शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

टंचाईमुळे जिल्ह्यात कूपनलिका खुदाईचा धडाका

By admin | Updated: May 17, 2016 01:20 IST

जिल्हा प्रशासन : धरणात पिण्यासाठी पाणी राखीव; उद्योगांची २० टक्केच पाणी कपात

कोल्हापूर : जिल्ह्णातील पाणीटंचाई निवारण्यासाठी खासगी आणि शासकीय यंत्रणेकडून कूपनलिका खुदाईचा धडाका लावला आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने मंजूर केलेल्या ३६ पैकी २९ कूपनलिकांची खुदाई केली आहे. त्वरित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कूपनलिका खुदाईलाच प्राधान्य दिले जात आहे. सर्वच धरणात पिण्यासाठी पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांतदादापाटील यांनी गेल्या महिन्यात येथील उद्योगांची २५ टक्के पाणी कपात केल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात २० टक्केच पाणी कपात केल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. यामुळे पूर्णक्षमतेने लघुपाटबंधारे प्रकल्प व धरण भरली नाहीत. परिणामी, शहरासह ग्रामीण भागातही पाणी टंचाई जाणवत आहे. पाटबंधारे विभागाने सर्वच धरणातील एकूण पाणीसाठ्यात पिण्यासाठी राखीव साठा ठेवला आहे. १५ जूनपर्यंत पाणी पुरविण्याचे नियोजन केले आहे; परंतु ज्या गावात धरणाचे पाणी योजनाद्वारे पुरवठा होत नाही. तशा गावात टंचाई निर्माण झाल्यास प्रशासन कूपनलिका खुदाई करीत आहे. असलेल्या पाण्याचे स्रोत आटल्याचे ग्रामपंचायतीकडून तहसील कार्यालयास माहिती आल्यानंतर त्वरित कूपनलिका खुदाई मंजुरी दिली जात आहे. प्रत्यक्षात कूपनलिका खुदाईचे काम जिल्हा परिषद पाणीपुरवठा यंत्रणेकडून केले जात आहे. कूपनलिकेस पाणी लागल्यास त्या भागातील रहिवाशांची तहान भागत आहे. अनेक ठिकाणी पाणीपातळी खालावल्याने कूपनलिकेचा प्रयोग फसत आहे. कूपनलिकांशिवाय अन्य उपाययोजना लालफितीतच अडकल्या आहेत. आराखड्यातील ५७ कामे मंजूर झाले आहेत. मात्र, कूपनलिका सोडून अन्य एकही काम पूर्ण झालेले नाही. पाटंबधारे विभागाने उपसाबंदी करून शेतीवरील पाणी वापरावर निर्बंध आणले आहेत. परिणामी, उसासह उन्हाळी पिके वाळत आहेत. त्यामुळे शेतकरी केवळ शेतीलाच पाणी उपसा बंदी का, असा सवाल उपस्थित करीत पाटबंधारे प्रशासनास धारेवर धरत आहेत. गेल्या महिन्यात टंचाई आढावा बैठकीत उद्योगासाठीचे २५ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय झाल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. राज्य उद्योग प्रशासनाशी संपर्क साधून विचारणा केल्यानंतर उद्योजकांचे २० टक्केच पाणी कपात केल्याचे सांगण्यात आले आहे. प्रामुख्याने पंचतारांकित औद्योगिक वसाहतीस दूधगंगा नदीतून, तर गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीस पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा होतो. सर्व उद्योजकांना रोज सरासरी २५ ते २७ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. दुष्काळामुळे २० टक्के पाणी कपात केली आहे. त्यामुळे रोज पाच दशलक्ष लिटर पाण्याची बचत होत आहे.