शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या वणव्यामध्ये होरपळतोय कवठेमहांकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:52 IST

अर्जुन कर्पे । लोकमत न्यूज नेटवर्क कवठेमहांकाळ : गतवर्षी अत्यल्प झालेले पर्जन्यमान, चालूवर्षी ४३ अंशावर गेलेले तापमान, आटलेले पाण्याचे ...

अर्जुन कर्पे ।लोकमत न्यूज नेटवर्ककवठेमहांकाळ : गतवर्षी अत्यल्प झालेले पर्जन्यमान, चालूवर्षी ४३ अंशावर गेलेले तापमान, आटलेले पाण्याचे स्रोत, अपूर्ण असलेल्या सिंचन योजना यामुळे कवठेमहांकाळ तालुका उन्हाच्या आगीत आणि दुष्काळाच्या वणव्यात होरपळत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी घाटमाथा व ढालगाव परिसर टाहो फोडत आहे.कवठेमहांकाळ तालुक्यात घाटमाथा व ढालगाव परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक अक्षरश: वण वण भटकत आहेत. तालुक्यात या परिसरातील १९ गावांना व १०९ वाड्या-वस्त्यांवर टँकर सुरू असून, या सुरू असणाऱ्या खेपाही अपुºया पडत आहेत. वाढीव खेपांची मागणी होऊ लागली आहे. ३० हजारांवर लोकसंख्या पाण्याच्या टँकरवर तहान भागवत आहे.तालुक्यात विहिरी, कूपनलिका, तलाव हे पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत आहेत. परंतु विहिरींनी तळ गाठला आहे. कूपनलिकांची पाण्याची पातळी घटली आहे. सिंचन योजनांचे पाणी मृगजळ आहे. त्यामध्ये नियमित पणा नाही. टेंभू व म्हैसाळ योजनेची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे पाणी सोडण्यातही अडचणी आहेत.सध्या तालुक्यात १९ गावांना व १०९ वाड्या-वस्त्यांना १३ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामध्ये सध्या केरेवाडी, जाखापूर, रांजणी, घाटनांद्रे, कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली, घोरपडी, रायवाडी, चोरोची, लोणारवाडी, अलकूड एस, ढालगाव, कोकळे, इरळी, चुडेखिंडी, शिंदेवाडी (घो) या गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र रांजणी, केरेवाडी, अलकूड एस या गावांनी आणखी जादा टँकरची प्रशासनाकडे मागणी केली आहे.तालुक्यात दरवर्षीच पाणीटंचाई असते. परंतु यावर्षी नेहमीपेक्षा पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. टँकरने देण्यात येणारे पिण्याचे पाणी फक्त नागरिकांना दिले जाते. परंतु नागरिकांना या वाटणीला आलेल्या पाण्यातून स्वत:ची व जनावरांचीही तहान भागवावी लागत असल्याने, वाटण्यात येणारे टॅँकरचे पाणी पुरेसे होत नाही. त्यामुळे यावर्षी अधिकच पाणी मागणी वाढली आहे.तालुक्यात ११ तलावांपैकी ४ तलाव कोरडे पडले असून, ४ तलाव सीलखाली आहेत. २६ एप्रिलपर्यंतची ही तलावांची स्थिती आहे. तालुक्यातील टंचाईची परिस्थिती कायमची हटवायची असेल, तर म्हैसाळ व टेंभू योजना कायमस्वरूपी व नियमित सुरू ठेवल्या पाहिजेत. पावसाचे पाणी अडवून ते जिरवले पाहिजे व भूजल पातळी वाढविण्यास मदत केली पाहिजे. तालुक्यातील भूजल पातळी ही गेल्या पाच वर्षांत ६.५७ अशी होती, आता त्यामध्ये घट झाली आहे. ती ७.८० इतकी झाली आहे. त्यामुळे पाण्याचे असणारे स्रोत आटले आहेत.