शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
5
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
6
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
7
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
8
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
9
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
10
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
11
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
12
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
13
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
14
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
15
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
16
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
17
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
18
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
19
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
20
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

उदगावच्या नव्या पुलाला खड्ड्यांमुळे धोका

By admin | Updated: October 31, 2016 00:00 IST

डांबरीकरण करण्याची मागणी : शिरोळ तालुक्यातील पुलाचे अद्याप आॅडिट नाही

 संतोष बामणे ल्ल जयसिंगपूर महाडच्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने राज्यातील सर्व ब्रिटिकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करून घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पुलावरील डांबरीकरण खचल्यामुळे अनेक पुलांना धोका निर्माण झाला आहे. सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव (ता. शिरोळ) येथील उदगाव-अंकली दरम्यान नवीन पुलावर रस्त्याची दुरवस्था झाल्याने कोणतेही वाहन गेल्यास पुलास मोठा हादरा जाणवत असून, पुलाला धोका निर्माण झाला आहे. तसेच कोणतीही दुर्घटना होण्याअगोदर या पुलावरील मार्ग दुरुस्त करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांना जोडण्यासाठी कृष्णा नदीवर १८७८ मध्ये संस्थानिक व ब्रिटिश काळात दळणवळणसाठी प्रमुख मार्ग बांधण्यात आला. आजही तो या दळणवळणाचा साक्षीदार असुन आपली सेवा बजावत आहे. दरम्यान, या मार्गावर वाहतुकीची संख्या वाढल्याने १९९८ साली लोकप्रतिनिधी रेटा लावून या मार्गावर ब्रिटिशकालीन पुलाला पर्यायी पूल १९९८ साली मंजूर करून घेतला त्यानंतर प्रत्यक्षात २००० साली हा नवीन पूल बांधण्यात आला. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. चार महिन्यांपूर्वी सांगली-कोल्हापूर महामार्गावरील रस्त्याचे काम सुरू होते. यावेळी येथील ब्रिटिशकालीन पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र येथील नवीन पुलाचे डांबरीकरण करण्यात आले नाही. सध्या नवीन पुलावरील रस्ता खराब झाला आहे. तसेच पुलाच्या जोड पिलरच्या लगतच रस्त्याची दुरवस्था झाल्याने पुलावरून वाहन गेल्यास पुलाला हादरा बसत आहे. दरम्यान, जुन्या पुलाबरोबर याही पुलावरील डांबरीकरणाचे काम पूर्ण केले असते तर या पुलाची सुरक्षा वाढली असती. कोल्हापूर-सांगली महामार्गावर दररोज हजारो वाहनांची वाहतूक होते. तसेच कृष्णा नदीवर सांगली-कोल्हापूर महामार्गावर दोन समांतर पूल आहेत. त्यातील एक पूल ब्रिटिशकालीन असल्याने नव्या पुलावरूनच वाहतूक अवलंबून आहे. सध्या दोन्ही पुलांवरून वाहतुक सुरू असली तरी नव्या पुलाची जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यामुळे दोन्ही पूल सुरक्षित राहण्यासाठी पुलावरील डांबरीकरणाचे काम करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. या पुलावरून सांगली-मिरजवरून येणाऱ्या वाहनांची वर्दळ अधिक प्रमाणात असते. या पुलावरील ठिकठिकाणी असणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. काही वेळा किरकोळ अपघातही घडत आहेत. शिरोळ तालुक्यातील अकरा पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये उदगाव-अंकली नवा व जुना पूल, नृसिंहवाडी-कुरुंदवाड यादव पूल, मिरज-अर्जुनवाड पूल, चिंचवाड पूल, नृसिंहवाडी-औरवाड-नवीन व जुना पूल, कुरूंदवाड-शिरढोण पूल, शिरटी-हसूर नाला, कुरुंदवाड-अकिवाट कुंभार नाला, सैनिक टाकळी-खिद्रापूर पूल या पुलांचा समावेश आहे. यामध्ये वालचंद कॉलेज सांगली यांच्याकडून या पुलाचे आॅडिट होणार असल्याचे समजते. अकरा पुलांचे आॅडिट सांगली-कोल्हापूर महामार्गावरील रस्त्याचे कामकाज बीओटी कंपनीकडून सुरू आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून काम बंद आहे. तसेच उदगाव-अंकली या मर्गावरील जुन्या पुलावरील रस्त्याचे काम कंपनीने पूर्ण केले आहे; पण नवीन पुलावरील डांबरीकरण अद्याप झाले नाही. त्यामुळे या पुलाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिल्या आहेत. तसेच लवकरात लवकर हे काम पूर्ण करुन घेऊ. - वसंतराव वडेर, शाखा अभिंयता, जयसिंगपूर.