शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

बोगस लाभार्र्थ्यांना धसका

By admin | Updated: December 31, 2014 00:11 IST

शोधमोहीम : कागल तालुक्यात विरोध; १५ जानेवारीपर्यंत मोहीम

कोल्हापूर : शासनाच्या सामाजिक न्याय, विशेष साहाय्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या सर्वच शासकीय योजनांतील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण १५ डिसेंबरपासून जिल्ह्यातील बारा तालुक्यांत सुरू करण्यात आले आहे. शासकीय पातळीवर सुरू असलेल्या या शोधमोहिमेचा धसका बोगस लाभार्थ्यांनी घेतला आहे. गरीब आणि गरजू लोकांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत, पण त्याचा गैरफायदा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. म्हणून केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार, श्रावणबाळ आणि इंदिरा गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींची तपासणी सुरू आहे. याला काही ठिकाणी विविध संघटना व राजकीय पक्षांकडून मोहिमेला छुपा आणि जाहीरपणे विरोध होत आहे. कागल तालुक्यातील विरोध चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, विरोध गृहीत धरूनच प्रशासनाने मोहीम सुरू केली आहे. यामुळे नियोजित कार्यक्रमानुसार मोहीम ‘फत्ते’ करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, सेवा राज्य निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन, राष्ट्रीय कुटुंब लाभ, आम आदमी विमा अशा योजनांची अंमलबजावणी गावपातळीवर तलाठ्यांतर्फे होते. पात्र लाभार्थी निवडीसाठी समिती असते. समितीमध्ये राजकीय लोकांचा समावेश असतो. परंतु, अपात्र असला तरी कागदोपत्री पात्र ठरवून त्यालाही या योजनेत ‘घुसडण्या’चे प्रयत्न होतात, हे जगजाहीर आहे. निकषांचे काटेकोरपणे पालन करण्याकडे सोयीस्करपणे बगल देत मतांवर डोळा ठेवत लाभार्थी निवडले जातात. यामुळे काहीजण अपात्र असूनही योजनांचा लाभ घेत असतात. पात्र लाभापासून वंचित राहतात.शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अपात्र लाभार्थी शोधमोहीम सुरू केली आहे. १५ जानेवारी २०१५ अखेर मोहीम चालणार आहे. मोहिमेंतर्गत गावनिहाय लाभार्थी यादी व तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. लाभार्थ्यांची यादी त्या-त्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागविण्यात आल्या. घरी जाऊन लाभार्थी तपासणी करून विहित नमुन्यातील अर्ज भरून घेतला आहे. २ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामसभेत लाभार्थ्यांची नावे वाचून इतिवृत्तांत लिहिण्याची सूचना देण्यात येईल. ५ जानेवारी रोजी तलाठी यांनी लाभार्थी तपासणीचे अर्ज दिल्यानंतर गावातील काही लाभार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. १० रोजी तालुक्यांची गावनिहाय माहिती संकलित करून १५ रोजी जिल्ह्यांतील सर्व तहसीलदार यांनी जिल्हा प्रशासनाकडे माहिती द्यावयाची आहे.तपासणीला विरोधमहसूल यंत्रणेमार्फत लाभार्थ्यांच्या घरी जाऊन सर्व्हे करण्यात येत आहे. सध्या गावागावांत सुरू असलेली ही चौकशी गैरपद्धतीची आहे. पात्र लाभार्थी हे गोरगरीब घटकातील आहेत. त्यांना मिळणारी सहाशे रुपयांची रक्कम तोकडी आहे. असे असताना अशापद्धतीने त्यांची तपासणी करणे निषेधार्ह असल्याचा विरोधकांचा दावा आहे. कागल तालुक्यात या मोहिमेला विरोध वाढत असून याविरोधात गुरुवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचे निवदेन देण्यात आले आहे.शोधमोहीम कार्यक्रमपत्रिका तयार केली आहे. १५ डिसेंबरपासून कार्यक्रमानुसार बोगस लाभार्थी तपासणी केली जात आहे. १५ जानेवारीला अंतिम अहवाल उपलब्ध होईल.- किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (महसूल)