शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दबावामुळेच ‘सुगम’, ‘दुर्गम’च्या गावांचा घोळ

By admin | Updated: May 20, 2017 01:18 IST

शिक्षकच आमने-सामने : न्यायालयीन संघर्ष पेटणार, आरोप-प्रत्यारोपाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी एकीकडे ‘सुगम’, ‘दुर्गम’ गावांची नवी संकल्पना पुढे आणली असताना यामध्ये आपल्या मर्जीतील शिक्षकांची गैरसोय होऊ नये यासाठी नेतेमंडळींनीच अधिकाऱ्यांवर दबाव टाकून गावांमध्ये घोळ केल्याची चर्चा रंगात आली आहे. त्याही पुढे जात आता शिक्षकांमध्येच न्यायालयीन संघर्ष पेटणार असून यामुळे शैक्षणिक वातावरण ढवळून जाणार आहे. शासनाच्या आदेशाविरोधात शिक्षक संघटना समन्वय समितीने पंधरा शिक्षकांच्या नावावर स्थगिती घेतली होती. कोणत्याही संघटनेला स्थगिती मिळत नसल्याने ती वैयक्तिक स्वरूपात याचिका दाखल करण्यात आली होती. आता त्यामध्ये आणखी शिक्षकांची पुरवणी यादी जोडण्यात येणार आहे. त्यासाठी गुरुवारी सकाळी जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात शिक्षकांची बैठक घेण्यात आली. शिक्षक नेते नामदेव रेपे, कृष्णात कारंडे, बाजीराव तांदळे, राजाराम वरूटे, मोहन भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी न्यायालयीन खर्चासाठीची एक हजार रुपये वर्गणीही उपस्थित शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे दिली. आता या अन्य शेकडो शिक्षकांना या याचिकेमध्ये पुरवणी स्वरूपात समाविष्ट करण्यात येणार आहे.एकीकडे समन्वय समितीने हे आक्रमक पाऊल उचलले असताना दुसरीकडे दुर्गम शाळा शिक्षक संघानेही जशास तशी भूमिका घेतली आहे. त्यांनीही ही प्रक्रिया योग्य असून त्यानुसार ती राबवावी, असे निवेदन दिले आहे; परंतु त्यामध्ये कळीचा मुद्दा ही गावे ठरणार असून त्यावरूनच आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. निकष डावलून गावांची अदला-बदलया बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्याआधी ‘सुगम’ आणि ‘दुर्गम’ गावांची यादी तयार करताना कागल आणि हातकणंगले तालुक्यांच्या दबावामुळे अनेक गावांची अदलाबदल झाल्याची चर्चा शिक्षक वर्तुळात आहे. आधी ५५७ ‘दुर्गम’ गावे असताना ती आता ६४६ गावे झाली आहेत. शंभरभर गावे आपल्या जवळच्या शिक्षकांच्या सोयीसाठी घुसडण्यात आल्याचा आरोप होत आहे. बोरवडे दुर्गम कसे?कागल तालुक्यातील बोरवडे गाव वेगळ्याच बाबीने चर्चेला आले आहे. या गावाला चारी बाजूने रस्ते असतानाही हे गाव ‘दुर्गम’मध्ये कसे घालण्यात आले, असा सवाल आता विचारण्यात येत आहे. सर्व सोयींनी सुसज्ज असणारे हे गाव कुणाच्या सोयीसाठी ‘दुर्गम’मध्ये घातले याबाबत आता चर्चा असून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही ‘सुगम’, ‘दुर्गम’चा हा मुद्दा गाजण्याची चिन्हे आहेत. विस्थापित गावांमधील सेवेचे काय?जिल्ह्यातील अनेक धरणांसाठी काही गावे आणि वसाहतींचे पुनर्वसन करण्यात आले. धरणांमध्ये पाणी साठा झाल्यानंतरही काही गावांचे अस्तित्व नकाशातून पुसले गेले. शाहूवाडी तालुक्यातील तन्हाळी, निवडे, ढाकळे, चांदेल, कोठारवाडी अशी अनेक गावे चांदोली धरणासाठी विस्थापित करण्यात आली. या गावांची नावे सुगम, दुगर्मच्या यादीत नाहीत. मात्र, धरण होण्याआधी अशा दुर्गम गावांमध्ये काम केलेल्या शिक्षकांची सेवा गृहीत धरणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.