शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

अवकाळीमुळे घरांची पडझड

By admin | Updated: March 16, 2015 00:10 IST

अंकलखोप परिसर : वादळी वाऱ्यामुळे पपई, केळीच्या बागा जमीनदोस्त

सांगली : जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी सुरू झालेल्या अवकाळी पावसाने रविवारी पहाटेपर्यंत मुक्काम केला. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे घरांची पडझड होतानाच अंकलखोप परिसरातील पपई आणि केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या. रविवारी सकाळी नुकसानीचे हे चित्र पाहून शेतकऱ्यांना धक्का बसला. शनिवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने मध्यरात्रीनंतर रविवारी पहाटेपर्यंत धुडगूस घातला. चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पलूस तालुक्यातील अंकलखोप व परिसरात शनिवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या वादळी वाऱ्याने व पावसाने दोन घरांची पडझड झाली. शेतातील घरांचे छत उडून गेले, तर ऊसतोडणी कामगारांच्या पालीही उडून गेल्या. शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग अजूनही कायम असून, शनिवारी मध्यरात्रीपासून तासगाव, जत, विटा, आटपाडी, वाळवा तालुक्यांमध्ये पावसाच्या किरकोळ सरी पडल्या. रविवारी दिवसभर प्रचंड उकाड्यासह ढगाळ वातावरण राहिले. त्यामुळे द्राक्षे, डाळिंब बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण कायम होते.शनिवारी मध्यरात्री पुन्हा खानापूर, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे व मुसळधार पाऊस झाला होता. खानापूर पूर्व भागात मुसळधार पावसासह गारपीट झाल्याने द्राक्षबागायतदारांना फटका बसला. मिरज तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)२४ तासांत १९ मि.मी. पाऊस सांगलीमध्ये रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २४ तासांमध्ये १९.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.४तासगाव : ४.८ मि.मी.४कवठेमहांकाळ : १.६ मि.मी. ४जत : ०.४ मि.मी.४खानापूर : ५ मि.मी.४आटपाडी : २ मि.मी.४पलूस : ५.५ मि.मी.४वाळवा : ०.२ मि.मी.जिल्ह्यातील एकूण नोंद १९.५ मि.मी. (सरासरी : २ मि.मी.)