शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नजरेनेच रग ओळखणारे दादूमामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:30 IST

कोल्हापूर : पैलवान दादू चौगले यांनी अखेरच्या क्षणापर्यंत लालमातीशी नाळ तुटू दिली नाही. मोतीबाग तालमीत जावून ते रोज पैलवानांचा ...

कोल्हापूर : पैलवान दादू चौगले यांनी अखेरच्या क्षणापर्यंत लालमातीशी नाळ तुटू दिली नाही. मोतीबाग तालमीत जावून ते रोज पैलवानांचा सराव घेत होते. त्याशिवाय विविध स्पर्धांना मल्लांची निवड करण्यातही त्यांचाच पुढाकार होता. कोणत्या पैलवानांमध्ये रग आहे हे त्यांना नजरेने कळत होते. त्यांचा स्वत:चा रोजचा चालण्याचा व्यायाम होता. शरीर बोजड (सुमारे १२५ किलो) झाले तरी प्रकृती अतिशय ठणठणीत होती. कुस्ती क्षेत्रामध्ये ‘दादूमामा’ अशीच त्यांची महाराष्ट्राला ओळख होती.तोडीस तोड नाही म्हणून गाव सोडलेराधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा हे त्यांचे मुळगांव. मुलाला पैलवानच करायचं, या हट्टानं प्रसंगी पोटाला चिमटा घेत आई-वडिलांनी दादू चौगुले यांना खुराक दिला. वयाच्या दहाव्या वर्षीच कोल्हापूर जिल्ह्याातील राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाड या छोट्याशा गावातील हा धट्टाकट्टा मुलगा आखाड्यात उतरला. छोट्या-छोट्या कुस्त्या मारणारा हा मुलगा वस्ताद गणपतराव आंदळकरांच्या मनात भरला. त्यांनी मोठी मेहनत करून घेत त्याला कुस्तीचे डावपेच शिकविले. पुढे हा पठ्ठा महाराष्ट्रात चमकला. बघता-बघता तो सत्पाल यांच्यासह उत्तरेतील बुरुजबंद मल्लांशी भिडू लागला. मिळालेल्या संधीचे सोने करताना अनेक मानाच्या गदा त्याने पटकावल्या. पैलवान आंदळकर, बाळासाहेब गायकवाड, बाळू बिरे यांच्या तालमीत घडलेल्या या पैलवानाने कोल्हापूरचा जरीपटका सर्वत्र मानाने फडकवत ठेवला.आखाड्यातून बाहेर पडल्यानंतरही त्यांनी कुस्तीच्या वाढीसाठी सक्रिय योगदान दिले. ते कोल्हापूर शहर व जिल्हा तालीम संघाचे विद्यामान अध्यक्ष होते. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक मल्ल त्यांनी मेहनतीने घडविले. अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेशी चांगले संबंध ठेवत कोल्हापुरातील मल्लांना त्यांनी राष्ट्रीय पातळीवर नेले. मुलालाही चांगला मल्ल घडविले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगा विनोद ‘हिंदकेसरी’ झाला. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांचा झालेला गौरव कुस्तीची प्रतिष्ठा वाढवणारा आहे.कुस्तीबरोबरच व्यवसायात जमकुस्तीचे धडे देत असतानाच चरितार्थ चालविण्यासाठी त्यांनी प्रथम जागा घेऊन त्याचे प्लॉट पाडून विक्रीचा व्यवसाय केला. त्यातही जम बसविल्यानंतर शहरासह उपनगरांत बांधकाम प्रकल्प उभे केले.पंचाहत्तरीचे स्वप्नच राहिलेदादूमामा यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त २०२१ साली मोठा कार्यक्रम घेण्याचे नियोजन आतापासूनच मोतीबाग तालमीतील त्यांचे शिष्य संदीप पाटील, नितीन गायकवाड, अमोल पाटील, विजय पाटील, सरदार पाटील यांनी केले होते. त्यांनी ‘तसले काही नको,’ म्हणून सांगितले होते. जास्तच मनधरणी केल्यानंतर ‘ठीक आहे, करा तुम्हाला काय करायचे ते,’ असे सांगितले होते. मात्र, त्यांच्या अचानक जाण्याने शिष्यांचे स्वप्न अधुरेच राहिले. त्याची चर्चा शिष्यांमध्ये सुरू होती.