात आहेत पण गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. ढगाळ हवामानाबरोबरच गार वारे वाहत असल्याने दिवसभर अंगातून थंडी जात नाही. शुक्रवारी पहाटेपासून दाट धुके व अंगाला बोचणारे वारे वाहत होते. धुके इतके दाट होते अक्षरश: पांघरुण घातल्यासारखे वातावरण होते. सकाळी दहावाजेपर्यंत हे दाट धुके होते. दहानंतर हळूहळू सूर्यनारायणाचे दर्शन झाले, तरीही दिवसभर हवेत कमालीचा गारवा जाणवत होता. गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील तापमानात घसरण झाली असून कमाल २९ डिग्री तर किमान १५ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. आगामी दोन दिवसांत तापमानात हळूहळू वाढ होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. ढगाळ वातावरणाचा भाजीपाल्यावर परिणाम झालाच पण त्याबरोबर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांचा भरणा सध्या दवाखान्यांत दिसत आहे. कारची टोल नाक्यास धडककसबा बावडा : पहाटेच्या धुक्यात हरवल्या वाटा... चोहीकडे पसरल्या गारव्याच्या लाटा...असे वातावरण कसबा बावडा आणि परिसरातील लोकांनी अनुभवले. पहाटे फिरावयास जाणाऱ्यांनी हातातील टॉर्चच्या उजेडात ‘मॉर्निंग वॉक’ पूर्ण केला. सकाळी दहा वाजेपर्यंत धुके कायम होते. दरम्यान, धुक्यात रस्ता न दिसल्यामुळे एका मारुती स्वीप्ट डिझायर गाडीने शिये टोल नाक्याला जोराची धकड दिली. त्यात चालक किरकोळ जखमी झाला. धुक्यामुळे पहाटेच्यावेळी राजाराम साखर कारखान्याकडे जाणारे ट्रक, ट्रॅक्टर अशी वाहने अगदी संथ गतीने जात होती. तर इतर वाहने हळूहळू हॉर्न वाजवत पुढे सरकत होती. या धुक्यात गारव्याची लाट पसरल्याने फिरावयास जाणाऱ्यांनी स्वेटर, कानटोपी, मफलरचा आधार घेतला. कोल्हापुरातील तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये :वारकिमानकमाल शुक्रवार१५२९ शनिवार१६३१ रविवार१७३१ सोमवार१८३३