शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
5
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
6
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
7
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
8
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
9
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
10
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
11
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
12
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
13
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
14
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
15
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
16
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
17
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
18
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
19
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
20
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

‘अंनिस’मुळे वाळीत प्रकरणातून सुटका

By admin | Updated: August 31, 2015 21:17 IST

कुटुंबियांशी सर्व व्यवहार बंद असल्याने आपण माणूस असूनसुद्धा समाजाकडून पशू-प्राण्यांसारखी वागणूक देण्यात येत असल्याचे दडपण येऊन मायनाक यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता

शिवाजी गोरे- दापोली --दाभोळ गावापासून जवळ असणाऱ्या एका गावातील वाडीने विष्णू मायनाक यांच्या कुटुंबाला दोन वर्षे वाळीत टाकले होते. वाळीत टाकलेल्या कुटुंबाशी बोलणाऱ्या व्यक्तिला वाडीने पाच हजार रुपये दंड जाहीर केला होता. वाळीत कुटुंबियांशी सर्व व्यवहार बंद असल्याने आपण माणूस असूनसुद्धा समाजाकडून पशू-प्राण्यांसारखी वागणूक देण्यात येत असल्याचे दडपण येऊन मायनाक यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु दापोलीतील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यानी वेळीच हस्तक्षेप करुन घरवापसी केल्याने एक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून बचावले आहे.बैठकीत न आल्याने दाभोळनजीकच्या एका गावातील वाडीने मुंबईतील एकाला वाळीत टाकले. मात्र, त्याचा एक भाऊ गावातच राहात आहे. त्याला वाडीने बैठकीत तुला भाऊ हवाय की वाडी हवीय? असा प्रश्न उपस्थित केला. विष्णू मायनाक यांनी आपल्याला भाऊ हवाय, असे उत्तर देताच वाडीतील प्रमुख मंडळींच्या संतापाचा पारा चढला. त्याच बैठकीत विष्णू मायनाक यांना वाळीत टाकण्याचा निर्णय झाला. त्याच्याशी कोणीही बोलू नये किंवा कोणताही व्यवहार करु नये. तसे केल्यास पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास त्या कुटुंबाला वाळीत टाकण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे गेली दोन वर्षे मायनाक कुटुंब दडपणाखाली जीवन जगत होते. त्यामुळे दडपण येऊन आपण आपले जीवन संपवून घेतले तर आपली पत्नी व मुलींना वाडी सामावून घेईल, या विचाराने दोनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची कबुली मायनाक यांनी दिली.त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर, अनिश पटवर्धन यांना झालेला प्रकार सांगितला. दाभोळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ जगताप यांनी वाडीतील प्रमुखांना व फिर्यादीला दाभोळ येथे बोलावून घेतले. बैठकीत दोन्ही बाजू ऐकून घेत कायद्याने कोणालाही वाळीत टाकणे गुन्हा असल्याची जाणीव करून दिल्यानंतर हा बहिष्कार मागे घेण्यात आला.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने घर वापसी.दाभोळ पोलीस उपनिरीक्षक नवनाथ जगताप यांची भूमिका निर्णायक.