शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

पाणीदार कोल्हापूरवर उपसा बंदीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 01:11 IST

नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : निवडणुका असल्यामुळे कोणाला दुखवायला नको म्हणून लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे पाटबंधारे विभागाकडून धरणातून ...

नसिम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : निवडणुका असल्यामुळे कोणाला दुखवायला नको म्हणून लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे पाटबंधारे विभागाकडून धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. यामुळे नद्या सतत प्रवाहित राहत असल्या तरी धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे.आजच्या घडीला असलेला पाणीसाठा हा गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आला आहे. पाऊस लांबला तर पाणीबाणी येण्याची शक्यता गृहीत धरून धरणांतील आवर्तन कमी करण्याचे नियोजन सुरू केल्याने पुढील महिन्यात उपसाबंदीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. निवडणुका संपल्यानंतर याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचे संकेत पाटबंधारे विभागाने दिले आहेत.यावर्षी साधारण पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असला तरी पूर्वानुभव पाहता जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापासूनच पावसाला सुरुवात होते. त्यामुळे जूनमध्ये शेती व पिण्यासाठी पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर होणार हे गृहीत धरून धरणांतील पाण्याचे आवर्तन निश्चित केले जाते. साधारणपणे फेब्रुवारी-मार्चपासूनच पाणी सोडण्याविषयी हात आखडता घेतला जातो; पण यावर्षी लोकसभा निवडणुका असल्याने पाण्याचा विषय निवडणुकीचा मुद्दा होऊ नये याची दक्षता सत्ताधारी आणि विरोधक या दोघांकडूनही घेतली गेली आहे. नदी वाहती राहावी या संदर्भातील पत्रव्यवहार लोकप्रतिनिधींनी आधीच करून ठेवल्यामुळे धरणातून रोजच्या रोज पाणी सोडले जात आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा वाढत असतानाही जिल्ह्याच्या दोन्ही मतदारसंघांतील नद्या दुथडी भरून वाहताना दिसत आहेत.राधानगरी, वारणा, दूधगंगा या धरणांतील पाण्यावर बहुतांश जिल्ह्याची भिस्त आहे. गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याने साठा कमी झाल्याने उपलब्ध पाणी जूनअखेरपर्यंत पुरविण्याचे आव्हान पाटबंधारे विभागासमोर आहे. कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राधानगरी धरणातील साठा पुरेसा असल्याने पंचगंगा खोºयातील सिंचनासह पिण्याच्या पाण्याच्या वापरावर काही परिणाम जाणवणार नाही; पण आवर्तनाच्या बाबतीत हात आखडता घेतला नाही तर मात्र मेअखेरीस पाणीबाणी जाणवण्याची चिन्हे दिसत आहेत. ‘पाटबंधारे’च्या दक्षिण विभागांतर्गत येणाºया चिकोत्रा खोºयात आवर्तनाच्या बाबतीत नियमावली तयार केली आहे. हिरण्यकेशीमधून काही प्रमाणात उपसाबंदीची अंमलबजावणी झाली आहे. काळम्मावाडी प्रकल्पातून १५ टक्के पाणी कर्नाटकला द्यावे लागत असल्याने गतवर्षीपेक्षा साडेतीन टीएमसीने पाणीसाठा कमी झाला आहे.वारणेचा विसर्ग वाढलासांगली जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने म्हैसाळ योजनेसाठी कोल्हापुरातील वारणा धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. वारणेतून दरवर्षी नऊ टीएमसी पाणी सोडले जाते. यावर्षी आजअखेर १३ टीएमसी पाणी म्हैसाळला दिले. विसर्ग ४ टीएमसीने वाढल्याने धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यापर्यंत खाली आला आहे. आजच्या घडीला ८.४४ टीएमसी पाणीसाठा आहे, तो गेल्या वर्षी याचवेळी १४.६२ टक्के होता. गेल्या वर्षी आठ टीएमसी पाणी धरणात शिल्लक राहिले असल्यामुळे हे आवर्तन वाढविले असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी पाऊस लांबला तर कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते, याचीही त्यांना कल्पना आहे. त्यामुळे म्हैसाळमधून जत, कवठेमहांकाळसाठी वारणेऐवजी कोयनेतून पाणी उचलावे याबाबतीत पाठपुरावा सुरू आहे. मतदान झाल्यानंतर याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे.जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)धरण आजचा गतवर्षीचाराधानगरी २.९८ ३.६९तुळशी १.५३ १.८३वारणा ८.४४ १४.६२दूधगंगा ६.५४ १०.०३कासारी १.२० १.२६कडवी १.३३ -कुंभी १.३० -धरण आजचा गतवर्षीचा(दशलक्ष घनमीटर)चित्री १७.८५ १६.८९चिकोत्रा २१.४३ ९.१४पाटगाव ४१.२६ ४४.२९जंगमहट्टी १४.८७ १३.१६जांबरे ६.२० ७.४८घटप्रभा २२.७५ २४.४३