शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

महापुरामुळे नदीकाठावरील शेती पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:28 IST

संतोष भोसले किणी : महापुरामुळे नदीकाठावरील शेतीला पाणीपुरवठा करणारे विद्युत मोटारपंप, तराफे वाहून गेले आहेत तर, ट्रान्सफर, विजेचे ...

संतोष भोसले

किणी : महापुरामुळे नदीकाठावरील शेतीला पाणीपुरवठा करणारे विद्युत मोटारपंप, तराफे वाहून गेले आहेत तर, ट्रान्सफर, विजेचे पोल मोडून पडले असल्याने शेतीला पाणीपुरवठा करणारी यंत्रणाच कोलमडून गेली असल्याने महापुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने २०१९ महापुरात झालेल्या नुकसानीची पंचनामे करूनसुद्धा कोणत्याही नुकसानभरपाई मिळाली नसल्याने स्वखर्चाने दुरुस्ती करावी लागेल. यावर्षी तरी शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱी व पाणीपुरवठा संस्थाकडून करण्यात येत आहे.

नदीकाठावर शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी बसविलेल्या शेतकऱ्यांच्या वैयक्तिक मालकीचे व सहकारी पाणीपुरवठा संस्थाचे विद्युत मोटारपंप , तराफे वाहून गेले तर मोटारपंपाला विद्युत पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मर,पोल अक्षरशः मोडून पडले आहेत तर स्टाट्रर, ॲटोस्वीचसह विविध प्रकारचे उपकरणे पाण्यामुळे खराब झालू असल्याने पिकाच्या बरोबर शेतीला पाणीपुरवठा करणारी यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सहकारी पाणीपुरवठा संस्था व खासगी पंपधारक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

जिल्ह्यात उच्चदाब विजेच्या शंभर सहकारी पाणीपुरवठा संस्था असून त्याचे सभासद अल्पभूधारक शेतकरी आहेत. या उच्चदाब सहकारी पाणीपुरवठा संस्थांना विद्युत पुरवठा करणारे ट्रान्सफाॅर्मरसह, विद्युत तारा व पोल याची दुरूस्ती स्वखर्चाने करावी लागते याचा खर्च मोठ्या प्रमाणात येते असल्याने याचा आर्थिक बोजा साहजिकच अल्पभूधारक शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. शेती सावरण्यासाठी शासनाने याचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी व पाणी संस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.

...........

त्वरित पंचनामे करा

महापुरामुळे शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या सिंचन योजनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून २०१९ महापुरातील नुकसानीची पंचनामे करून १३ कोटी ८४ लाख रुपयांची नुकसानीची रक्कम निश्चित केले होती. मात्र, शासनाकडून नुकसानभरपाई दिली नाही. यावर्षी महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेती सावरण्यासाठी पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील(किणीकर)यांनी केले आहे.