शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

दबावामुळेच ‘सुगम’, ‘दुर्गम’च्या गावांचा घोळ

By admin | Updated: May 20, 2017 01:18 IST

शिक्षकच आमने-सामने : न्यायालयीन संघर्ष पेटणार, आरोप-प्रत्यारोपाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी एकीकडे ‘सुगम’, ‘दुर्गम’ गावांची नवी संकल्पना पुढे आणली असताना यामध्ये आपल्या मर्जीतील शिक्षकांची गैरसोय होऊ नये यासाठी नेतेमंडळींनीच अधिकाऱ्यांवर दबाव टाकून गावांमध्ये घोळ केल्याची चर्चा रंगात आली आहे. त्याही पुढे जात आता शिक्षकांमध्येच न्यायालयीन संघर्ष पेटणार असून यामुळे शैक्षणिक वातावरण ढवळून जाणार आहे. शासनाच्या आदेशाविरोधात शिक्षक संघटना समन्वय समितीने पंधरा शिक्षकांच्या नावावर स्थगिती घेतली होती. कोणत्याही संघटनेला स्थगिती मिळत नसल्याने ती वैयक्तिक स्वरूपात याचिका दाखल करण्यात आली होती. आता त्यामध्ये आणखी शिक्षकांची पुरवणी यादी जोडण्यात येणार आहे. त्यासाठी गुरुवारी सकाळी जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात शिक्षकांची बैठक घेण्यात आली. शिक्षक नेते नामदेव रेपे, कृष्णात कारंडे, बाजीराव तांदळे, राजाराम वरूटे, मोहन भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी न्यायालयीन खर्चासाठीची एक हजार रुपये वर्गणीही उपस्थित शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे दिली. आता या अन्य शेकडो शिक्षकांना या याचिकेमध्ये पुरवणी स्वरूपात समाविष्ट करण्यात येणार आहे.एकीकडे समन्वय समितीने हे आक्रमक पाऊल उचलले असताना दुसरीकडे दुर्गम शाळा शिक्षक संघानेही जशास तशी भूमिका घेतली आहे. त्यांनीही ही प्रक्रिया योग्य असून त्यानुसार ती राबवावी, असे निवेदन दिले आहे; परंतु त्यामध्ये कळीचा मुद्दा ही गावे ठरणार असून त्यावरूनच आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. निकष डावलून गावांची अदला-बदलया बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्याआधी ‘सुगम’ आणि ‘दुर्गम’ गावांची यादी तयार करताना कागल आणि हातकणंगले तालुक्यांच्या दबावामुळे अनेक गावांची अदलाबदल झाल्याची चर्चा शिक्षक वर्तुळात आहे. आधी ५५७ ‘दुर्गम’ गावे असताना ती आता ६४६ गावे झाली आहेत. शंभरभर गावे आपल्या जवळच्या शिक्षकांच्या सोयीसाठी घुसडण्यात आल्याचा आरोप होत आहे. बोरवडे दुर्गम कसे?कागल तालुक्यातील बोरवडे गाव वेगळ्याच बाबीने चर्चेला आले आहे. या गावाला चारी बाजूने रस्ते असतानाही हे गाव ‘दुर्गम’मध्ये कसे घालण्यात आले, असा सवाल आता विचारण्यात येत आहे. सर्व सोयींनी सुसज्ज असणारे हे गाव कुणाच्या सोयीसाठी ‘दुर्गम’मध्ये घातले याबाबत आता चर्चा असून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही ‘सुगम’, ‘दुर्गम’चा हा मुद्दा गाजण्याची चिन्हे आहेत. विस्थापित गावांमधील सेवेचे काय?जिल्ह्यातील अनेक धरणांसाठी काही गावे आणि वसाहतींचे पुनर्वसन करण्यात आले. धरणांमध्ये पाणी साठा झाल्यानंतरही काही गावांचे अस्तित्व नकाशातून पुसले गेले. शाहूवाडी तालुक्यातील तन्हाळी, निवडे, ढाकळे, चांदेल, कोठारवाडी अशी अनेक गावे चांदोली धरणासाठी विस्थापित करण्यात आली. या गावांची नावे सुगम, दुगर्मच्या यादीत नाहीत. मात्र, धरण होण्याआधी अशा दुर्गम गावांमध्ये काम केलेल्या शिक्षकांची सेवा गृहीत धरणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.