शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पाणीदार कोल्हापूरवर उपसा बंदीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 01:11 IST

नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : निवडणुका असल्यामुळे कोणाला दुखवायला नको म्हणून लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे पाटबंधारे विभागाकडून धरणातून ...

नसिम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : निवडणुका असल्यामुळे कोणाला दुखवायला नको म्हणून लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे पाटबंधारे विभागाकडून धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. यामुळे नद्या सतत प्रवाहित राहत असल्या तरी धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे.आजच्या घडीला असलेला पाणीसाठा हा गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आला आहे. पाऊस लांबला तर पाणीबाणी येण्याची शक्यता गृहीत धरून धरणांतील आवर्तन कमी करण्याचे नियोजन सुरू केल्याने पुढील महिन्यात उपसाबंदीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. निवडणुका संपल्यानंतर याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचे संकेत पाटबंधारे विभागाने दिले आहेत.यावर्षी साधारण पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असला तरी पूर्वानुभव पाहता जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापासूनच पावसाला सुरुवात होते. त्यामुळे जूनमध्ये शेती व पिण्यासाठी पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर होणार हे गृहीत धरून धरणांतील पाण्याचे आवर्तन निश्चित केले जाते. साधारणपणे फेब्रुवारी-मार्चपासूनच पाणी सोडण्याविषयी हात आखडता घेतला जातो; पण यावर्षी लोकसभा निवडणुका असल्याने पाण्याचा विषय निवडणुकीचा मुद्दा होऊ नये याची दक्षता सत्ताधारी आणि विरोधक या दोघांकडूनही घेतली गेली आहे. नदी वाहती राहावी या संदर्भातील पत्रव्यवहार लोकप्रतिनिधींनी आधीच करून ठेवल्यामुळे धरणातून रोजच्या रोज पाणी सोडले जात आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा वाढत असतानाही जिल्ह्याच्या दोन्ही मतदारसंघांतील नद्या दुथडी भरून वाहताना दिसत आहेत.राधानगरी, वारणा, दूधगंगा या धरणांतील पाण्यावर बहुतांश जिल्ह्याची भिस्त आहे. गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याने साठा कमी झाल्याने उपलब्ध पाणी जूनअखेरपर्यंत पुरविण्याचे आव्हान पाटबंधारे विभागासमोर आहे. कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राधानगरी धरणातील साठा पुरेसा असल्याने पंचगंगा खोºयातील सिंचनासह पिण्याच्या पाण्याच्या वापरावर काही परिणाम जाणवणार नाही; पण आवर्तनाच्या बाबतीत हात आखडता घेतला नाही तर मात्र मेअखेरीस पाणीबाणी जाणवण्याची चिन्हे दिसत आहेत. ‘पाटबंधारे’च्या दक्षिण विभागांतर्गत येणाºया चिकोत्रा खोºयात आवर्तनाच्या बाबतीत नियमावली तयार केली आहे. हिरण्यकेशीमधून काही प्रमाणात उपसाबंदीची अंमलबजावणी झाली आहे. काळम्मावाडी प्रकल्पातून १५ टक्के पाणी कर्नाटकला द्यावे लागत असल्याने गतवर्षीपेक्षा साडेतीन टीएमसीने पाणीसाठा कमी झाला आहे.वारणेचा विसर्ग वाढलासांगली जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने म्हैसाळ योजनेसाठी कोल्हापुरातील वारणा धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. वारणेतून दरवर्षी नऊ टीएमसी पाणी सोडले जाते. यावर्षी आजअखेर १३ टीएमसी पाणी म्हैसाळला दिले. विसर्ग ४ टीएमसीने वाढल्याने धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यापर्यंत खाली आला आहे. आजच्या घडीला ८.४४ टीएमसी पाणीसाठा आहे, तो गेल्या वर्षी याचवेळी १४.६२ टक्के होता. गेल्या वर्षी आठ टीएमसी पाणी धरणात शिल्लक राहिले असल्यामुळे हे आवर्तन वाढविले असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी पाऊस लांबला तर कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते, याचीही त्यांना कल्पना आहे. त्यामुळे म्हैसाळमधून जत, कवठेमहांकाळसाठी वारणेऐवजी कोयनेतून पाणी उचलावे याबाबतीत पाठपुरावा सुरू आहे. मतदान झाल्यानंतर याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे.जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)धरण आजचा गतवर्षीचाराधानगरी २.९८ ३.६९तुळशी १.५३ १.८३वारणा ८.४४ १४.६२दूधगंगा ६.५४ १०.०३कासारी १.२० १.२६कडवी १.३३ -कुंभी १.३० -धरण आजचा गतवर्षीचा(दशलक्ष घनमीटर)चित्री १७.८५ १६.८९चिकोत्रा २१.४३ ९.१४पाटगाव ४१.२६ ४४.२९जंगमहट्टी १४.८७ १३.१६जांबरे ६.२० ७.४८घटप्रभा २२.७५ २४.४३