शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

परिस्थितीजन्य पुराव्यांवरून आता कूळवहिवाट

By admin | Updated: July 23, 2014 22:30 IST

सामान्यांना दिलासा : अनेक केसेस मार्गी लागण्याची शक्यता

रत्नागिरी : कूळवहिवाट अधिकार अभिलेखात अद्याप दाखल न झालेल्या बेदखल कूळवहिवाटदारांना परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आपली कूळवहिवाट निश्चित करुन घेता येणार आहे. त्यामुळे आता बेदखल कुळवहिवाटदारांना दिलासा मिळणार आहे. यासाठी आता आवश्यक पुरावाजन्य कागदपत्र संबंधित तहसीलदारांकडे सादर करावी लागणार आहेत. रत्नागिरी व सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील बेदखल कुळांची प्रकरणे निकाली काढण्याकरिता शासन महसूल व वन विभागाकडील १२ मे २००६ च्या परिपत्रकान्वये मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ४ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार कूळवहिवाट अद्याप अधिकार अभिलेखात दाखल न झालेल्या बेदखल कूळवहिवाटदारांना परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारेही आपली कूळवहिवाट निश्चित करुन घेता येणार आहे. मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन (सुधारणा) अधिनियम २००६नुसार कूळ म्हणून अधिकार सिध्द होण्यासाठी संबंधित अर्जदाराने कागदपत्र, पुरावे सादर करणे आवश्यक आहे. सतत १२ वर्षे जमीन कसत असल्याचा परिस्थितीजन्य पुरावा, ही जमीन ज्या व्यक्तीच्या ताब्यात आहे, ती व्यक्ती सतत १२ वर्षांपासून जमीन कसत असल्याबाबत त्या गावाचा सरपंच, पोलीसपाटील किंवा विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा अध्यक्ष आणि त्या व्यक्तिच्या जमिनीच्या लगत असलेल्या जमिनीचा लागवडदार यांचे ही जमीन त्या व्यक्तिच्या कब्जात असल्याबाबत आणि ती जमीन त्या व्यक्तीकडून १२ वर्षांपेक्षा कमी नाही इतक्या कालावधीसाठी अखंडितपणे कसण्यात येत आहे, असे शपथपत्र. परिस्थितीजन्य पुरावा म्हणून मतदार यादीचा भाग, शिधापत्रिका, विजेचे बिल, त्याच गावातील घरपट्टीची पावती, कृषी उत्पन्नाच्या विक्री संबंधातील कोणतीही पावती, झाडे तोडण्याच्या किंवा गौण खनिजाचे उत्खनन करण्याच्या परवानगी बाबतची किंवा अशा जमिनीच्या संबंधातील मंजूर केलेल्या कोणत्याही परवानगी संबंधित अन्य कोणतीही कागदपत्र ग्राह्य धरण्यात येतील. या सर्व नमूद केलेल्या कागदपत्रांपैकी उपलब्ध असलेली कोणतीही कागदपत्र ग्राह्य समजली जातील. या सुधारणेनुसार कुळाचे हक्क सिध्द होत असल्यास जमिनीच्या खरेदीची किंमत जमिनीच्या आकाराच्या २०० पट इतकी निश्चित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)-उपलब्ध कोणतीही कागदपत्र ग्राह्य समजली जाणार.-जमिनीच्या खरेदीची किंमत जमिनीच्या आकाराच्या २०० पट इतकी निश्चित.-मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम २००६नुसार कूळ सिध्द होण्यासाठी पुरावे द्यावे लागणार.