शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

आधारकार्डमुळे बोगस खेळाडूंना घरचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपन्हाळा : आधारच्या सक्तीने शालेय क्रीडा स्पर्धांतील बोगस खेळाडू मैदानाबाहेर फेकले गेल्याने पात्र खेळाडूंना संधी मिळत आहे. यावर्षीच्या पन्हाळा तालुक्यातील शालेय क्रीडा स्पर्धेतून हे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे पात्र खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण झाला असून ‘आधार’च्या सक्तीचे पन्हाळा तालुक्यातील शालेय खेळाडूंच्या वतीने स्वागत होत आहे.दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धा ...

लोकमत न्यूज नेटवर्कपन्हाळा : आधारच्या सक्तीने शालेय क्रीडा स्पर्धांतील बोगस खेळाडू मैदानाबाहेर फेकले गेल्याने पात्र खेळाडूंना संधी मिळत आहे. यावर्षीच्या पन्हाळा तालुक्यातील शालेय क्रीडा स्पर्धेतून हे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे पात्र खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण झाला असून ‘आधार’च्या सक्तीचे पन्हाळा तालुक्यातील शालेय खेळाडूंच्या वतीने स्वागत होत आहे.दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धा जूनच्या दुसºया आठवड्यात शाळा सुरू झाल्यापासून एक महिन्यानंतर म्हणजे १५ जुलैच्या आसपास सुरू होतात. या स्पर्धेत किमान तीन शाळांनी सहभाग नोंदविणे सक्तीचे आहे. या स्पर्धा जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रत्येक तालुकावार घेतल्या जातात. या स्पर्धेत ज्या शाळेचा संघ विजेता झालेला असतो तो संघ त्या त्या तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्हास्तरावर करतो. यावर्षी तालुका स्पर्धेत सहभाग नोंदविताना प्रवेशिका व ओळखपत्रामध्ये आधार क्रमांक घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. अनेकवेळा आपल्याच विद्यालयाचा संघ विजयी व्हावा यासाठी मोठ्या वयोगटातील खेळाडू किंवा मंडळांच्या खेळाडूंना संघात खेळवण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे शाळेतील पात्र खेळाडूंवर अन्याय होत होता. बोगस खेळाडूंपुढे पात्र खेळाडूंचा वयाने लहान असणाºया खेळाडूंचा कस लागत नव्हता. खेळाचे कौशल्य असूनदेखील बोगस व वयाने मोठे असणाºया खेळाडूंपुढे निभाव लागत नव्हता. परिणामी सततच्या पराभव व अन्यायामुळे खचून जाऊन पात्र खेळाडू स्पर्धेत सहभाग सोडाच खेळालाच रामराम करीत होते.हे चित्र बदलण्यासाठी क्रीडा विभागाने आधारकार्ड सक्तीचा निर्णय घेतला. याचा सकारात्मक परिणाम या वर्षीच्या पन्हाळा तालुक्यातील शालेय स्पर्धेत दिसून आला. बनावट खेळाडू तसेच वय लपवून दिशाभूल करणाºया खेळाडूंना यावेळी पायबंद बसला आहे. या शालेय विविध क्रीडा प्रकारातील स्पर्धेत सर्व बोगस खेळाडू मैदानाबाहेरफेकले गेले आहेत. स्पर्धेतील उत्साह व ईर्षा समवयस्क खेळाडूंमुळे वाढली असून विविध खेळ प्रकारात अटीतटीच्या लढती पाहावयास मिळत आहेत.