शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
2
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
3
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
4
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
5
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
6
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
7
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
8
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
9
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
10
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
11
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
12
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
13
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
14
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
15
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
16
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
17
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
18
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
19
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या
20
Crocodile Torture: वसाहतीत घुसलेल्या मगरीसोबत तरुणांचं अमानुष कृत्य, आरोपींचा शोध सुरू!

टंचाई आराखड्याकडे ‘वक्रदृष्टी’

By admin | Updated: January 2, 2015 00:17 IST

प्रशासनासह लोकप्रतिनिधी गाफील : अवकाळी पावसामुळे दुर्लक्ष

कोल्हापूर : पावसाची अवकृपा राहिल्यानंतर टंचाई निवारण आराखड्याची प्रशासनास प्रकर्षाने आठवण होत असते. मात्र, यंदा वरुणराजाची कृपा जिल्ह्यावर राहिली. वारंवार अवेळी पाऊस पडत आहे. त्यामुळे यंदा प्रशासनाच्या वक्रदृष्टीमुळे जानेवारी ते जूनअखेरचा जिल्ह्याचा टंचाई आराखडा अजून तयार झालेला नाही. परिणामी शासनाकडे मंजुरीसाठी आराखडा कधी जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.प्रत्येक वर्षी आॅक्टोबर ते जानेवारी आणि जानेवारी ते जून अशा दोन महत्त्वाच्या टप्प्यांत टंचाई आराखडा तयार केला जातो. ग्रामपंचायत पातळीवरून माहिती घेऊन प्रत्येक तालुक्यातील आराखडा संबंधित आमदारांच्या सहीने पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे येतोे. जिल्हा परिषद अहवाल एकत्र करून जिल्हाधिकारी यांच्यातर्फे शासनाकडे सादर केला जातो. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळ्यात चांगला पाऊस पडतो. त्यामुळे जानेवारीअखेरपर्यंत आराखडा तयार केला जात नाही. याउलट मार्चनंतर काही तालुक्यांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असते. त्यामुळे जानेवारी ते जूनअखेरच्या टंचाई आराखड्याला फार महत्त्व असते.यंदा जून महिन्यात दमदार पाऊस झाला नाही, पण जुलै ते आॅक्टोबर समाधानकारक पाऊस झाला. पावसाळ्याचा कालावधी संपल्यानंतर अजूनही अवकाळी पाऊस जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावत आहे. त्यामुळे अजूनही ओढे, नाल्यांना पाणी आहे. विहिरी तुडुंब आहेत. सर्वत्र मुबलक पाणी आहे. यामुळे उन्हाळ्यात टंचाई जाणवेल याची जाणीव प्रशासनाला झालेली नाही. त्यामुळेच जूनअखेरचा टंचाई आराखडा यंदा वेळेत तयार झालेला नाही. प्रत्येक वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात टंचाई अहवाल पाठविला जातो. जानेवारी महिना उजाडला तरी शिरोळ तालुक्याचा टंचाई आराखडा न आल्याने जिल्ह्याचा आराखडा अपूर्ण राहिला आहे. परिणामी जिल्ह्याच्या आराखड्याला विलंब झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.हिवाळी अधिवेशन व अन्य कामांमुळे नवनिर्वाचित आमदारांनीही वेळेत आराखडा तयार करून शासनाकडे जावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाहीे.