शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

महापुरामुळे नदीकाठावरील शेती पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:28 IST

संतोष भोसले किणी : महापुरामुळे नदीकाठावरील शेतीला पाणीपुरवठा करणारे विद्युत मोटारपंप, तराफे वाहून गेले आहेत तर, ट्रान्सफर, विजेचे ...

संतोष भोसले

किणी : महापुरामुळे नदीकाठावरील शेतीला पाणीपुरवठा करणारे विद्युत मोटारपंप, तराफे वाहून गेले आहेत तर, ट्रान्सफर, विजेचे पोल मोडून पडले असल्याने शेतीला पाणीपुरवठा करणारी यंत्रणाच कोलमडून गेली असल्याने महापुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने २०१९ महापुरात झालेल्या नुकसानीची पंचनामे करूनसुद्धा कोणत्याही नुकसानभरपाई मिळाली नसल्याने स्वखर्चाने दुरुस्ती करावी लागेल. यावर्षी तरी शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱी व पाणीपुरवठा संस्थाकडून करण्यात येत आहे.

नदीकाठावर शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी बसविलेल्या शेतकऱ्यांच्या वैयक्तिक मालकीचे व सहकारी पाणीपुरवठा संस्थाचे विद्युत मोटारपंप , तराफे वाहून गेले तर मोटारपंपाला विद्युत पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मर,पोल अक्षरशः मोडून पडले आहेत तर स्टाट्रर, ॲटोस्वीचसह विविध प्रकारचे उपकरणे पाण्यामुळे खराब झालू असल्याने पिकाच्या बरोबर शेतीला पाणीपुरवठा करणारी यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सहकारी पाणीपुरवठा संस्था व खासगी पंपधारक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

जिल्ह्यात उच्चदाब विजेच्या शंभर सहकारी पाणीपुरवठा संस्था असून त्याचे सभासद अल्पभूधारक शेतकरी आहेत. या उच्चदाब सहकारी पाणीपुरवठा संस्थांना विद्युत पुरवठा करणारे ट्रान्सफाॅर्मरसह, विद्युत तारा व पोल याची दुरूस्ती स्वखर्चाने करावी लागते याचा खर्च मोठ्या प्रमाणात येते असल्याने याचा आर्थिक बोजा साहजिकच अल्पभूधारक शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. शेती सावरण्यासाठी शासनाने याचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी व पाणी संस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.

...........

त्वरित पंचनामे करा

महापुरामुळे शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या सिंचन योजनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून २०१९ महापुरातील नुकसानीची पंचनामे करून १३ कोटी ८४ लाख रुपयांची नुकसानीची रक्कम निश्चित केले होती. मात्र, शासनाकडून नुकसानभरपाई दिली नाही. यावर्षी महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेती सावरण्यासाठी पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील(किणीकर)यांनी केले आहे.