शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या सतर्क भेटीमुळे तुळशी धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागणार ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:27 IST

धामोड : तुळशी धरणग्रस्तांची गेल्या पंचेचाळीस वर्षांपासूनची ४६ कुटुंबांची स्वतःच्या हक्काच्या घराची मागणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आजच्या एका ...

धामोड :

तुळशी धरणग्रस्तांची गेल्या पंचेचाळीस वर्षांपासूनची ४६ कुटुंबांची स्वतःच्या हक्काच्या घराची मागणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आजच्या एका भेटीमुळे पूर्ण होणार आहे. उद्या दुपारपर्यंत सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सातबारा उतारे संबंधित प्रकल्पग्रस्तांना देण्याचे आदेश संबंधित तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे धरणग्रस्तांना मिळालेल्या बुडीत भूखंडांचे सातबारा मिळण्याचे स्वप्न साकार होणार आहे. याचे समाधान बुरंबाळी ( ता. राधानगरी) येथील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

१९७६ पासून तुळशी धरण प्रकल्प भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली. यावेळी बुरंबाळी गावासह शेजारची सहा गावे शंभर टक्के बाधित झालीत. यातील ४६३ लोकांपैकी ६० भूमिहीन, तर ६४ बाधित ठरवण्यात आले. यातील ६४ बाधित शेतकऱ्यांना भूखंड वाटप करण्यात आले नव्हते. काही शेतकऱ्यांनी विस्थापित ठिकाणी घरे बांधली; परंतु त्याची सातबारा पत्रकी नोंद झालेली नव्हती. त्यामुळे या धरणग्रस्तांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.

याबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुरंबाळी गावस भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या व संबंधित धरणग्रस्तांना दोन दिवसांत सातबारा पत्रकी नोंद घालून सातबारा देण्याचे आदेश प्रशासनाला दिलेत. कामाची तत्परता दाखवत ग्रामपंचायत कार्यालयातूनच त्यांनी पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे यांनाही दूरध्वनीवरून याबाबतचे आदेश दिलेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीवेळी तहसीलदार मीना निंबाळकर, मंडल अधिकारी देविदास तारडे, ग्रामसेवक यशपाल पावरा, सरपंच माधवी चौगले, तुळशी धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष के. डी. इंगवले, माजी सरपंच एकनाथ चौगले, अजित मगदूम, लता आर्डेकर, शुभांगी देवार्डेकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी आणि प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

फोटो = बुरंबाळी (ता. राधानगरी) येथे धरणग्रस्तांच्या समस्या जाणून घेताना जिल्हाधिकारी दौलत देसाई, राधानगरी तहसीलदार मीना निंबाळकर व इतर.