शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

महापुराच्या काळात सामाजिक संस्थांनी लढवली खिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:25 IST

अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील नगरपालिकेने महापुराच्या नियोजनासाठी पावसाळ्यापूर्वी बैठका घेतल्या. पूर परिस्थितीचे नियोजन केले परंतु ...

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील नगरपालिकेने महापुराच्या नियोजनासाठी पावसाळ्यापूर्वी बैठका घेतल्या. पूर परिस्थितीचे नियोजन केले परंतु प्रत्यक्षात महापूर आल्यानंतर चहा-नाष्ट्यापासून ते दोनवेळचे जेवण, आरोग्यसेवा, जनावरांना चारा, पूर ओसरल्यानंतर जीवनावश्यक साहित्याचे किट वाटप हा संपूर्ण भार विविध दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांनीच पेलला. नगरपालिकेने आपत्तीत काहीच खर्च केला नाही. त्यामुळे श्रीमंत असलेल्या नगरपालिकेचा कारभार निवांतच राहिला.

दोन वर्षांत दोनवेळा इचलकरंजी शहराला महापुरामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. २०१९ साली नगरपालिकेने सेंट्रल किचन सुरू केले. विविध सामाजिक संस्था व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात आले होते. यंदा मात्र महापुराच्या आपत्तीत पालिका नामानिराळीच राहिली. नगरपालिकेच्या शाळा मोकळ्या करून त्या ठिकाणी पूरग्रस्त छावण्या निर्माण करून देण्यापलीकडे पालिकेने काहीच केले नाही. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध व्यक्ती व सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्या. २०१९ पासून महापूर त्यानंतर २ वर्षे कोरोना या सर्व आपत्कालीन परिस्थितीत यथाशक्ती मदत करणाऱ्या संस्थांनीच या महापुराचा भार सोसला.

शहरातील विविध भागात पाणी शिरल्याने त्या परिसरातील ४ हजार ५२३ कुटुंबातील सुमारे २५ हजार नागरिक स्थलांतरित झाले होते. त्यातील नगरपालिकेच्या १८ छावण्यांमध्ये १७ हजार नागरिक आसरा घेत होते. या सर्वांचा चहा-नाष्टा, जेवणाची सोय विविध सामाजिक संस्था, व्यक्तींनी केली. त्यामध्ये राहुल खंजिरे (१२00), तेलनाडे फौंडेशन (३५00), आमदार प्रकाश आवाडे (२५00), सागर चाकळे (१२00), मनोज साळुंखे (५00), नागेश शेजाळे (लहान मुलांसाठी दूध, नाष्टा), मारवाडी समाज (३00) आणि वैद्यकीय मदत डॉ. कोरे व तेेलनाडे फौंडेशन याशिवाय आवश्यकतेनुसार आवाडे समर्थ ग्रुप व माणुसकी फौंडेशन यांच्या वतीने जेवण पोहोच केले जात होते. त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था व कार्यकर्ते इतर मदतीसाठी तत्पर होते. पूर ओसरल्यानंतर घरी परतणाऱ्या कुटुंबांना गहू, तांदूळ व जीवनावश्यक वस्तूचे किट वाटपही शहरासह बाहेरून विविध संस्थांनी मदत केली. त्याचबरोबर पूरग्रस्त परिसरातील स्वच्छता मोहिमेतही सहभाग घेतला.

चौकट - कोरोना आपत्तीतही पालिकेची भूमिका जेमतेम

नगरपालिकेने दोन ठिकाणी कोविड केंद्र सुरू केले. अनेकवेळा या केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला. नाष्टा व जेवण याच्या दर्जाकडेही दुर्लक्ष झालेे. आरोग्य सभापतींनाच अनेकवेळा पालिकेच्या पदाधिकाऱ्याबरोबर हुज्जत घालावी लागली. त्यामुळे श्रीमंत नगरपालिकेच्या आशा लक्षणाला काय म्हणावे ? असा सवाल उपस्थित होत आहे.