शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
4
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
5
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
8
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
9
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
11
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
12
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
13
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
14
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
15
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
16
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
17
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
18
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
19
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
20
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?

वासनोली धरणाचा सांडवा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:24 IST

कडगाव/वार्ताहर : वासनोली लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या सांडव्याला भले मोठे भगदाड पडल्याने धरणासह वासनोली, तिरवडे, कडगाव या गावांना मोठा ...

कडगाव/वार्ताहर : वासनोली लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या सांडव्याला भले मोठे भगदाड पडल्याने धरणासह वासनोली, तिरवडे, कडगाव या गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे, तर सांडव्यातील माती, दगडगोटे वाहून जाऊन शेजारील शेत व विहिरी गाळाने बुजल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

राज्य जलसंधारण विभागाने २०११ साली या धरणाच्या कामाला मंजुरी दिली होती. धरणाचे काम रखडत ठेवल्याने ७ कोटी रुपयांवरून तब्बल १४ कोटी रुपयांवर धरणाचा खर्च झाला, पण अद्यापही धरणाचे काम अपूर्ण स्थितीत आहे. धरणात ९९० घनमीटर पाणीसाठा करण्याचे उद्दिष्ट आहे. या धरणाचा लाभ वासनोली, तिरवडे, कडगाव पंचक्रोशीतील सुमारे हजार हेक्टर शेतीला होईल, या आशेने येथील शेतकऱ्यांनी धरण उभारण्यासाठी कवडीमोलाने जमिनी दिल्या आहेत.

धरणाची मुख्य भिंत बांधताना योग्य पद्धतीने बांधलेली नाही. सर्वेक्षण न करता सांडव्याची निवड केली गेली आहे. सांडव्याची उभारणी करताना बर्म केले नाहीत. पिचिंगचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले गेलेे. यामुळे धरणाचे भवितव्य धोक्यात असल्याने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद मोरे यांनी भुदरगड तहसीलदार कार्यालय, मृद व जलसंधारण विभाग कार्यालयासमोर उपोषण करून ठेकेदार व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला होता. त्यामुळे हे धरण चांगलेच चर्चेत आले होते.

पहिल्याच पावसात धरणातील सांडवा तुटण्यास सुरुवात झाली होती. मात्र, ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मुसळधार पावसात सांडवा तुटून जाऊन भले मोठे भगदाड पडले आहे. सांडव्यातील पाण्याने सुमारे ४० ते ४५ फूट खोल, ५० फूट रुंद व १०० फूट लांबीचे भले मोठे भगदाड पाडले आहे. या भगदाडातील शेकडो ट्रक माती व दगड वाहून जाऊन शेतामध्ये पडल्याने विहिरी बुजल्या आहेत, तर विलास पाटील, अशोक मुळीक, केरबा पाटील, शिवाजी पाटील, दत्तात्रय पाटील, राजाराम पाटील, नारायण गुरव, विष्णू पाटील, सुरेश पाटील, धोंडिराम पाटील या शेतकऱ्यांचे मोटरपंप वाहून गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

चौकट

धरणाचा सांडवा तुटून भले मोठे भगदाड पडल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. हे भगदाड तातडीने दुरुस्त केले नाही तर वासनोली, तिरवडे, कडगाव गावांना धोका निर्माण होऊ शकतो.

फोटो : वासणोली धरणाचा सांडवा तुटून मोठे भगदाड पडले.