शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अधिकार्‍यांच्या मानसिकतेचा ‘भूविकास’ बळी चुकीची माहिती सादर करून बॅँक संपविण्याचा डाव : डी. ए. चौगुले समितीच्या अहवालात बॅँक सक्षमच

By admin | Updated: May 14, 2014 00:37 IST

कोल्हापूर : राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बॅँकेच्या (भूविकास बॅँक) अवसायकांसह सहकार विभागातील काही अधिकार्‍यांनी

 कोल्हापूर : राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बॅँकेच्या (भूविकास बॅँक) अवसायकांसह सहकार विभागातील काही अधिकार्‍यांनी शासनाला चुकीची माहिती सादर करून बॅँक अडचणीत असल्याचे भासविल्याचे दिसते. भूविकास बॅँक येणी-देणी समितीच्या अहवालात बॅँकेची स्थिती भक्कम असल्याचे स्पष्ट झाल्याने ‘भूविकास’ बॅँक अधिकार्‍यांच्या मानसिकतेचा बळी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. हा अहवाल आज (मंगळवार) सहकार आयुक्त व सहकार सचिवांना सादर करण्यात आला. शेतकर्‍यांना बांधावर जाऊन कर्जपुरवठा करणारी बॅँक म्हणून भूविकास बॅँकेकडे पाहिले जाते; पण गेल्या दहा-बारा वर्षांत अधिकार्‍यांची मानसिकता व लोकप्रतिनिधींची उदासीनता यांमुळे ही बॅँक अखेरची घटका मोजत आहे. याबाबत शासनाने अनेक कमिट्या नेमण्याचा केवळ फार्स केला. एकाही कमिटीच्या सूचनांची अंमलबजावणी केली नाही. बॅँकेचे अस्तित्व संपवायचेच या उद्देशाने सरकारी यंत्रणा कार्यरत आहे; पण कर्मचारी संघटनेने बॅँक वाचविण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी अकरा आमदारांची एक समिती नेमून बॅँकेबाबत अहवाल सादर करण्यास सांगितला. बॅँकेचे अवसायक डॉ. सुभाष माने यांनी बॅँकेच्या पुनरुज्जीवनामुळे शासनावर ३६१० कोटी रुपयांचा बोजा पडेल, असा अहवाल शासनास सादर केला. यामुळे बॅँकेचे अस्तित्व संपुष्टात येणार यावर शिक्कामोर्तब झाले; पण कर्मचारी संघटनेने सहकार मंत्र्यांच्या दारात उपोषणास बसण्याचा इशारा देत अवसायकांनी दिलेली माहिती चुकीची असल्याचा दावा केला. त्यानंतर सहकार मंत्र्यांनी कोल्हापूर विभागाचे सहनिबंधक (लेखापरीक्षण) डी. ए. चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली भूविकास बॅँक येणी-देणी निश्चिती समितीची स्थापना करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गेले दोन महिने या समितीने राज्यातील २९ शाखांचे ताळेबंद तपासून माहिती संकलित केली. यामध्ये धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अवसायक डॉ. माने यांनी दिलेली माहिती चुकीची असल्याचे या अहवालावरून स्पष्ट होते. शासनाने ‘भूविकास’च्या हमीपोटी ‘नाबार्ड’ला ८२३ कोटी ४७ लाख रुपये भरले; पण एकरकमी परतफेड योजनेतून शासनाकडून बॅँकेला ४०६ कोटी येणे आहे. त्याचबरोबर केंद्र शासन कर्जमाफी, तापी खोरे अंतर्गत कर्जमाफी, पंतप्रधान पॅकेजचे येणे ३१८ कोटी २३ लाख रुपये आहे. असे ७२२ कोटी रुपये शासनाकडून येणे रक्कम आहे. त्यामुळे बॅँक १०१ कोटी शासनाला देय लागते. याउलट बॅँकेचे शेतकर्‍यांकडून ८५१ कोटी येणे आहे. तसेच शाखांच्या स्थावर मालमत्तांची बाजारभावानुसार किंमत ४३९ कोटी होते.