शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
2
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
3
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
4
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
5
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
6
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
7
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
8
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
9
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
10
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
11
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
12
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
13
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
14
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
15
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
16
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका
17
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे
18
कर्नाटकात 'RSS'वर बंदी घालण्याची तयारी? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे पत्र बनले कारण
19
नवरी जोमात, नवरा कोमात! एक, दोन नव्हे तर लग्नानंतर १२ नववधू झाल्या फरार, नेमकं काय घडलं?
20
UPI युजर्ससाठी नवं फीचर; मँडेटही पोर्ट करता येणार, दुसऱ्या अॅप्सचे ट्रान्झॅक्शन्सही दिसणार, काय आहे नवी सुविधा?

स्वस्तातील घर स्वप्नातच?

By admin | Updated: May 19, 2016 00:41 IST

प्रधानमंत्री आवास योजना : अर्जविक्री २० हजार, दाखल अवघे १ हजार; कागदपत्रांअभावी अर्जदारांची धावपळ

कोल्हापूर : ‘वीस हजार अर्जांची विक्री अन् अवघे एक हजार अर्ज दाखल’ अशी प्रधानमंत्री आवास योजनेची अवस्था झाली आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करताना इच्छुक लाभार्थ्यांची पुरती धावपळ होत आहे. स्वस्तातील घर मिळण्याच्या तीव्र इच्छेखातर इच्छुक लाभार्थ्यांची अर्ज दाखल करण्यासाठी शिवाजी मार्केटमधील कार्यालयात दररोज झुंबड उडालेली दिसत आहे; पण पुरेशा कागदपत्रांअभावी ते पुन्हा मागे फिरत आहेत. त्यामुळे स्वस्तातील घर स्वप्नातच राहण्याची चिन्हे आहेत. केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विविध घटकांसाठी लाभार्थी निवडीसाठी मागणी सर्वेक्षण सुरू आहे. या मागणी सर्वेक्षणाच्या विहित नमुन्यांतील अर्जाची विक्री महानगरपालिकेच्या वतीने नागरी सुविधा केंद्रामार्फत ५० रुपये नाममात्र शुल्क आकारून करण्यात आली. दरम्यान, काही खोडसाळ व्यक्तींनी या इच्छुक लाभार्थी अर्जदारांना ‘तुमच्या कागदपत्रांची पूर्तता करून देतो व अर्ज सादर करून देतो’ असे सांगून अनेक अर्जदारांकडून विविध रकमा घेतल्याच्या तक्रारी अनेकांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या तांत्रिक कक्षाकडे केल्या. दरम्यान, सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी २३ मे ही अंतिम मुदत असल्याने शिवाजी मार्केटमधील योजनेच्या तांत्रिक कक्षाकडे लाभार्थ्यांची अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली आहे. या कार्यालयात अर्जदाराने प्रवेश केल्यानंतर त्याच्याकडील कागदपत्रांची पहिल्या टप्प्यात एकूण पाच कर्मचारी तपासणी करतात. त्यानंतर सामाजिक विकास विशेषतज्ज्ञ प्रसाद संकपाळ आणि क्षमता बांधणी विशेषज्ञ संतोष धुमाळ यांची मोहोर उमटविली जाते. त्यानंतरच परिपूर्ण कागदपत्रांचा अर्ज स्वीकारला जातो. अपुरी कागदपत्रे असणारा अर्ज पुन्हा अर्जदाराकडे देऊन आवश्यक कागदपत्रांची मागणी केली जाते. त्यामुळे पुरेशा कागदपत्रांअभावी अर्जदाराला फेऱ्या माराव्या लागत आहेत.अर्जदारांना वेगवेगळ्या नऊ प्रकारचे परवाने दाखल करण्याची सक्ती असतानाही या अर्जदारांना तहसीलदार कार्यालयातून उत्पन्नाचे दाखले व अधिवास प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे दाखल झाल्या. तसेच हे दाखले मिळवून देण्यासाठी एजंटांची साखळी तयार झाल्याचे लक्षात आले; त्यामुळे महापालिकेच्या वतीने दाखले मिळवून देण्यासाठी विभागीय कार्यालयांत कार्यशाळा घेतली. यामध्ये अवघ्या तीन-चार दिवसांत करवीर तहसीलदारांकडून दोन्हीही दाखले देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले; पण प्रत्यक्षात आठवडा उलटला तरीही संबंधित दोन्हीही दाखले मिळाले नाहीत.सर्वेक्षण २१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशप्रधानमंत्री आवास योजनेबाबत गृहनिर्माण प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी मंगळवारी मुंबईत बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी संचालक निर्मलकुमार देशमुख हेही उपस्थित होते. त्यांनी सर्व कामकाजाचा आढावा घेत विभागीय कार्यालयामार्फत क्रॉस तपासणी, प्रत्यक्ष अर्जदाराची जागेवर जाऊन पाहणी, आदी सर्वेक्षण २१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.राजीव गांधी आवास योजनेच्या लाभार्थ्यांनाही लाभयापूर्वी राजीव गांधी आवास योजनेच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, या योजनेतील लाभार्थ्यांनाही या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नसून मागील कागदपत्रेच ग्राह्य धरली जाणार असल्याचे सामाजिक विकास विशेषज्ञ प्रसाद संकपाळ यांनी सांगितले.