शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

दुष्काळाच्या वणव्यामध्ये होरपळतोय कवठेमहांकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:52 IST

अर्जुन कर्पे । लोकमत न्यूज नेटवर्क कवठेमहांकाळ : गतवर्षी अत्यल्प झालेले पर्जन्यमान, चालूवर्षी ४३ अंशावर गेलेले तापमान, आटलेले पाण्याचे ...

अर्जुन कर्पे ।लोकमत न्यूज नेटवर्ककवठेमहांकाळ : गतवर्षी अत्यल्प झालेले पर्जन्यमान, चालूवर्षी ४३ अंशावर गेलेले तापमान, आटलेले पाण्याचे स्रोत, अपूर्ण असलेल्या सिंचन योजना यामुळे कवठेमहांकाळ तालुका उन्हाच्या आगीत आणि दुष्काळाच्या वणव्यात होरपळत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी घाटमाथा व ढालगाव परिसर टाहो फोडत आहे.कवठेमहांकाळ तालुक्यात घाटमाथा व ढालगाव परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक अक्षरश: वण वण भटकत आहेत. तालुक्यात या परिसरातील १९ गावांना व १०९ वाड्या-वस्त्यांवर टँकर सुरू असून, या सुरू असणाऱ्या खेपाही अपुºया पडत आहेत. वाढीव खेपांची मागणी होऊ लागली आहे. ३० हजारांवर लोकसंख्या पाण्याच्या टँकरवर तहान भागवत आहे.तालुक्यात विहिरी, कूपनलिका, तलाव हे पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत आहेत. परंतु विहिरींनी तळ गाठला आहे. कूपनलिकांची पाण्याची पातळी घटली आहे. सिंचन योजनांचे पाणी मृगजळ आहे. त्यामध्ये नियमित पणा नाही. टेंभू व म्हैसाळ योजनेची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे पाणी सोडण्यातही अडचणी आहेत.सध्या तालुक्यात १९ गावांना व १०९ वाड्या-वस्त्यांना १३ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामध्ये सध्या केरेवाडी, जाखापूर, रांजणी, घाटनांद्रे, कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली, घोरपडी, रायवाडी, चोरोची, लोणारवाडी, अलकूड एस, ढालगाव, कोकळे, इरळी, चुडेखिंडी, शिंदेवाडी (घो) या गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र रांजणी, केरेवाडी, अलकूड एस या गावांनी आणखी जादा टँकरची प्रशासनाकडे मागणी केली आहे.तालुक्यात दरवर्षीच पाणीटंचाई असते. परंतु यावर्षी नेहमीपेक्षा पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. टँकरने देण्यात येणारे पिण्याचे पाणी फक्त नागरिकांना दिले जाते. परंतु नागरिकांना या वाटणीला आलेल्या पाण्यातून स्वत:ची व जनावरांचीही तहान भागवावी लागत असल्याने, वाटण्यात येणारे टॅँकरचे पाणी पुरेसे होत नाही. त्यामुळे यावर्षी अधिकच पाणी मागणी वाढली आहे.तालुक्यात ११ तलावांपैकी ४ तलाव कोरडे पडले असून, ४ तलाव सीलखाली आहेत. २६ एप्रिलपर्यंतची ही तलावांची स्थिती आहे. तालुक्यातील टंचाईची परिस्थिती कायमची हटवायची असेल, तर म्हैसाळ व टेंभू योजना कायमस्वरूपी व नियमित सुरू ठेवल्या पाहिजेत. पावसाचे पाणी अडवून ते जिरवले पाहिजे व भूजल पातळी वाढविण्यास मदत केली पाहिजे. तालुक्यातील भूजल पातळी ही गेल्या पाच वर्षांत ६.५७ अशी होती, आता त्यामध्ये घट झाली आहे. ती ७.८० इतकी झाली आहे. त्यामुळे पाण्याचे असणारे स्रोत आटले आहेत.