शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गजोडी दुर्लक्षितच--साद गड किल्ल्यांची

By admin | Updated: December 26, 2014 23:54 IST

किल्ले चंदन-वंदन

प्रशांत पिसाळ - पळशी--लोणावळ्याजवळील लोहगड-विसापूर या जोड किल्ल्यांप्रमाणेच कोरेगाव, वाई, सातारा या तालुक्यांच्या सीमेवर ‘चंदन-वंदन’ ही अनोखी दुर्गजोडी आहे. अनोख्या या दुर्गजोडी सध्या शेवटची घटका मोजत आहेत.‘चंदन’ हा किल्ला कोरेगाव तालुक्यातील बनवडी हद्दीत तर ‘वंदन’ वाई तालुक्याच्या खोलवडीच्या हद्दीत येतो. हे किल्ले गिरीदुर्ग या प्रकारात मोडतात. या किल्ल्यांची उंची समुद्रसपाटीपासून १,१७१ मीटर आहे. भाडळी-कुंडल रांगेचा फाटा यापर्यंत रांगेमध्ये या गडांचा समावेश होतो. या किल्ल्यांची उभारणी विजापूरच्या इब्राहिम आदिलशहा दुसरा याने इ.स. १६०० मध्ये केली. त्यानंतर इ. स. १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी आण्णाजी दत्तो सुबनवीस यांच्या मदतीने स्वारी करून चंदन-वंदन स्वराज्यात सामील करून घेतले. नंतर ६ आॅक्टोबर १७०१ रोजी हे किल्ले औरंगाजेबाने जिंकले. पुन्हा तो छत्रपती संभाजीनंतर ताराबाई परत १७०८ मध्ये हा शाहूंच्या ताब्यात आला. सन १७९० च्या महसूलविषयक नोंदीमध्ये ‘चंदन-वंदन’ किल्ल्याची विजापूर सुब्यातील परगना (मुख्यालय) अशी नोंद आहे. तेथील महसूल २१,६४४ रुपये होता. इ. स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांकडे सहज गेला. आदिलशहा राज्यातील एक महत्त्वाचा परगाना हा किल्ला होता. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा; पण शासनाकडून पूर्ण दुर्लक्षित झालेला हा किल्ला व त्यावरील ऐतिहासिक वास्तू हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. किल्ल्यावर गेल्यावर पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर असणारे प्रवेशद्वार पाहावयास मिळते. सध्या फक्त एकच बाजू शिला असल्याने येथे प्रवेशद्वार होते, हे समजते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला घेतल्यावर येथे चंदनेश्वराचे छोटे मंदिर बांधले. मुस्लीम शाहीच्या जास्तीत जास्त वेळ ताब्यात असलेल्या किल्ल्यावरील कोणत्याही मशिदीची व कबरीची मोडतोड महाराजांनी न करता त्या वास्तू तशाच ठेवल्या. आजही प्रवेशद्वारातून आत गेल्यावर असलेला हजरत पीर दर्गावर आजही हजारो हिंदू-मुस्लीम लोक भक्तीने येतात. येथे उरूसही साजरा करतात. मौल्यवान खजिना नामशेषाच्या मार्गावरदगडी स्तंभ : प्रवेशद्वारावर पुढे गले की, एकावर एक रचलेले प्रचंड दगडीस्तंभ आपले लक्ष वेधून घेतात. याच्या समोरच दर्गाची इमारत आहे.पार : सुंदर नक्षीदार दगडावर एक मोठा व्यासपीठ वजा पार आढळतो. या पारावर बसून न्यायदान व तक्रारनिवारण करण्याचे काम पार पाडले जात होते.कोठार : धान्य साठवणुकीसाठी दगडी बांधकाम करून कोठार केले होते. परंतु,ते सध्या ते पूर्णपणे जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे.दर्गाच्या मागे एक विहीर आहे. ती जास्त खोल नसून त्या विहिरीस चांगले पाणी आहे.