शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

सदाभाऊंची उणीव मादनाईक, तूपकर भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:50 IST

संतोष बामणे।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बुधवार, २५ रोजी पंढरपूर, तर शनिवार, २८ रोजी जयसिंगपूर येथे ऊस परिषद होत आहेत. तर आजपर्यंतच्या १५ ऊस परिषदा खासदार राजू शेट्टी व मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करून यशस्वी केल्या आहेत. तर सदाभाऊंच्या हकालपट्टीनंतर ही ऊस परिषदा पहिल्यांदाच होत ...

संतोष बामणे।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बुधवार, २५ रोजी पंढरपूर, तर शनिवार, २८ रोजी जयसिंगपूर येथे ऊस परिषद होत आहेत. तर आजपर्यंतच्या १५ ऊस परिषदा खासदार राजू शेट्टी व मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करून यशस्वी केल्या आहेत. तर सदाभाऊंच्या हकालपट्टीनंतर ही ऊस परिषदा पहिल्यांदाच होत आहेत. त्यामुळे स्वाभिमानीने पुन्हा जोमाने १६व्या ऊस परिषदेची तयारी केली जात आहे.ही ऊस परिषद यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक व वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तूपकर यांनी महाराष्ट्रासह कर्नाटकच्या सीमाभागात मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू केली आहे. त्यामुळे मादनाईक व तूपकर यांनी सदाभाऊंची उणीव भरून काढण्याचे काम सुरू केले आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना २००२मध्ये उदगाव गावात करण्यात आली. त्यानंतर दूध व औद्योगिक वसाहतीच्या पाण्याचे आंदोलन केल्यानंतर उदगावसह परिसरातील शेतकºयांनी व सावकार मादनाईक यांच्या पाठबळावर राजू शेट्टी यांनी उदगाव जिल्हा परिषद निवडणूक जिंकली. त्यानंतर एकवेळा आमदार तर आता दुसºयांदा ते खासदार झाले आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आतापर्यंत उसाच्या दराचा मुद्दा घेऊन शेतकºयांना आपापल्या मालाला भाव देण्याचे काम केले आहे.तर खासदार राजू शेट्टी यांच्या बरोबरीने लढणारे सदाभाऊ खोत या दोघांच्या राम-लक्ष्मणच्या जोडीने आजपर्यंत स्वाभिमानाने मोठे यश मिळविले आहे. तर गेल्या सहा महिन्यांपासून मंत्री खोत व स्वाभिमानीमध्ये मतभेद निर्माण झाल्याने स्वाभिमानीतून खोत यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंतच्या झालेल्या ऊस परिषदेत मंत्री खोत यांचे रांगडे भाषण ऐकायला शेतकरी आतूर असायचा. तर मंत्री खोत यांनी रयत क्रांती संघटनेची स्थापना केल्याने स्वाभिमानी संघटनेत मोठी उणीव निर्माण झाली आहे. मात्र, ती उणीव भरून काढण्यासाठी स्वाभिमानीचे शिलेदार सावकार मादनाईक व रविकांत तूपकर यांनी मराठवाडा, सोलापूर, पश्चिम महाराष्ट्र तर कर्नाटकातील सीमाभागात सभा घेवून शेतकºयांना ऊस परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन करीत आहेत. तसेच स्वाभिमानीचे सर्वच कार्यकर्ते ऊस परिषदेच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही १६वी ऊस परिषद ही स्वाभिमानीच्या अस्तित्वाची असणार असल्याचे दिसून येत आहे.तूपकर असणार मुलुख मैदानी तोफस्वाभिमानीचे विदर्भातील युवा कार्यकर्ते रविकांत तूपकर यांनी वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्यावर शेतकºयांचा विश्वास वाढला आहे. तूपकर यांनी महाराष्ट्रभरात दौरे करून शेतकºयांना जागृत करण्याचे काम करीत आहेत. तर सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी संघटनेतून हकालपट्टी केल्यामुळे स्वाभिमानीला कोणताच फरक पडणार नसल्याचे तूपकर म्हणतात. तर रांगड्या मराठी भाषेचे कौशल्यही तूपकर यांच्याकडे असल्याने शेतकरी आता मुलुख मैदानी तोफ म्हणून तूपकर यांची ओळख होणार आहे.