शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

सोयाबीनमुळे जावळीतील शेतकरी मालामाल

By admin | Updated: November 23, 2014 23:51 IST

ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम : महिगावसह पाच गावांत यशस्वी अंमलबजावणी

कुडाळ : जावळीतील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हंगामी पीकच महत्त्वाचे असते. या पिकावर शेतकरी अवलंबून असतो. तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी नगदी पिकांवर अधिक भर देऊन आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करीत आहेत. कृषी विभागाच्या ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमातून या विभागातील शेतकऱ्यांनी एकरी लाखापर्यंत उत्पन्न मिळविल्यामुळे शेतकरी मालामाल झाले आहेत. कृषी सहायक एम. एम. गोसावी यांच्या प्रयत्नांतून आनेवाडी मंडलातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाद्वारे शेतीप्रयोग केले. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळू लागला आहे. कृषी कंपन्यांच्या बियाण्याद्वारे पेरणी करून उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने कंपन्यांचाच फायदा होतो. याला छेद दिला जावा व शेतकऱ्यांनी स्वत:च दर्जेदार बियाणे तयार करून आपला आर्थिक फायदा करून घ्यावा या दृष्टिकोनातून ही ग्रामबीजोत्पादन योजना राबविण्यात येते. याद्वारे महिगाव, मोरघर, दरेखुर्द, पवारवाडी, दुदुस्करवाडी यासह आनेवाडी विभागातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला प्राधान्य दिले. यावर्षी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान होऊन भात, भुईमूग यांसारख्या पिकांना उतार न मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. त्याच वेळी ग्रामबीजोत्पादनाच्या माध्यमातून सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना तारले.महिगाव येथील शेतकऱ्यांनी ४० एकरात जवळपास ५०० क्विंटल एवढे उत्पन्न मिळविले. प्रत्येक शेतकऱ्याला एक एकर क्षेत्रात जवळपास एक लाखाचे उत्पन्न मिळाले. शेतकऱ्यांनी घेतलेल्या सोयाबीन पिकाचे दर्जेदार बियाणे तयार करून ते बचतगटांद्वारे बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)एकरी लाखाचे उत्पन्नशेतकऱ्यांनी तीन वर्षांपासून सोयाबीन पीक घ्यायला सुरुवात केली. एकरी एक लाखापर्यंत उत्पन्न शेतकऱ्याला मिळू लागले. महिगावमधील जय हनुमान बचत गटाने ८८५० किलो, इंद्रायणी कृषी बचतगटाने ५०० किलो, दुदुस्करवाडीतील बचतगटाने ३८०० किलो एवढे बियाणे निर्माण केले आहे. या दर्जेदार बियाण्याला बाजारात मागणी असल्याने हे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.शेतकऱ्याने स्वत:च बियाणे निर्मिती केल्याने आणि या दर्जेदार बियाण्याला उत्पन्नात उतारही मिळत असल्याने पश्चिम महाराष्ट्रातून शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाण्याला मागणी वाढू लागली आहे. - एम. एम. गोसावी,कृषी सहायक, सायगाव