शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

स्वस्तातील घर स्वप्नातच?

By admin | Updated: May 19, 2016 00:41 IST

प्रधानमंत्री आवास योजना : अर्जविक्री २० हजार, दाखल अवघे १ हजार; कागदपत्रांअभावी अर्जदारांची धावपळ

कोल्हापूर : ‘वीस हजार अर्जांची विक्री अन् अवघे एक हजार अर्ज दाखल’ अशी प्रधानमंत्री आवास योजनेची अवस्था झाली आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करताना इच्छुक लाभार्थ्यांची पुरती धावपळ होत आहे. स्वस्तातील घर मिळण्याच्या तीव्र इच्छेखातर इच्छुक लाभार्थ्यांची अर्ज दाखल करण्यासाठी शिवाजी मार्केटमधील कार्यालयात दररोज झुंबड उडालेली दिसत आहे; पण पुरेशा कागदपत्रांअभावी ते पुन्हा मागे फिरत आहेत. त्यामुळे स्वस्तातील घर स्वप्नातच राहण्याची चिन्हे आहेत. केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विविध घटकांसाठी लाभार्थी निवडीसाठी मागणी सर्वेक्षण सुरू आहे. या मागणी सर्वेक्षणाच्या विहित नमुन्यांतील अर्जाची विक्री महानगरपालिकेच्या वतीने नागरी सुविधा केंद्रामार्फत ५० रुपये नाममात्र शुल्क आकारून करण्यात आली. दरम्यान, काही खोडसाळ व्यक्तींनी या इच्छुक लाभार्थी अर्जदारांना ‘तुमच्या कागदपत्रांची पूर्तता करून देतो व अर्ज सादर करून देतो’ असे सांगून अनेक अर्जदारांकडून विविध रकमा घेतल्याच्या तक्रारी अनेकांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या तांत्रिक कक्षाकडे केल्या. दरम्यान, सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी २३ मे ही अंतिम मुदत असल्याने शिवाजी मार्केटमधील योजनेच्या तांत्रिक कक्षाकडे लाभार्थ्यांची अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली आहे. या कार्यालयात अर्जदाराने प्रवेश केल्यानंतर त्याच्याकडील कागदपत्रांची पहिल्या टप्प्यात एकूण पाच कर्मचारी तपासणी करतात. त्यानंतर सामाजिक विकास विशेषतज्ज्ञ प्रसाद संकपाळ आणि क्षमता बांधणी विशेषज्ञ संतोष धुमाळ यांची मोहोर उमटविली जाते. त्यानंतरच परिपूर्ण कागदपत्रांचा अर्ज स्वीकारला जातो. अपुरी कागदपत्रे असणारा अर्ज पुन्हा अर्जदाराकडे देऊन आवश्यक कागदपत्रांची मागणी केली जाते. त्यामुळे पुरेशा कागदपत्रांअभावी अर्जदाराला फेऱ्या माराव्या लागत आहेत.अर्जदारांना वेगवेगळ्या नऊ प्रकारचे परवाने दाखल करण्याची सक्ती असतानाही या अर्जदारांना तहसीलदार कार्यालयातून उत्पन्नाचे दाखले व अधिवास प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे दाखल झाल्या. तसेच हे दाखले मिळवून देण्यासाठी एजंटांची साखळी तयार झाल्याचे लक्षात आले; त्यामुळे महापालिकेच्या वतीने दाखले मिळवून देण्यासाठी विभागीय कार्यालयांत कार्यशाळा घेतली. यामध्ये अवघ्या तीन-चार दिवसांत करवीर तहसीलदारांकडून दोन्हीही दाखले देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले; पण प्रत्यक्षात आठवडा उलटला तरीही संबंधित दोन्हीही दाखले मिळाले नाहीत.सर्वेक्षण २१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशप्रधानमंत्री आवास योजनेबाबत गृहनिर्माण प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी मंगळवारी मुंबईत बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी संचालक निर्मलकुमार देशमुख हेही उपस्थित होते. त्यांनी सर्व कामकाजाचा आढावा घेत विभागीय कार्यालयामार्फत क्रॉस तपासणी, प्रत्यक्ष अर्जदाराची जागेवर जाऊन पाहणी, आदी सर्वेक्षण २१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.राजीव गांधी आवास योजनेच्या लाभार्थ्यांनाही लाभयापूर्वी राजीव गांधी आवास योजनेच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, या योजनेतील लाभार्थ्यांनाही या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नसून मागील कागदपत्रेच ग्राह्य धरली जाणार असल्याचे सामाजिक विकास विशेषज्ञ प्रसाद संकपाळ यांनी सांगितले.