शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

कोल्हापूरकरांना दुष्काळाचे चटके ?

By admin | Updated: July 3, 2014 01:01 IST

चार दिवसांत पाणी कपात : पिके धोक्यात; दोन लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या

कोल्हापूर : महाराष्ट्रात सधन जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. समाधानकारक पाऊस, सुपीक जमीन यामुळे कोल्हापूरकरांना कधी दुष्काळाची झळ बसलीच नाही. पण यावर्षी पावसाने दडी मारल्याने पहिल्यांदाच कोल्हापूरकरांना दुष्काळाचे चटके बसण्याची शक्यता आहे. अजून पाणी टंचाई जाणवत नसली तरी येत्यापाच दिवसांत पाणी कपातीचे संकटची शक्यता आहे. हातकणंगले व शिरोळ तालुका वगळता जिल्ह्णात पंधरा दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला. आतापर्यंत केवळ ४४ हजार ५०० हेक्टरवर (१६ टक्के) खरिपाची पेरणी झाली. यामध्ये भाताची धूळवाफ ३२ हजार ९१८ हेक्टर, ज्वारीची १६० हेक्टर, तूर ३८ हेक्टर, तर मूग ४१ व उडीदाची ५५ हेक्टरची पेरणी झाली. सोयाबीनची ६ हजार ६६४ हेक्टरवर पेरणी झालीे. पावसाने दडी मारल्याने पिके अडचणीत आली. पाण्याची सोय आहे, तेथे पिके अजून तरली आहेत. पण माळरान व हलक्या जमिनीतील पिके करपू लागली आहेत. अजून दोन लाख हेक्टरवरील भात, भुईमूग, नागली, सोयाबीन, ज्वारी, कडधान्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. (प्रतिनिधी)