शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

दुर्गजोडी दुर्लक्षितच--साद गड किल्ल्यांची

By admin | Updated: December 26, 2014 23:54 IST

किल्ले चंदन-वंदन

प्रशांत पिसाळ - पळशी--लोणावळ्याजवळील लोहगड-विसापूर या जोड किल्ल्यांप्रमाणेच कोरेगाव, वाई, सातारा या तालुक्यांच्या सीमेवर ‘चंदन-वंदन’ ही अनोखी दुर्गजोडी आहे. अनोख्या या दुर्गजोडी सध्या शेवटची घटका मोजत आहेत.‘चंदन’ हा किल्ला कोरेगाव तालुक्यातील बनवडी हद्दीत तर ‘वंदन’ वाई तालुक्याच्या खोलवडीच्या हद्दीत येतो. हे किल्ले गिरीदुर्ग या प्रकारात मोडतात. या किल्ल्यांची उंची समुद्रसपाटीपासून १,१७१ मीटर आहे. भाडळी-कुंडल रांगेचा फाटा यापर्यंत रांगेमध्ये या गडांचा समावेश होतो. या किल्ल्यांची उभारणी विजापूरच्या इब्राहिम आदिलशहा दुसरा याने इ.स. १६०० मध्ये केली. त्यानंतर इ. स. १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी आण्णाजी दत्तो सुबनवीस यांच्या मदतीने स्वारी करून चंदन-वंदन स्वराज्यात सामील करून घेतले. नंतर ६ आॅक्टोबर १७०१ रोजी हे किल्ले औरंगाजेबाने जिंकले. पुन्हा तो छत्रपती संभाजीनंतर ताराबाई परत १७०८ मध्ये हा शाहूंच्या ताब्यात आला. सन १७९० च्या महसूलविषयक नोंदीमध्ये ‘चंदन-वंदन’ किल्ल्याची विजापूर सुब्यातील परगना (मुख्यालय) अशी नोंद आहे. तेथील महसूल २१,६४४ रुपये होता. इ. स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांकडे सहज गेला. आदिलशहा राज्यातील एक महत्त्वाचा परगाना हा किल्ला होता. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा; पण शासनाकडून पूर्ण दुर्लक्षित झालेला हा किल्ला व त्यावरील ऐतिहासिक वास्तू हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. किल्ल्यावर गेल्यावर पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर असणारे प्रवेशद्वार पाहावयास मिळते. सध्या फक्त एकच बाजू शिला असल्याने येथे प्रवेशद्वार होते, हे समजते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला घेतल्यावर येथे चंदनेश्वराचे छोटे मंदिर बांधले. मुस्लीम शाहीच्या जास्तीत जास्त वेळ ताब्यात असलेल्या किल्ल्यावरील कोणत्याही मशिदीची व कबरीची मोडतोड महाराजांनी न करता त्या वास्तू तशाच ठेवल्या. आजही प्रवेशद्वारातून आत गेल्यावर असलेला हजरत पीर दर्गावर आजही हजारो हिंदू-मुस्लीम लोक भक्तीने येतात. येथे उरूसही साजरा करतात. मौल्यवान खजिना नामशेषाच्या मार्गावरदगडी स्तंभ : प्रवेशद्वारावर पुढे गले की, एकावर एक रचलेले प्रचंड दगडीस्तंभ आपले लक्ष वेधून घेतात. याच्या समोरच दर्गाची इमारत आहे.पार : सुंदर नक्षीदार दगडावर एक मोठा व्यासपीठ वजा पार आढळतो. या पारावर बसून न्यायदान व तक्रारनिवारण करण्याचे काम पार पाडले जात होते.कोठार : धान्य साठवणुकीसाठी दगडी बांधकाम करून कोठार केले होते. परंतु,ते सध्या ते पूर्णपणे जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे.दर्गाच्या मागे एक विहीर आहे. ती जास्त खोल नसून त्या विहिरीस चांगले पाणी आहे.