शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे दुष्काळाचे सावट

By admin | Updated: November 30, 2015 01:09 IST

भरमूअण्णा पाटील : पाटबंधाऱ्याने पाणी न अडवल्याने चंदगडचे शेतकरी संकटात

चंदगड : चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यांतील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पुरेल इतके पाणी झांबरे, फाटकवाडी, जंगमहट्टी व इतर प्रकल्पामध्ये शिल्लक आहे, पण राज्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे पाटबंधारे विभागाने ताम्रपर्णी व घटप्रभा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी न अडवल्याने शेतकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पावसाने दगा दिल्याने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पुन्हा पाटबंधारे विभागाने दुष्काळात ढकलले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. उपसभापती शांताराम पाटील यांनी स्वागत केले.पाटील म्हणाले, काजिर्णे, उचंगी, सर्फनाला, आंबेओहळ हे प्रकल्प १६ वर्षे झाले तरी अद्याप पूर्ण नाहीत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यासचंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यांतील २० हजार एकर जमीन ओलिताखाली येईल, पण राज्यकर्ते व लोकप्रतिनिधी विकासकामांची खोटी जाहिरातबाजी करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत.लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या विकासकामात राजकारण करताना त्यांना वाचविण्याचे काम केले पाहिजे. केवळ रस्त्यावर दोन-चार बुट्या माती खडी टाकून विकास होत नाही, तर शेतकऱ्यांना जगवणे हे विकासाचे खरे काम आहे.पाटबंधारे विभागात पाणी अडवण्यासाठी लाकडी बरगे नाहीत ही हास्यास्पद बाब आहे. या विभागातील अधिकाऱ्यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे कोट्यवधी लिटर पाणी कर्नाटकात वाहून जात आहे याला जबाबदार कोण? पाटबंधारे विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशीची मागणीही त्यांनी यावेळी केली.यावेळी माजी सरपंच विष्णू नाईक, उदयकुमार देशपांडे, सेवा संस्थेचे अध्यक्ष मारूती कुट्रे, वसंत चव्हाण, राम पाटील, काँगे्रसचे युवक अध्यक्ष संदीप पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)तहसीलवर मोर्चाचे आयोजन---भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे शेतकरी वाचला तरच देश वाचेल. मात्र, चंदगड तालुक्यात पाटबंधारे विभागाच्या कृपेमुळे शेतकरीच देशोधडीला लागण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराचा निषेध करण्यासाठी चंदगड तहसीलवर मोर्चाचे नियोजन केल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.