शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

बौद्धिक अक्षम मुलांच्या शाळांची निधीअभावी फरफट: दातृत्वाचाच आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:48 IST

शासकीय मान्यतेपेक्षा अधिक विद्यार्थी, तुटपुंज्या पगारावर होणारी शिक्षक व कर्मचारी भरती, शाळेच्या व्यवस्थापनावर होणारा वाढीव खर्च, अनुदानाचा अभाव अशा विविध कारणांमुळे बौद्धिक अक्षम (मतिमंद) विद्यार्थ्यांसाठी चालविल्या जाणाऱ्या शाळांची फरफट

ठळक मुद्देगतिमान विद्यार्थ्यांचे अनुदानापासून ते सोयी-सुविधांपर्यंतचे प्रश्न

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : शासकीय मान्यतेपेक्षा अधिक विद्यार्थी, तुटपुंज्या पगारावर होणारी शिक्षक व कर्मचारी भरती, शाळेच्या व्यवस्थापनावर होणारा वाढीव खर्च, अनुदानाचा अभाव अशा विविध कारणांमुळे बौद्धिक अक्षम (मतिमंद) विद्यार्थ्यांसाठी चालविल्या जाणाऱ्या शाळांची फरफट होत आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीने चालविल्या जाणाºया शाळांना समाजाच्या दातृत्वाचा आधार घ्यावा लागतो.

कोल्हापूर शहरात चेतना, स्वयंम् आणि जिज्ञासा या मतिमंद मुलांसाठीच्या तीन विशेष शाळा आहेत. त्यातील चेतना शाळेत १५० विद्यार्थी असून त्यांपैकी शाळेसाठी ५० आणि कार्यशाळा, प्रशिक्षण आणि लघुउद्योगासाठी ५० अशा शंभर मुलांचे अनुदान दिले जाते. उर्वरित ५० विद्यार्थ्यांचा खर्च भागविण्यासाठी देणगीदारांची मदत घ्यावी लागते. स्वयंम् शाळेमध्ये १४५ विद्यार्थी आहेत; त्यांपैकी केवळ ४० विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. उरलेल्या मुलांचा खर्च व्यवस्थापन देणगीदारांकडून आलेल्या निधीतून, तर कधी स्वत:चे पैसे घालून करते. जिज्ञासा शाळेमध्ये १२५ विद्यार्थी आहे. त्यापैकी शैक्षणिक वर्गासाठी ५५ व कार्यशाळेसाठी ५० विद्यार्थ्यांचे अनुदान शाळेला मंजूर आहे. कोल्हापुरातील वरील तीनही चांगल्या पद्धतीने चालणाºया शाळांना अतिरिक्त विद्यार्थ्यांचा खर्च दानशूरांनी केलेल्या मदतीतून भागवावा लागतो.

शाळेतील आठ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असा नियम आहे; पण शासनाने शिक्षक भरतीच थांबवल्याने विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक आणि कर्मचाºयांची संख्या कमी आहे. त्यामुळे खासगी तत्त्वावर तुटपुंज्या पगारात त्यांची नियुक्ती करावी लागते. त्याचा अतिरिक्त बोजा व्यवस्थापनावर पडतो.निधीचा वापर चुकीच्या ठिकाणीजून महिन्यात शासनाने जाहीर केलेल्या अध्यादेशानुसार महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या अंदाजपत्रकातील पाच टक्के निधी हा दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी खर्च करायचा आहे. पूर्वी ही रक्कम तीन टक्के इतकी होती. हा निर्णय चांगला असला तरी यंत्रणेकडून पूर्णत: निधी खर्च होत नाही. शासकीय अधिकाºयांनाच या विषयाचे ज्ञान नसल्याने चुकीच्या ठिकाणी पैसा खर्च केला जातो. फार तर केबिन किंवा साहित्याचे वाटप केले जाते. योग्य त्या व्यक्ती व संस्थांपर्यंत निधी पोहोचत नाही.पाच हजार विद्यार्थी शाळाबाह्यकोल्हापूर जिल्ह्यात जवळपास ३६ हजार जणांनी दिव्यांगत्वाची नोंदणी केली आहे. त्यात बौद्धीक अक्षम, मेंदूचा आजार, मेंदूचा पक्षाघात अशा व्यक्तींची संख्या सात ते आठ हजार आहेत. त्यांच्यासाठी शहरात तीन, तर जिल्ह्यात जवळपास २० शाळा आहेत. चांगल्या पद्धतीने चालणाºया एका शाळेत १०० ते १५० विद्यार्थी असतात. त्यानुसार जास्तीत जास्त दोन ते तीन हजार विद्यार्थ्यांना शाळेचा लाभ मिळतो. उर्वरित पाच हजार विद्यार्थी हे शाळाबाह्य आहेत. त्यात ग्रामीण भागातील संख्या जास्त आहे.आम्ही महापालिकेकडे अर्थसाहाय्याची मागणी केली तेव्हा अधिकाºयांनी व्हीलचेअर, केबीन, सायकल वाटप अशा लाभार्थ्यांची यादी आमच्यासमोर ठेवली. बौद्धिक अक्षम विद्यार्थी असंघटित आहेत, आंदोलनं करू शकत नाहीत, शासनाकडे दाद मागू शकत नाहीत; त्यामुळे त्यांच्याकडे शासकीय यंत्रणांकडूनही दुर्लक्षच केले जाते. शासनाकडून योजनांच्या केवळ घोषणा होतात. - अमरदीप पाटील, उपाध्यक्ष, इंडियन रेडक्रॉस सोसायटी

टॅग्स :kolhapurकोल्हापूर