शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

कोल्हापूरच्या धास्तीमुळे तीन हजार कोटींचा प्रकल्प गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:33 IST

कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या धास्तीमुळे दक्षिण कोरियाच्या एस्सान ग्रुपचा तीन हजार कोटींचा प्रकल्प औरंगाबादला गेला, असा गौप्यस्फोट खासदार संभाजीराजे यांनी ...

कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या धास्तीमुळे दक्षिण कोरियाच्या एस्सान ग्रुपचा तीन हजार कोटींचा प्रकल्प औरंगाबादला गेला, असा गौप्यस्फोट खासदार संभाजीराजे यांनी रविवारी कोल्हापुरात केला. आपण मुख्यमंत्र्यांकडे याबाबत आग्रह धरला; पण त्यांनी हात जोडत ‘कोल्हापूरचे नाव घेतले तर आहे तीपण गुंतवणूक न करता पळून जातील,’ असे सांगितल्याने माझाही नाइलाज झाला, असेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.कोल्हापुरात आयोजित केलेल्या ‘व्हिजन २०२५’ मध्ये संभाजीराजे म्हणाले, या विषयावर आतापर्यंत कोणी बोलायचे धाडस केले नाही; पण मला बोलावेच लागेल. कोल्हापूरकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. शाहू महाराजांची भूमी म्हणून कोल्हापूरची ओळख होती; पण अलीकडे झालेल्या काही घटनांमुळे कोल्हापूरला लोक घाबरत आहेत. दक्षिण कोरियातील एस्सान ग्रुपमधील उद्योजकांचे शिष्टमंडळ मुंबईत आल्याचे समजले. त्यांनी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रासह गुजरात व आंध्रप्रदेशची निवड केली होती. एका शहरात तब्बल तीन हजार कोटीची गुंतवणूक ते करणार असल्याने मी लागलीच त्यांची भेट घेतली. रात्री साडेबारा वाजता शिष्टमंडळाशी चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्या बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्रात गुंतवणूक होत आहे, तर कोल्हापूरची त्यासाठी निवड करावी, असा आग्रह मी धरला.मुख्यमंत्र्यांनी मला अ‍ॅँटिचेंबरमध्ये घेऊन हात जोडत ‘कोल्हापूरचे तेवढे नाव काढू नका. शिष्टमंडळाला फार फोर्सही करू नका; नाही तर आहे ती गुंतवणूकही परत जाईल. तुम्ही राज्यसभेचे खासदार आहात. एकट्या कोल्हापूरचा विचार करू नका. देशातील प्रत्येक शहराचे तुम्ही प्रतिनिधित्व करता,’ असे सांगितले. यावर माझाही नाइलाज झाला; पण एवढी मोठी गुंतवणूक येऊ न शकल्याचे शल्य मनात कायम राहिले. त्यामुळे कोल्हापूरची तयार झालेली प्रतिमा बदलण्याचे धोरण आता आपल्याला स्वीकारावे लागणार आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.गुंतवणूकदारांमध्ये आकसगेल्या काही वर्षांत कोल्हापुरात टोलसारखी मोठी आंदोलने झाली. आंदोलनामुळे गुंतवणूकदारांमध्ये कोल्हापूरविषयी आकस तयार झाला आहे. याचे प्रत्यंतर वारंवार येत आहे; पण उघडपणे कोणी बोलत नव्हते.मध्यंतरी माजी खासदार धनंजय महाडिक यांनी देखील आपल्यालाही असा अनुभव आल्याचा एके ठिकाणी ओझरता उल्लेख केला होता. त्यानंतर आता खासदार संभाजीराजे यांनी कोणी नाराज झाले तरी चालेल; पण वस्तुस्थिती मांडावीच लागेल, असे सांगून या विषयाला तोंड फोडले आहे.