शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

टंचाई आराखड्याकडे ‘वक्रदृष्टी’

By admin | Updated: January 2, 2015 00:17 IST

प्रशासनासह लोकप्रतिनिधी गाफील : अवकाळी पावसामुळे दुर्लक्ष

कोल्हापूर : पावसाची अवकृपा राहिल्यानंतर टंचाई निवारण आराखड्याची प्रशासनास प्रकर्षाने आठवण होत असते. मात्र, यंदा वरुणराजाची कृपा जिल्ह्यावर राहिली. वारंवार अवेळी पाऊस पडत आहे. त्यामुळे यंदा प्रशासनाच्या वक्रदृष्टीमुळे जानेवारी ते जूनअखेरचा जिल्ह्याचा टंचाई आराखडा अजून तयार झालेला नाही. परिणामी शासनाकडे मंजुरीसाठी आराखडा कधी जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.प्रत्येक वर्षी आॅक्टोबर ते जानेवारी आणि जानेवारी ते जून अशा दोन महत्त्वाच्या टप्प्यांत टंचाई आराखडा तयार केला जातो. ग्रामपंचायत पातळीवरून माहिती घेऊन प्रत्येक तालुक्यातील आराखडा संबंधित आमदारांच्या सहीने पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे येतोे. जिल्हा परिषद अहवाल एकत्र करून जिल्हाधिकारी यांच्यातर्फे शासनाकडे सादर केला जातो. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळ्यात चांगला पाऊस पडतो. त्यामुळे जानेवारीअखेरपर्यंत आराखडा तयार केला जात नाही. याउलट मार्चनंतर काही तालुक्यांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असते. त्यामुळे जानेवारी ते जूनअखेरच्या टंचाई आराखड्याला फार महत्त्व असते.यंदा जून महिन्यात दमदार पाऊस झाला नाही, पण जुलै ते आॅक्टोबर समाधानकारक पाऊस झाला. पावसाळ्याचा कालावधी संपल्यानंतर अजूनही अवकाळी पाऊस जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावत आहे. त्यामुळे अजूनही ओढे, नाल्यांना पाणी आहे. विहिरी तुडुंब आहेत. सर्वत्र मुबलक पाणी आहे. यामुळे उन्हाळ्यात टंचाई जाणवेल याची जाणीव प्रशासनाला झालेली नाही. त्यामुळेच जूनअखेरचा टंचाई आराखडा यंदा वेळेत तयार झालेला नाही. प्रत्येक वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात टंचाई अहवाल पाठविला जातो. जानेवारी महिना उजाडला तरी शिरोळ तालुक्याचा टंचाई आराखडा न आल्याने जिल्ह्याचा आराखडा अपूर्ण राहिला आहे. परिणामी जिल्ह्याच्या आराखड्याला विलंब झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.हिवाळी अधिवेशन व अन्य कामांमुळे नवनिर्वाचित आमदारांनीही वेळेत आराखडा तयार करून शासनाकडे जावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाहीे.