शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे दुष्काळाचे सावट

By admin | Updated: November 30, 2015 01:09 IST

भरमूअण्णा पाटील : पाटबंधाऱ्याने पाणी न अडवल्याने चंदगडचे शेतकरी संकटात

चंदगड : चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यांतील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पुरेल इतके पाणी झांबरे, फाटकवाडी, जंगमहट्टी व इतर प्रकल्पामध्ये शिल्लक आहे, पण राज्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे पाटबंधारे विभागाने ताम्रपर्णी व घटप्रभा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी न अडवल्याने शेतकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पावसाने दगा दिल्याने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पुन्हा पाटबंधारे विभागाने दुष्काळात ढकलले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. उपसभापती शांताराम पाटील यांनी स्वागत केले.पाटील म्हणाले, काजिर्णे, उचंगी, सर्फनाला, आंबेओहळ हे प्रकल्प १६ वर्षे झाले तरी अद्याप पूर्ण नाहीत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यासचंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यांतील २० हजार एकर जमीन ओलिताखाली येईल, पण राज्यकर्ते व लोकप्रतिनिधी विकासकामांची खोटी जाहिरातबाजी करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत.लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या विकासकामात राजकारण करताना त्यांना वाचविण्याचे काम केले पाहिजे. केवळ रस्त्यावर दोन-चार बुट्या माती खडी टाकून विकास होत नाही, तर शेतकऱ्यांना जगवणे हे विकासाचे खरे काम आहे.पाटबंधारे विभागात पाणी अडवण्यासाठी लाकडी बरगे नाहीत ही हास्यास्पद बाब आहे. या विभागातील अधिकाऱ्यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे कोट्यवधी लिटर पाणी कर्नाटकात वाहून जात आहे याला जबाबदार कोण? पाटबंधारे विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशीची मागणीही त्यांनी यावेळी केली.यावेळी माजी सरपंच विष्णू नाईक, उदयकुमार देशपांडे, सेवा संस्थेचे अध्यक्ष मारूती कुट्रे, वसंत चव्हाण, राम पाटील, काँगे्रसचे युवक अध्यक्ष संदीप पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)तहसीलवर मोर्चाचे आयोजन---भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे शेतकरी वाचला तरच देश वाचेल. मात्र, चंदगड तालुक्यात पाटबंधारे विभागाच्या कृपेमुळे शेतकरीच देशोधडीला लागण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराचा निषेध करण्यासाठी चंदगड तहसीलवर मोर्चाचे नियोजन केल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.