शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

परिस्थितीजन्य पुराव्यांवरून आता कूळवहिवाट

By admin | Updated: July 23, 2014 22:30 IST

सामान्यांना दिलासा : अनेक केसेस मार्गी लागण्याची शक्यता

रत्नागिरी : कूळवहिवाट अधिकार अभिलेखात अद्याप दाखल न झालेल्या बेदखल कूळवहिवाटदारांना परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आपली कूळवहिवाट निश्चित करुन घेता येणार आहे. त्यामुळे आता बेदखल कुळवहिवाटदारांना दिलासा मिळणार आहे. यासाठी आता आवश्यक पुरावाजन्य कागदपत्र संबंधित तहसीलदारांकडे सादर करावी लागणार आहेत. रत्नागिरी व सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील बेदखल कुळांची प्रकरणे निकाली काढण्याकरिता शासन महसूल व वन विभागाकडील १२ मे २००६ च्या परिपत्रकान्वये मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ४ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार कूळवहिवाट अद्याप अधिकार अभिलेखात दाखल न झालेल्या बेदखल कूळवहिवाटदारांना परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारेही आपली कूळवहिवाट निश्चित करुन घेता येणार आहे. मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन (सुधारणा) अधिनियम २००६नुसार कूळ म्हणून अधिकार सिध्द होण्यासाठी संबंधित अर्जदाराने कागदपत्र, पुरावे सादर करणे आवश्यक आहे. सतत १२ वर्षे जमीन कसत असल्याचा परिस्थितीजन्य पुरावा, ही जमीन ज्या व्यक्तीच्या ताब्यात आहे, ती व्यक्ती सतत १२ वर्षांपासून जमीन कसत असल्याबाबत त्या गावाचा सरपंच, पोलीसपाटील किंवा विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा अध्यक्ष आणि त्या व्यक्तिच्या जमिनीच्या लगत असलेल्या जमिनीचा लागवडदार यांचे ही जमीन त्या व्यक्तिच्या कब्जात असल्याबाबत आणि ती जमीन त्या व्यक्तीकडून १२ वर्षांपेक्षा कमी नाही इतक्या कालावधीसाठी अखंडितपणे कसण्यात येत आहे, असे शपथपत्र. परिस्थितीजन्य पुरावा म्हणून मतदार यादीचा भाग, शिधापत्रिका, विजेचे बिल, त्याच गावातील घरपट्टीची पावती, कृषी उत्पन्नाच्या विक्री संबंधातील कोणतीही पावती, झाडे तोडण्याच्या किंवा गौण खनिजाचे उत्खनन करण्याच्या परवानगी बाबतची किंवा अशा जमिनीच्या संबंधातील मंजूर केलेल्या कोणत्याही परवानगी संबंधित अन्य कोणतीही कागदपत्र ग्राह्य धरण्यात येतील. या सर्व नमूद केलेल्या कागदपत्रांपैकी उपलब्ध असलेली कोणतीही कागदपत्र ग्राह्य समजली जातील. या सुधारणेनुसार कुळाचे हक्क सिध्द होत असल्यास जमिनीच्या खरेदीची किंमत जमिनीच्या आकाराच्या २०० पट इतकी निश्चित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)-उपलब्ध कोणतीही कागदपत्र ग्राह्य समजली जाणार.-जमिनीच्या खरेदीची किंमत जमिनीच्या आकाराच्या २०० पट इतकी निश्चित.-मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम २००६नुसार कूळ सिध्द होण्यासाठी पुरावे द्यावे लागणार.