शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
3
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
5
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
6
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
7
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
8
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
9
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
10
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
11
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
13
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
15
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
16
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
17
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
18
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
19
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
20
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

महापुरामुळे नदीकाठावरील शेती पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:28 IST

संतोष भोसले किणी : महापुरामुळे नदीकाठावरील शेतीला पाणीपुरवठा करणारे विद्युत मोटारपंप, तराफे वाहून गेले आहेत तर, ट्रान्सफर, विजेचे ...

संतोष भोसले

किणी : महापुरामुळे नदीकाठावरील शेतीला पाणीपुरवठा करणारे विद्युत मोटारपंप, तराफे वाहून गेले आहेत तर, ट्रान्सफर, विजेचे पोल मोडून पडले असल्याने शेतीला पाणीपुरवठा करणारी यंत्रणाच कोलमडून गेली असल्याने महापुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने २०१९ महापुरात झालेल्या नुकसानीची पंचनामे करूनसुद्धा कोणत्याही नुकसानभरपाई मिळाली नसल्याने स्वखर्चाने दुरुस्ती करावी लागेल. यावर्षी तरी शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱी व पाणीपुरवठा संस्थाकडून करण्यात येत आहे.

नदीकाठावर शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी बसविलेल्या शेतकऱ्यांच्या वैयक्तिक मालकीचे व सहकारी पाणीपुरवठा संस्थाचे विद्युत मोटारपंप , तराफे वाहून गेले तर मोटारपंपाला विद्युत पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मर,पोल अक्षरशः मोडून पडले आहेत तर स्टाट्रर, ॲटोस्वीचसह विविध प्रकारचे उपकरणे पाण्यामुळे खराब झालू असल्याने पिकाच्या बरोबर शेतीला पाणीपुरवठा करणारी यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सहकारी पाणीपुरवठा संस्था व खासगी पंपधारक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

जिल्ह्यात उच्चदाब विजेच्या शंभर सहकारी पाणीपुरवठा संस्था असून त्याचे सभासद अल्पभूधारक शेतकरी आहेत. या उच्चदाब सहकारी पाणीपुरवठा संस्थांना विद्युत पुरवठा करणारे ट्रान्सफाॅर्मरसह, विद्युत तारा व पोल याची दुरूस्ती स्वखर्चाने करावी लागते याचा खर्च मोठ्या प्रमाणात येते असल्याने याचा आर्थिक बोजा साहजिकच अल्पभूधारक शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. शेती सावरण्यासाठी शासनाने याचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी व पाणी संस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.

...........

त्वरित पंचनामे करा

महापुरामुळे शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या सिंचन योजनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून २०१९ महापुरातील नुकसानीची पंचनामे करून १३ कोटी ८४ लाख रुपयांची नुकसानीची रक्कम निश्चित केले होती. मात्र, शासनाकडून नुकसानभरपाई दिली नाही. यावर्षी महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेती सावरण्यासाठी पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील(किणीकर)यांनी केले आहे.