शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळ सदस्यांचे अस्तित्व संपुष्टात

By admin | Updated: January 6, 2017 00:26 IST

सक्तीचा शिक्षण अधिकार कायदा : पालिकांकडील शिक्षण मंडळांवर आयुक्त व मुख्याधिकाऱ्यांचे नियंत्रण

इचलकरंजी : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा सन २००१ पासून अस्तित्वात आल्यामुळे महापालिका व नगरपालिका यांच्याकडील शिक्षण मंडळ सदस्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. महापालिकांकडील आयुक्त व नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची शिक्षण मंडळाकडे सक्षम व नियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे स्पष्ट आदेश शिक्षण खात्याने दिले आहेत.जिल्ह्याकडे असलेल्या प्राथमिक शिक्षणाच्या शाळेवर संबंधित जिल्हा परिषदेकडील शिक्षण समितीचे नियंत्रण होते. त्यापैकी काही गावांचे नगरपालिका व महापालिकांमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्या गावातील प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळा संबंधित पालिकांकडे नगरसेवकांकडून निवडून आलेल्या शिक्षण मंडळाकडे नियंत्रणासाठी देण्यात आल्या होत्या. अशा शिक्षण मंडळावर शासनाकडून प्रशासन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. शिक्षण मंडळाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी शिक्षण खात्याकडील अधिनियमानुसार हे प्रशासन अधिकारी करीत असत.सन २००९ मध्ये केंद्र सरकारने बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा अस्तित्वात आणला. त्यामुळे सन २००० पूर्वीचे प्राथमिक शिक्षणाशी निगडित सर्व कायदे व अधिनियम रद्द झाले. या कायद्यानुसार मुंबई प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण, हैदराबाद सक्तीचे प्राथमिक शिक्षण व मध्य प्रदेश प्राथमिक शिक्षण अधिनियम बरखास्त करण्यात आले. या पार्श्वभूमीवर महापालिका व नगरपालिकांमधील शिक्षण मंडळांकडील सदस्यांचे अस्तित्व संपुष्टात आले. सरकारच्या या निर्णयाविरोधात पिंपरी-चिंचवड पालिकेतील तत्कालीन शिक्षण मंडळ सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर सध्याच्या शिक्षण मंडळांच्या सदस्यांचा कालावधी असेपर्यंत शिक्षण मंडळाकडील सदस्यांचे अस्तित्व अबाधित ठेवावे, असे आदेश न्यायालयाने दिले.उच्च न्यायालयाच्या या आदेशाला अधिन राहून १ जुलै २०१३ रोजी शासनाने महापालिका व नगरपालिकांकडील अस्तित्वात असलेल्या शिक्षण मंडळांच्या जुन्या सभागृहांची मुदत संपल्यानंतर त्यांचे अस्तित्व बरखास्त केले. आता नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या असून, जुन्या सभागृहाने निवडलेल्या सर्व शिक्षण मंडळांकडील सदस्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. परिणामी महापालिकांकडील आयुक्त व नगरपालिकांकडील मुख्याधिकारी हे शिक्षण मंडळावर सक्षम अधिकारी व नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतील. त्यांचे आदेश व सूचना शिक्षण मंडळांकडे कार्यरत असणारे प्रशासन अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना बंधनकारक राहतील, अशा आशयाचे निर्देश शासनाच्या शिक्षण खात्याने सर्व शिक्षण मंडळांना दिले आहेत. शासनाच्या या आदेशाप्रमाणे कोल्हापूर, सांगली, सातारा व रत्नागिरी जिल्ह्यांतील नवनिर्वाचित नगरपालिकांकडील शिक्षण मंडळांकडील सदस्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, जयसिंगपूर, कागल व गडहिंग्लज, सांगली जिल्ह्यातील विटा व तासगाव, सातारा जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, फलटण, वाई, पाचगणी व महाबळेश्वर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी प्राथमिक शिक्षण मंडळाचा समावेश आहे. (प्रतिनिधी)मंडळाच्या नियंत्रणाबाबत संभ्रमनगरपालिकेकडे अस्तित्वात येणाऱ्या शिक्षण समिती व समितीचे सभापती यांना प्राथमिक शिक्षण मंडळाकडे कामकाज करण्यासाठी अधिकार असणार की नाही? यासंदर्भात शासनाचे कोणत्याही प्रकारचे निर्देश नाहीत. त्यामुळे नगरपालिका शिक्षण समिती व सभापती यांच्याकडून शिक्षण मंडळाविषयी घेण्यात येणाऱ्या निर्णयांबाबत बैठका होणार की नाही ? याबाबत संभ्रमावस्था आहे.