शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनमुळे जावळीतील शेतकरी मालामाल

By admin | Updated: November 23, 2014 23:51 IST

ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम : महिगावसह पाच गावांत यशस्वी अंमलबजावणी

कुडाळ : जावळीतील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हंगामी पीकच महत्त्वाचे असते. या पिकावर शेतकरी अवलंबून असतो. तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी नगदी पिकांवर अधिक भर देऊन आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करीत आहेत. कृषी विभागाच्या ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमातून या विभागातील शेतकऱ्यांनी एकरी लाखापर्यंत उत्पन्न मिळविल्यामुळे शेतकरी मालामाल झाले आहेत. कृषी सहायक एम. एम. गोसावी यांच्या प्रयत्नांतून आनेवाडी मंडलातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाद्वारे शेतीप्रयोग केले. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळू लागला आहे. कृषी कंपन्यांच्या बियाण्याद्वारे पेरणी करून उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने कंपन्यांचाच फायदा होतो. याला छेद दिला जावा व शेतकऱ्यांनी स्वत:च दर्जेदार बियाणे तयार करून आपला आर्थिक फायदा करून घ्यावा या दृष्टिकोनातून ही ग्रामबीजोत्पादन योजना राबविण्यात येते. याद्वारे महिगाव, मोरघर, दरेखुर्द, पवारवाडी, दुदुस्करवाडी यासह आनेवाडी विभागातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला प्राधान्य दिले. यावर्षी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान होऊन भात, भुईमूग यांसारख्या पिकांना उतार न मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. त्याच वेळी ग्रामबीजोत्पादनाच्या माध्यमातून सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना तारले.महिगाव येथील शेतकऱ्यांनी ४० एकरात जवळपास ५०० क्विंटल एवढे उत्पन्न मिळविले. प्रत्येक शेतकऱ्याला एक एकर क्षेत्रात जवळपास एक लाखाचे उत्पन्न मिळाले. शेतकऱ्यांनी घेतलेल्या सोयाबीन पिकाचे दर्जेदार बियाणे तयार करून ते बचतगटांद्वारे बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)एकरी लाखाचे उत्पन्नशेतकऱ्यांनी तीन वर्षांपासून सोयाबीन पीक घ्यायला सुरुवात केली. एकरी एक लाखापर्यंत उत्पन्न शेतकऱ्याला मिळू लागले. महिगावमधील जय हनुमान बचत गटाने ८८५० किलो, इंद्रायणी कृषी बचतगटाने ५०० किलो, दुदुस्करवाडीतील बचतगटाने ३८०० किलो एवढे बियाणे निर्माण केले आहे. या दर्जेदार बियाण्याला बाजारात मागणी असल्याने हे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.शेतकऱ्याने स्वत:च बियाणे निर्मिती केल्याने आणि या दर्जेदार बियाण्याला उत्पन्नात उतारही मिळत असल्याने पश्चिम महाराष्ट्रातून शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाण्याला मागणी वाढू लागली आहे. - एम. एम. गोसावी,कृषी सहायक, सायगाव