शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘शेकाप’च्या पाठबळामुळे हत्तीचे बळ - धनंजय महाडिक         

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 16:58 IST

आजपर्यंतच्या राजकीय जीवनात अनेक वेळा संपतराव  पवार यांच्याकडे मदतीसाठी गेलो पण त्यांनी डाव्या विचाराचे तत्वज्ञान सोडून कधीच मदत केली नाही.  यावेळेला मोठ्या मनाने देशातील शेतकरी, कष्टकरी विरोधी हिटलरशाही सरकार उलथवून लावण्यासाठी त्यांनी पाठबळ

ठळक मुद्दे‘शेकाप’च्या पाठबळामुळे हत्तीचे बळ - धनंजय महाडिक

कोल्हापूर : आजपर्यंतच्या राजकीय जीवनात अनेक वेळा संपतराव  पवार यांच्याकडे मदतीसाठी गेलो पण त्यांनी डाव्या विचाराचे तत्वज्ञान सोडून कधीच मदत केली नाही.  यावेळेला मोठ्या मनाने देशातील शेतकरी, कष्टकरी विरोधी हिटलरशाही सरकार उलथवून लावण्यासाठी त्यांनी पाठबळ दिले, यामुळे मला हत्तीचे बळ मिळाल्याचे प्रतिपादन राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी केले. 

शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक गुरूवारी झाली, यामध्ये पक्षाच्या धोरणानुसार आघाडीसोबत राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. महाडिक म्हणाले, भुलभुलय्या करून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे.  संविधान मोडीत काढण्याची भाषा करणाऱ्या भाजपला सत्तेची मगुरूरी आली आहे. सरकारच्या कारभाराला सामान्य माणूस वैतागला असून समाजातील कोणाताही घटक समाधानी नाही. शेतकरी आत्महत्या, शेतीमालाला हमीभाव, बेरोजगारी, महागाई या मुद्यावर ही निवडणूक होणे अपेक्षित होते, पण भाजपची मंडळी सर्जिकल स्ट्राईक करून लोकांच्या परिवर्तनाचा प्रयत्न करत आहे. 

संपतराव पवार म्हणाले, कष्टकरी-श्रमजिवी लोकांसाठी मैदानात उतरण्याची वेळ आली त्यावेळी उतरलो, त्यावेळी कोण बरोबर होता किती मते पडली हे महत्वाचे नव्हते. आताची परिस्थिती वेगळी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटनाच धोक्यात आली आहे. मनुवादी प्रवृत्ती देशातून हद्दपार करण्यासाठी आघाडीसोबत राहण्याचा निर्णय डाव्यांनी घेतला. आमची ताकद मर्यादीत असेल पण जी मदत होईल ती प्रामाणिकपणेच करू.  पुन्हा सर्जिकल स्ट्राईक शक्य  पाकिस्तानचे दहा सैनिक मारल्याचा दावा केला जातो, मग तेथील प्रसारमाध्यमांमध्ये याविषयी एकही ओळ कशी आली नाही. ही निवडणूक केवळ सर्जिकल स्ट्राईक भोवतीच फिरवण्याचा डाव असून येत्या आठ-दहा दिवसात आणखी एक सर्जिकल स्ट्राईक झाला तर आश्चर्य वाटायला नको, अशी टीका धनंजय महाडिक यांनी केली. दोन्ही कॉँग्रेस उन्हातील ‘पुरोगामी’आम्ही आतापर्यंत तत्वज्ञान घेऊन चाललो, पुरोगामी विचार जोपासणाºया कॉँग्रेस, राष्टÑवादीला आम्ही पाठींबा देऊन सत्तेवर बसवले. पण त्यांचे  उन्हात उभे राहिलेले पुरोगामीत्व आहे. वेळ पडलीतर सावळीत जाऊन प्रतिगाम्यासोबत राहू शकतात. असा टोलाही संपतराव पवार यांनी लगावला. ‘त्यांचे’ किती ऐकायचे ते ठरवातुम्हाला निवडणक जिंकायची आहे, सगळ्यांना सोबत घेऊन जावे लागणार आहे. आम्हाला कोणाचे वावडे नाही, उद्या  पटले नाहीतर तुमच्यासोबत नसेनही, समाजासाठी त्रास सहन करण्याची ताकद आमच्यात आहे. पण काहीजण चुकीची माहिती सांगतील, त्यांचे किती ऐकायचे ते ठरवा, असे पवार यांनी कॉँग्रेस नेत्यांचे नाव न घेता इशारा दिला.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूर