शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
2
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
3
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
4
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
5
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
6
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
7
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
8
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
9
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
10
अपघात, रोग आणि चिंता होईल दूर! फक्त करा प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले ५ 'रामबाण' उपाय
11
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
12
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
13
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
14
शिराळ्यात नाईक विरुद्ध नाईक चुलत भावांमध्ये लढत! केदार नलवडे रिंगणात; तिरंगी सामन्यात कोण मारणार बाजी ?
15
'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर होता', लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला उघड इशारा, दिल्ली स्फोटानंतर लष्कर सज्ज
16
नुसती ढकलाढकली, मेट्रो जोडणीमुळे घाटकोपर स्टेशन ठरले गर्दीचे 'हॉटस्पॉट'!
17
मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत
18
फलटणमध्ये महायुतीतच 'खेळ'! शिंदेंच्या शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा, भाजपाकडून माजी खासदारांचा भाऊ मैदानात
19
कमाल! नोकरीसोबतच घराचीही जबाबदारी, ६ वेळा नापास; २ मुलींची आई ४० व्या वर्षी झाली IAS
20
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल जनतेला संशय : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 23:19 IST

कागल (जि.कोल्हापूर) : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना खरोखरच आरएसएसच्या विचारसरणीच्या विरोधात लढायचे आहे काय? भाजप-शिवसेना युतीचा पराभव व्हावा अशी ...

कागल (जि.कोल्हापूर) : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना खरोखरच आरएसएसच्या विचारसरणीच्या विरोधात लढायचे आहे काय? भाजप-शिवसेना युतीचा पराभव व्हावा अशी त्यांची खरोखरच इच्छा आहे काय? असा त्यांचाविषयी संशय आता जनतेच्या मनात येत आहे, असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रविवारी कागल येथील पत्रकारपरिषदेत केले.बहुजन वंचित आघाडी काँग्रेस -राष्ट्रवादीच्या आघाडीत यावी, अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे. प्रकाश आंबेडकर यांनी १२ जागा मागितल्यावर वरिष्ठ नेत्यांनी चार जागा देण्याची तयारी दर्शविली, पण यावर कोणतीच चर्चा न करता त्यांनी १९ जागांवर आपले उमेदवार जाहीर करून टाकले असेही मुंडेनी नमूद केले.अ‍ॅड. आंबेडकर यांच्या ‘लोकमत’मध्ये रविवारी प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीच्या अनुषंगाने धनंजय मुंडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांना नेमके करायचे आहे तरी काय ? त्यांची खरी लढाई कोणाबरोबर आहे. याबद्दल निश्चित धोरण दिसत नाही. भाजप-सेना युती होणारच होती. महाराष्ट्राच्या जनतेला पाच वर्षे वेड्यात काढण्याचे काम त्यांनी केले. सत्तेत राहून जनतेची दिशाभूल करण्याचे काम शिवसेनेने केले आहे. त्यामुळे भाजप -सेनेच्या पराभवासाठी आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीने काँग्रेस -राष्ट्रवादीशी आघाडी करावी.खासदार राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. त्यांचा योग्य सन्मान आमचे वरिष्ठ नेते करतील. त्यामुळे ते काँग्रेस- राष्ट्रवादी मित्रपक्षांच्या महाआघाडीसोबतच राहतील, असा मला विश्वास आहे.राज ठाकरेंची मदत होऊ शकते..मुंडे म्हणाले, मनसेच्या महाआडीतील समावेशाबाबत आमचे नेते निर्णय घेतील. पक्षाचे तसे काही ठरलेले नाही, पण अजित पवार यांची याबाबत भूमिका सकारात्मक आहे. आज राज ठाकरे भाजपच्या चुकीच्या धोरणांवर तुटून पडत आहेत. महाराष्ट्रात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. अशा परिस्थितीत त्यांची महाआघाडीला चांगली मदत होऊ शकते.मोदींंकडून देशभक्तीचे राजकारण...धनंजय मुंडे म्हणाले, यापूर्वीही भारताने पाकिस्तानाविरुद्ध युद्धे लढली. कोणी त्याचे राजकारण केले नाही, पण पंतप्रधान मोदी हे अत्यंत खालच्या पातळीवर येऊन याविषयाचे राजकारण करीत आहेत. हे सगळे एकट्याने केले. सगळे श्रेय माझेच, अशा थाटात भाषणे देत आहेत.आपले ४९ सैनिक ठार झाले म्हणून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केली, पण नेमके तेथे काय केले. हे अजून ते सांगू शकलेले नाहीत.पुलवामा जिल्ह्यातील हल्ल्यात बुलडाण्यात दोन जवान शहीद झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराला शासनाचा एकही मंत्री, पालकमंत्रीही हजर नव्हता.मोदींची सभा त्याचवेळी महाराष्ट्रात होती. ते राजकीय सभा, उद्घाटने करीत होते. ते देशभक्तीचे निव्वळ राजकारण करीत आहेत अशी टीकाही मुंडे यांनी केली.