शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पोलीस स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली

By admin | Updated: October 21, 2015 23:05 IST

पोलीस प्रशासन : बँड पथकाची मानवंदना; बंदुकीच्या तीन फैरींची सलामी

कोल्हापूर : देशासाठी धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मृतीस बुधवारी पोलीस प्रशासनाच्या वतीने स्मृतिस्तंभावर विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरींची सलामी देण्यात आली. तसेच पोलीस बँड पथकाने बिगुल वाजवून त्यांना मानवंदना दिली. पोलीस हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी पोलीस कवायत मैदान येथे बुधवारी सकाळी आठ वाजता ‘पोलीस स्मृतिदिन’ पाळण्यात आला. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, आमदार उल्हास पाटील यांनी स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. लडाख येथे २० आॅक्टोबर १९५९ रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन जवान हरविले होते. त्यांचा शोध घेण्याकरिता आय.टी.बी.पी. आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २२ जवानांची एक तुकडी २१ आॅक्टोबरला गेली होती. या तुकडीवर ‘हॉट स्प्रिंग्ज’ या ठिकाणी चिनी सैनिकांनी अचानक शस्त्रांनिशी जोरदार हल्ला चढविला. त्यामध्ये १० पोलीस जवान मृत्युमुखी पडले, पाच जवान जखमी झाले, तर सात जवानांना चिनी सैनिकांनी ताब्यात घेतले. शत्रूशी निकराची लढत देताना या शूर वीरांनी देशासाठी आपले देह धारातीर्थी ठेवले. तेव्हापासून २१ आॅक्टोबर हा दिवस देशातील विविध पोलीस दलांच्यावतीने ‘पोलीस स्मृतिदिन’ म्हणून पाळला जातो. २०१४ मध्ये पोलीस व निमलष्करी पोलीस दलाचे एकूण ४३४ पोलीस अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडले आहेत. यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, पोलिसांना फक्त कायदा व सुव्यवस्था पाहावी लागत नसून हिंसाचारी, गुन्हेगारी, दहशतवादी आणि समाजद्रोही यांच्याशी सामना करावा लागतो. नागरिकांचे संरक्षण करण्याचे कर्तव्य बजावीत असताना अनेक पोलीस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. एका पोलीस शिपायाचा मुलगा कुलगुरू होतो आणि पोलीस हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करतो, ते भाग्य लाभल्याचा भावनिक उल्लेखही त्यांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)