शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

‘शेकाप’च्या पाठबळामुळे हत्तीचे बळ - धनंजय महाडिक         

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 16:58 IST

आजपर्यंतच्या राजकीय जीवनात अनेक वेळा संपतराव  पवार यांच्याकडे मदतीसाठी गेलो पण त्यांनी डाव्या विचाराचे तत्वज्ञान सोडून कधीच मदत केली नाही.  यावेळेला मोठ्या मनाने देशातील शेतकरी, कष्टकरी विरोधी हिटलरशाही सरकार उलथवून लावण्यासाठी त्यांनी पाठबळ

ठळक मुद्दे‘शेकाप’च्या पाठबळामुळे हत्तीचे बळ - धनंजय महाडिक

कोल्हापूर : आजपर्यंतच्या राजकीय जीवनात अनेक वेळा संपतराव  पवार यांच्याकडे मदतीसाठी गेलो पण त्यांनी डाव्या विचाराचे तत्वज्ञान सोडून कधीच मदत केली नाही.  यावेळेला मोठ्या मनाने देशातील शेतकरी, कष्टकरी विरोधी हिटलरशाही सरकार उलथवून लावण्यासाठी त्यांनी पाठबळ दिले, यामुळे मला हत्तीचे बळ मिळाल्याचे प्रतिपादन राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी केले. 

शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक गुरूवारी झाली, यामध्ये पक्षाच्या धोरणानुसार आघाडीसोबत राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. महाडिक म्हणाले, भुलभुलय्या करून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे.  संविधान मोडीत काढण्याची भाषा करणाऱ्या भाजपला सत्तेची मगुरूरी आली आहे. सरकारच्या कारभाराला सामान्य माणूस वैतागला असून समाजातील कोणाताही घटक समाधानी नाही. शेतकरी आत्महत्या, शेतीमालाला हमीभाव, बेरोजगारी, महागाई या मुद्यावर ही निवडणूक होणे अपेक्षित होते, पण भाजपची मंडळी सर्जिकल स्ट्राईक करून लोकांच्या परिवर्तनाचा प्रयत्न करत आहे. 

संपतराव पवार म्हणाले, कष्टकरी-श्रमजिवी लोकांसाठी मैदानात उतरण्याची वेळ आली त्यावेळी उतरलो, त्यावेळी कोण बरोबर होता किती मते पडली हे महत्वाचे नव्हते. आताची परिस्थिती वेगळी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटनाच धोक्यात आली आहे. मनुवादी प्रवृत्ती देशातून हद्दपार करण्यासाठी आघाडीसोबत राहण्याचा निर्णय डाव्यांनी घेतला. आमची ताकद मर्यादीत असेल पण जी मदत होईल ती प्रामाणिकपणेच करू.  पुन्हा सर्जिकल स्ट्राईक शक्य  पाकिस्तानचे दहा सैनिक मारल्याचा दावा केला जातो, मग तेथील प्रसारमाध्यमांमध्ये याविषयी एकही ओळ कशी आली नाही. ही निवडणूक केवळ सर्जिकल स्ट्राईक भोवतीच फिरवण्याचा डाव असून येत्या आठ-दहा दिवसात आणखी एक सर्जिकल स्ट्राईक झाला तर आश्चर्य वाटायला नको, अशी टीका धनंजय महाडिक यांनी केली. दोन्ही कॉँग्रेस उन्हातील ‘पुरोगामी’आम्ही आतापर्यंत तत्वज्ञान घेऊन चाललो, पुरोगामी विचार जोपासणाºया कॉँग्रेस, राष्टÑवादीला आम्ही पाठींबा देऊन सत्तेवर बसवले. पण त्यांचे  उन्हात उभे राहिलेले पुरोगामीत्व आहे. वेळ पडलीतर सावळीत जाऊन प्रतिगाम्यासोबत राहू शकतात. असा टोलाही संपतराव पवार यांनी लगावला. ‘त्यांचे’ किती ऐकायचे ते ठरवातुम्हाला निवडणक जिंकायची आहे, सगळ्यांना सोबत घेऊन जावे लागणार आहे. आम्हाला कोणाचे वावडे नाही, उद्या  पटले नाहीतर तुमच्यासोबत नसेनही, समाजासाठी त्रास सहन करण्याची ताकद आमच्यात आहे. पण काहीजण चुकीची माहिती सांगतील, त्यांचे किती ऐकायचे ते ठरवा, असे पवार यांनी कॉँग्रेस नेत्यांचे नाव न घेता इशारा दिला.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूर