शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
3
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
4
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
5
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
6
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
7
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
8
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
9
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
10
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
11
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
12
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
13
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
14
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
15
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
16
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
17
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
18
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
19
APAAR: राज्यभरातील १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे ‘अपार’ फेल
20
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?

सदाभाऊंची उणीव मादनाईक, तूपकर भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:50 IST

संतोष बामणे।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बुधवार, २५ रोजी पंढरपूर, तर शनिवार, २८ रोजी जयसिंगपूर येथे ऊस परिषद होत आहेत. तर आजपर्यंतच्या १५ ऊस परिषदा खासदार राजू शेट्टी व मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करून यशस्वी केल्या आहेत. तर सदाभाऊंच्या हकालपट्टीनंतर ही ऊस परिषदा पहिल्यांदाच होत ...

संतोष बामणे।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बुधवार, २५ रोजी पंढरपूर, तर शनिवार, २८ रोजी जयसिंगपूर येथे ऊस परिषद होत आहेत. तर आजपर्यंतच्या १५ ऊस परिषदा खासदार राजू शेट्टी व मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करून यशस्वी केल्या आहेत. तर सदाभाऊंच्या हकालपट्टीनंतर ही ऊस परिषदा पहिल्यांदाच होत आहेत. त्यामुळे स्वाभिमानीने पुन्हा जोमाने १६व्या ऊस परिषदेची तयारी केली जात आहे.ही ऊस परिषद यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक व वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तूपकर यांनी महाराष्ट्रासह कर्नाटकच्या सीमाभागात मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू केली आहे. त्यामुळे मादनाईक व तूपकर यांनी सदाभाऊंची उणीव भरून काढण्याचे काम सुरू केले आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना २००२मध्ये उदगाव गावात करण्यात आली. त्यानंतर दूध व औद्योगिक वसाहतीच्या पाण्याचे आंदोलन केल्यानंतर उदगावसह परिसरातील शेतकºयांनी व सावकार मादनाईक यांच्या पाठबळावर राजू शेट्टी यांनी उदगाव जिल्हा परिषद निवडणूक जिंकली. त्यानंतर एकवेळा आमदार तर आता दुसºयांदा ते खासदार झाले आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आतापर्यंत उसाच्या दराचा मुद्दा घेऊन शेतकºयांना आपापल्या मालाला भाव देण्याचे काम केले आहे.तर खासदार राजू शेट्टी यांच्या बरोबरीने लढणारे सदाभाऊ खोत या दोघांच्या राम-लक्ष्मणच्या जोडीने आजपर्यंत स्वाभिमानाने मोठे यश मिळविले आहे. तर गेल्या सहा महिन्यांपासून मंत्री खोत व स्वाभिमानीमध्ये मतभेद निर्माण झाल्याने स्वाभिमानीतून खोत यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंतच्या झालेल्या ऊस परिषदेत मंत्री खोत यांचे रांगडे भाषण ऐकायला शेतकरी आतूर असायचा. तर मंत्री खोत यांनी रयत क्रांती संघटनेची स्थापना केल्याने स्वाभिमानी संघटनेत मोठी उणीव निर्माण झाली आहे. मात्र, ती उणीव भरून काढण्यासाठी स्वाभिमानीचे शिलेदार सावकार मादनाईक व रविकांत तूपकर यांनी मराठवाडा, सोलापूर, पश्चिम महाराष्ट्र तर कर्नाटकातील सीमाभागात सभा घेवून शेतकºयांना ऊस परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन करीत आहेत. तसेच स्वाभिमानीचे सर्वच कार्यकर्ते ऊस परिषदेच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही १६वी ऊस परिषद ही स्वाभिमानीच्या अस्तित्वाची असणार असल्याचे दिसून येत आहे.तूपकर असणार मुलुख मैदानी तोफस्वाभिमानीचे विदर्भातील युवा कार्यकर्ते रविकांत तूपकर यांनी वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्यावर शेतकºयांचा विश्वास वाढला आहे. तूपकर यांनी महाराष्ट्रभरात दौरे करून शेतकºयांना जागृत करण्याचे काम करीत आहेत. तर सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी संघटनेतून हकालपट्टी केल्यामुळे स्वाभिमानीला कोणताच फरक पडणार नसल्याचे तूपकर म्हणतात. तर रांगड्या मराठी भाषेचे कौशल्यही तूपकर यांच्याकडे असल्याने शेतकरी आता मुलुख मैदानी तोफ म्हणून तूपकर यांची ओळख होणार आहे.