शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
2
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
3
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
4
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
5
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
6
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
7
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
8
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
9
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
10
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
11
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
12
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
13
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
14
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
15
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
16
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
17
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
18
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
19
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
20
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट

टंचाईमुळे जिल्ह्यात कूपनलिका खुदाईचा धडाका

By admin | Updated: May 17, 2016 01:20 IST

जिल्हा प्रशासन : धरणात पिण्यासाठी पाणी राखीव; उद्योगांची २० टक्केच पाणी कपात

कोल्हापूर : जिल्ह्णातील पाणीटंचाई निवारण्यासाठी खासगी आणि शासकीय यंत्रणेकडून कूपनलिका खुदाईचा धडाका लावला आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने मंजूर केलेल्या ३६ पैकी २९ कूपनलिकांची खुदाई केली आहे. त्वरित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कूपनलिका खुदाईलाच प्राधान्य दिले जात आहे. सर्वच धरणात पिण्यासाठी पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांतदादापाटील यांनी गेल्या महिन्यात येथील उद्योगांची २५ टक्के पाणी कपात केल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात २० टक्केच पाणी कपात केल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. यामुळे पूर्णक्षमतेने लघुपाटबंधारे प्रकल्प व धरण भरली नाहीत. परिणामी, शहरासह ग्रामीण भागातही पाणी टंचाई जाणवत आहे. पाटबंधारे विभागाने सर्वच धरणातील एकूण पाणीसाठ्यात पिण्यासाठी राखीव साठा ठेवला आहे. १५ जूनपर्यंत पाणी पुरविण्याचे नियोजन केले आहे; परंतु ज्या गावात धरणाचे पाणी योजनाद्वारे पुरवठा होत नाही. तशा गावात टंचाई निर्माण झाल्यास प्रशासन कूपनलिका खुदाई करीत आहे. असलेल्या पाण्याचे स्रोत आटल्याचे ग्रामपंचायतीकडून तहसील कार्यालयास माहिती आल्यानंतर त्वरित कूपनलिका खुदाई मंजुरी दिली जात आहे. प्रत्यक्षात कूपनलिका खुदाईचे काम जिल्हा परिषद पाणीपुरवठा यंत्रणेकडून केले जात आहे. कूपनलिकेस पाणी लागल्यास त्या भागातील रहिवाशांची तहान भागत आहे. अनेक ठिकाणी पाणीपातळी खालावल्याने कूपनलिकेचा प्रयोग फसत आहे. कूपनलिकांशिवाय अन्य उपाययोजना लालफितीतच अडकल्या आहेत. आराखड्यातील ५७ कामे मंजूर झाले आहेत. मात्र, कूपनलिका सोडून अन्य एकही काम पूर्ण झालेले नाही. पाटंबधारे विभागाने उपसाबंदी करून शेतीवरील पाणी वापरावर निर्बंध आणले आहेत. परिणामी, उसासह उन्हाळी पिके वाळत आहेत. त्यामुळे शेतकरी केवळ शेतीलाच पाणी उपसा बंदी का, असा सवाल उपस्थित करीत पाटबंधारे प्रशासनास धारेवर धरत आहेत. गेल्या महिन्यात टंचाई आढावा बैठकीत उद्योगासाठीचे २५ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय झाल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. राज्य उद्योग प्रशासनाशी संपर्क साधून विचारणा केल्यानंतर उद्योजकांचे २० टक्केच पाणी कपात केल्याचे सांगण्यात आले आहे. प्रामुख्याने पंचतारांकित औद्योगिक वसाहतीस दूधगंगा नदीतून, तर गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीस पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा होतो. सर्व उद्योजकांना रोज सरासरी २५ ते २७ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. दुष्काळामुळे २० टक्के पाणी कपात केली आहे. त्यामुळे रोज पाच दशलक्ष लिटर पाण्याची बचत होत आहे.