शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
3
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
4
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
5
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
6
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
7
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
8
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
9
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
10
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
11
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
12
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
13
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
14
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
15
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
16
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
17
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
18
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
19
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ

महापुराच्या काळात सामाजिक संस्थांनी लढवली खिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:25 IST

अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील नगरपालिकेने महापुराच्या नियोजनासाठी पावसाळ्यापूर्वी बैठका घेतल्या. पूर परिस्थितीचे नियोजन केले परंतु ...

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील नगरपालिकेने महापुराच्या नियोजनासाठी पावसाळ्यापूर्वी बैठका घेतल्या. पूर परिस्थितीचे नियोजन केले परंतु प्रत्यक्षात महापूर आल्यानंतर चहा-नाष्ट्यापासून ते दोनवेळचे जेवण, आरोग्यसेवा, जनावरांना चारा, पूर ओसरल्यानंतर जीवनावश्यक साहित्याचे किट वाटप हा संपूर्ण भार विविध दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांनीच पेलला. नगरपालिकेने आपत्तीत काहीच खर्च केला नाही. त्यामुळे श्रीमंत असलेल्या नगरपालिकेचा कारभार निवांतच राहिला.

दोन वर्षांत दोनवेळा इचलकरंजी शहराला महापुरामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. २०१९ साली नगरपालिकेने सेंट्रल किचन सुरू केले. विविध सामाजिक संस्था व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात आले होते. यंदा मात्र महापुराच्या आपत्तीत पालिका नामानिराळीच राहिली. नगरपालिकेच्या शाळा मोकळ्या करून त्या ठिकाणी पूरग्रस्त छावण्या निर्माण करून देण्यापलीकडे पालिकेने काहीच केले नाही. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध व्यक्ती व सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्या. २०१९ पासून महापूर त्यानंतर २ वर्षे कोरोना या सर्व आपत्कालीन परिस्थितीत यथाशक्ती मदत करणाऱ्या संस्थांनीच या महापुराचा भार सोसला.

शहरातील विविध भागात पाणी शिरल्याने त्या परिसरातील ४ हजार ५२३ कुटुंबातील सुमारे २५ हजार नागरिक स्थलांतरित झाले होते. त्यातील नगरपालिकेच्या १८ छावण्यांमध्ये १७ हजार नागरिक आसरा घेत होते. या सर्वांचा चहा-नाष्टा, जेवणाची सोय विविध सामाजिक संस्था, व्यक्तींनी केली. त्यामध्ये राहुल खंजिरे (१२00), तेलनाडे फौंडेशन (३५00), आमदार प्रकाश आवाडे (२५00), सागर चाकळे (१२00), मनोज साळुंखे (५00), नागेश शेजाळे (लहान मुलांसाठी दूध, नाष्टा), मारवाडी समाज (३00) आणि वैद्यकीय मदत डॉ. कोरे व तेेलनाडे फौंडेशन याशिवाय आवश्यकतेनुसार आवाडे समर्थ ग्रुप व माणुसकी फौंडेशन यांच्या वतीने जेवण पोहोच केले जात होते. त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था व कार्यकर्ते इतर मदतीसाठी तत्पर होते. पूर ओसरल्यानंतर घरी परतणाऱ्या कुटुंबांना गहू, तांदूळ व जीवनावश्यक वस्तूचे किट वाटपही शहरासह बाहेरून विविध संस्थांनी मदत केली. त्याचबरोबर पूरग्रस्त परिसरातील स्वच्छता मोहिमेतही सहभाग घेतला.

चौकट - कोरोना आपत्तीतही पालिकेची भूमिका जेमतेम

नगरपालिकेने दोन ठिकाणी कोविड केंद्र सुरू केले. अनेकवेळा या केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला. नाष्टा व जेवण याच्या दर्जाकडेही दुर्लक्ष झालेे. आरोग्य सभापतींनाच अनेकवेळा पालिकेच्या पदाधिकाऱ्याबरोबर हुज्जत घालावी लागली. त्यामुळे श्रीमंत नगरपालिकेच्या आशा लक्षणाला काय म्हणावे ? असा सवाल उपस्थित होत आहे.