शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
3
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
4
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
5
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
6
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
7
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
8
जातगणना : मॅजिक की मंडल?
9
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
10
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
11
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
12
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
13
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
14
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
15
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
16
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
17
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
18
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
19
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
20
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

संक्रातीमुळे वरणा, वांगे, गाजर महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:57 IST

कोल्हापूर : संक्रातीमुळे मागणी वाढल्याने वरणा, वांगे, गाजराचे दर अचानक वाढले आहेत. मटार व टोमॅटोचे दर पुन्हा कोसळले आहेत. ...

कोल्हापूर : संक्रातीमुळे मागणी वाढल्याने वरणा, वांगे, गाजराचे दर अचानक वाढले आहेत. मटार व टोमॅटोचे दर पुन्हा कोसळले आहेत. भोगीसाठी लागणारी बाजरी, तीळ, राळा, हरभरा डहाळे आणि सुगड्यांनी बाजार फुलला आहे.

येत्या बुधवारी भोगी, तर गुरुवारी संक्रांत आहे. घरोघरी मिक्स भाजी केली जात असल्याने भाज्यांची आवक वाढली आहे. सर्वाधिक मागणी वरणा, वांगे, गाजर, कांदेपातीला असते. हे ओळखून दरातही कृत्रिम वाढ झाली आहे. वांगी ४० ते ६० रुपये किलो आहेत. गाजरही ६० रुपये किलो आहेत. वरणा ८० ते १०० रुपये किलो आहे. कांदापात १० ते १५ रुपये पेंढी आहे. हरभरा डहाळे १० रुपयांना एक पेंढी आहे. राळे २० ते २५ रुपये पावशेर, बाजरी ३० रुपये किलो, बाजरी पीठ ५० रुपये किलो असा भाव सुरू आहे. तीळाचे दरही १५० रुपये किलोवर गेले आहेत. गुळ ५० रुपये किलो झाला आहे.

मटार व टोमॅटोची प्रचंड आवक झाली आहे. बाजार हिरवा आणि लाल रंगात न्हाऊन गेला आहे. मटार २० ते ३० रुपये किलो, तर टोमॅटो १० रुपये किलो झाला आहे. इतर भाज्यांमध्येही कारली, बिन्स, घेवडा, ढबू, कारली ३० रुपये किलो आहेत. कोबी, फ्लॉवरचे दर अजूनही सावरलेले नाहीत. ५ ते १० रुपये असा एका गड्ड्याचा दर आहे. कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू अजूनही ५ ते १० रुपये पेंडी असाच दर आहे.

मातीबरोबरच डिझाईनच्याही सुगड्या बाजारात आल्या आहेत. ५ ते ६ रुपयांना एक असा त्यांचा दर आहे.

फळबाजारात अजूनही स्वस्ताईचे वारे कायम आहे. संत्री व माल्टा ३०, बोर २० असा दर आहे. सफरचंदचे दर शंभरच्या पुढेच आहेत.

फोटो:

१००९२०२०-कोल-बाजार सुगडी ०१, ०२

फोटो ओळ: संक्रातीमुळे बाजारात सुगडांना मागणी वाढली असून, जागोजागी अशी विक्री सुरु आहे.(छाया: नसीर अत्तार )

फोटो:

१००९२०२०-कोल-बाजार गाजर

फोटो ओळ: मागणी वाढल्याने गाजर व मटारची आवकही बाजारात जास्त दिसू लागली आहे. (छाया: नसीर अत्तार )

फोटो:

१००९२०२०-कोल-बाजार बाजरी

फोटो ओळ: संक्रातीमुळे बाजारात राळा, बाजरी आणि पिठाची गरज ओळखून असे विक्री स्टॅाल दिसत आहेत. (छाया: नसीर अत्तार )