शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

पावसामुळे कोल्हापूरातील फळबाजार गारठला

By admin | Published: July 02, 2017 6:06 PM

‘जी.एस.टी.’मुळे धान्यबाजारात संभ्रमावस्था : भाजीपाल्यात चढउतार कायम

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. 0२ : गेले चार-पाच दिवस जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने फळबाजार एकदम गारठला आहे. मालाची आवक व उठाव कमी झाला असून बाजारपेठेत शांतता आहे. केंद्र सरकारने जी. एस. टी. लागू केला असला तरी अद्याप त्याबाबतची स्पष्टता व परिणामांबाबत धान्यबाजारात संभ्रमावस्था पसरली आहे. त्याचा परिणाम उलाढालीवरही झाला असून भाजीपाला दरात मात्र चढउतार कायम राहिला आहे. जुलै महिन्यात फळांची आवक व उठाव कमीच असतो. त्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने फळबाजार एकदमच गांगरला आहे. डाळिंब वगळता अन्य फळांची आवक मंदावली असून मागणी नसल्याने दरावर परिणाम दिसत नाही. महिनाभर ही मंदी राहणार असून, त्यानंतर सीताफळ व नवीन सफरचंदांची आवक सुरू होणार आहे. सध्या आंध्रप्रदेशाहून मोसंबींची आवक सुरू आहे. पांढऱ्या पेशीसाठी पोषक असणारे ‘किव्ही’, तर पित्तनाशक ‘पल्म’ ही दोन फळे सध्या बाजारात आली आहेत. ‘किव्ही’ घाऊक बाजारात ११०० रुपये प्रतिबॉक्स असून, ‘पल्म’च्या बॉक्सची किंमत ३५० रुपये आहे. धान्यबाजार तसा पावसाळ्यात स्थिर राहतो; पण ‘जी. एस. टी.’मुळे व्यापारी गोंधळात पडले आहेत. आवकेवर त्याचा परिणाम झाला आहे. गत आठवड्याच्या तुलनेत साखर दीड रुपया, तूरडाळ, हरभरा डाळीच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांची घसरण झाली आहे. सरकी तेल किरकोळ बाजारात ७० रुपयांवर आहे. आषाढी एकादशी मंगळवारी असल्याने शाबूदाणा व ‘वरी’ची मागणी थोडी वाढली आहे. मागणी वाढली तरी दरात फारसा फरक दिसत नसून किरकोळ बाजारात शाबू व वरी ७० रुपये किलोचा दर राहिला आहे. सर्वत्र पाऊस सुरू असल्याने भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. स्थानिक भाजीपालाही कमी झाल्याने काही भाज्यांच्या दरांत वाढ, तर काही भाज्या घसरल्या आहेत. वांगी, टोमॅटो, ओली मिरची, दोडक्याच्या दरांत वाढ झाली आहे. कोबी, ढबू मिरची, गवार, भेंडी, वरण्याच्या दरांत मात्र घसरण झाली असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीच्या पेंढीचे दर कमी झाले आहेत. घाऊक बाजारात सरासरी १४ रुपये पेंढीचा दर आहे.

तोतापुरीची आवक मंदावली

पावसाळ्यात साधारणत: जूनपासून पुढे दोन महिने तोतापुरी आंब्यांची आवक चांगली असते; पण यंदा जुलैच्या पहिल्या आठवड्यातच आवक मंदावल्याने बाजारात ‘तोतापुरी’ फारसा दिसत नाही.

कांदा-बटाटा स्थिर

गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांदा, बटाट्यांची आवक निम्म्याने खाली आली आहे. तरीही दरांत फारसा चढउतार दिसत नाही. घाऊक बाजारात कांदा ९, बटाटा ११, तर लसूण ५० रुपये प्रतिकिलोचा दर आहे.