शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

अंधश्रद्धेमुळे गेला महिलेचा जीव !

By admin | Updated: April 30, 2015 00:48 IST

भूतबाधेच्या समजुतीतून जादूटोणा : कोल्हापुरातील प्रकार; ‘अंनिस’ने रुग्णालयात केले होते दाखल

कोल्हापूर : ‘भूतबाधा’ झाल्याच्या समजुतीतून गेल्या दोन महिन्यांपासून धार्मिक स्थळी जादूटोण्याद्वारे वैद्याकडून उपचार करून घेणाऱ्या राजेंद्रनगर येथील ४५ वर्षांच्या महिलेला बुधवारी सकाळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला सदस्यांनी नातेवाइकांचा विरोध झुगारुन खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचार सुरू असताना अखेर ‘त्या’ महिलेचा मृत्यू झाला. संबंधित महिला ही दोन महिन्यांपासून आजारी होती. उचक्यांमुळे ती मोठमोठ्याने किंचाळत होती. गरिबीमुळे तिला २७ एप्रिल रोजी नातेवाइकांनी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. तेथे दोन दिवस उपचार करून घरी नेले. पुन्हा ती वेड्यासारखे करू लागल्याने तिला ‘भूतबाधा’ झाल्याच्या समजुतीतून नातेवाइकांनी वैद्याकडे नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी सकाळी नातेवाईक तिला घेऊन ताराबाई रोड परिसरातील एका धार्मिक स्थळी घेऊन गेले. या ठिकाणी वैद्याने तिला अंगारा लावून पाणी शिंपडले. तिची प्रकृती अत्यवस्थ होती. वेदनेने तिला सरळ उभेही राहता येत नव्हते. अशा बिकट परिस्थितीत नातेवाईक तिला रिक्षातून घरी घेऊन जात होते. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्या गीता जाधव यांना हा प्रकार दिसला. महिलेची अवस्था पाहून त्यांना राहवले नाही. त्यांनी नातेवाइकांना ‘महिला खूप अशक्त झाली आहे, तिला रुग्णालयात दाखल करा, ती बरी होईल,’ असे सांगितले. यावेळी त्यांनी ‘तुम्ही काही सांगू नका. सगळीकडे फिरलो आहे; पण काही फरक पडलेला नाही,’ असे सांगून ते निघाले असता जाधव यांनी आपल्या वरिष्ठ सहकारी सीमा पाटील यांना बोलावून घेतले. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल करण्यास नातेवाइकांना सांगितले. नातेवाइकांनी विरोध केला; परंतु पोलिसांत तक्रार करणार असे दरडावताच नातेवाइक रुग्णालयात दाखल करण्यास तयार झाले. सीमा पाटील यांनी डॉक्टर मैत्रिणीच्या सहकार्याने कदमवाडीतील रुग्णालयात तिला दाखल केले. तिच्यावर तातडीने उपचार करण्यास सुरुवात केली. परंतु पुन्हा उचकी लागून तिचा मृत्यू झाला आणि डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ ठरले. (प्रतिनिधी) वेळेत उपचार झाले असते तर जीवदानवेळेत योग्य उपचार झाले असते तर महिलेला जीवदान मिळाले असते; परंतु नातेवाइकांच्या अंधश्रद्धेच्या हट्टापायी महिलेला आपला जीव गमावावा लागल्याची रुग्णालय परिसरात चर्चा होती.नेमका महिलेचा मृत्यू कशामुळे झाला, याचे निदान होण्यासाठी तिचा मृतदेह सीपीआरमध्ये विच्छेदनासाठी आणण्यात आला. याठिकाणी डॉक्टरांनी तिचा व्हिसेरा राखून ठेवला आहे.