शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

अपुऱ्या पावसाने उत्पादन घटणार

By admin | Updated: September 8, 2015 23:39 IST

आजरा पंचायत समिती सभा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

आजरा : यावर्षी सरासरी पावसाच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला असल्याने शेती उत्पादन केवळ ३५ ते ४० टक्केच मिळणार आहे. अपुऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशा मागणीचा ठराव आजरा पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला.सभापती विष्णूपंत केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. सहाय्यक गटविकास अधिकारी एस. एस. भोसले यांनी स्वागत केले. अपुऱ्या पावसाच्या कारणास्तव यंदा पिकस्थिती समाधानकारक नसल्याचा अहवाल तालुका कृषी अधिकारी श्रीकांत निकम यांनी मांडला. आजरा तालुक्यात सर्पदंशाच्या घटनांचे प्रमाण वाढत असून यामुळे स्थानिक पातळीवर सुसज्ज यंत्रणेच्या अभावामुळे अनेक रूग्ण दगावण्याच्य घटना घडत असल्याचे विलास जोशिलकर यांनी स्पष्ट केले. आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना सभापती केसरकर यांनी केल्या.आजरा-गडहिंग्लज मार्गावर उत्तूर फाट्याजवळ असणारे पिकअप शेड चारचाकी वाहनांच्या अपघातास कारणीभूत ठरत असल्याने त्या पिक-अप-शेडची एस.टी. महामंडळाने दुसरीकडे व्यवस्था करावी, असे सभापती केसरकर यांनी सांगितले.गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आजरा आगारातर्फे मुंबई येथे सोडण्यात येणाऱ्या जादा बसफेऱ्यांची माहिती आगार व्यवस्थापक के. डी. मुरूकटे यांनी दिली. शिष्यवृत्तीसह विविध परीक्षांमध्ये तालुक्याने यश मिळविल्याबद्दल गटशिक्षण अधिकारी बी. एम. कासार व शिक्षण विभागाच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. सभेमध्ये विविध खात्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी ए. डी. कांबळे, कामिनी पाटील, उपसभापती दीपक देसाई, अनिता नाईक, निर्मला व्हनबट्टे, तुळशीराम कांबळे यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)बरगे टाकून पाणी अडविणारपावसाने पाठ फिरवल्याने आजरा तालुक्यातील सर्व बंधाऱ्यांमध्ये बरगे टाकून पाणी अडविण्यास सुरूवात करणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे अभियंता हारदे यांनी सांगितले.