शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
5
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
7
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
8
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
9
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
10
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
11
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
12
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
13
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
14
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
15
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
16
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
17
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
18
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
19
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती

सहकारी धरण संस्थांच्या पाण्यावर दुप्पट पाणीपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:21 IST

प्रचंड पाऊस पडूनही एप्रिल, मे महिन्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने स्वातंत्र्यपूर्व काळात सांगरुळ (ता. करवीर) येथे कुंभी ...

प्रचंड पाऊस पडूनही एप्रिल, मे महिन्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने स्वातंत्र्यपूर्व काळात सांगरुळ (ता. करवीर) येथे कुंभी नदीवर ११ गावांतील शेतकरी एकत्र आले आणि सहकार तत्त्वावर धरण बांधण्यात आले.

हाच बंधारा ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या शासनाच्या योजनेचा रोलमॉडेल ठरला आहे. सांगरुळ धरणाच्या प्रेरणेतून कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल आठ धरणे (बंधारे) सहकारी तत्त्वावर बांधली आहेत. या बंधाऱ्याच्या दुरुस्ती व देखभालीसाठी स्वतः धरण संस्था निधी उभारते. शेतकऱ्यांकडून शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंपावर प्रति हॉर्सपॉवर २०० ते ३५० आकारणी करून हा खर्च आजही केला जातो. यासाठी शासन निधी देत नाही.

शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी शासन वसूल करते. याबाबत धरण संस्थांनी आघाडी शासन असताना ज्या नद्यांवर सहकारी धरणसंस्था आहेत, त्याच्या पाण्यावर जे क्षेत्र सिंचन केले जाते, यासाठी पाणीपट्टीच्या निम्मी हेक्टरी ५११ रुपये आकारणी करण्यात येत होती.

यामुळे धरण संस्था प्रति हॉर्सपॉवर वेगळी आकारणी करू शकत होते; पण शासनाने धरण संस्थांच्या पाण्यावर सिंचन करणाऱ्या क्षेत्रालाही शासनाच्या पाणीपट्टीप्रमाणे १०० टक्के करावी, असा आदेश काढला आहे. यामुळे धरण संस्था प्रति हॉर्सपॉवर वेगळी आकारणी करू शकणार नाहीत. धरण संस्थांत कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. जर निधीच निर्माण झाला नाही, तर धरणावर देखभाल दुरूस्ती करणार कशी आणि शासन या धरणांना सहकारी धरण असल्याने जर देखभाल दुरुस्ती करणार नसेल, तर ही सहकारी धरणे व संस्था नामशेष होणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

प्रतिक्रिया

- शासनाचा धरण संस्थांच्या कार्यक्षेत्रातील सिंचन क्षेत्रावर पाणीपट्टी दुप्पट दराने वसूल करण्याच्या आदेशाने शेतकरी अडचणीत येणार आहे. वर्षातील केवळ दोनच महिने धरणातील पाणी नदीत सोडले जात असताना, पाटबंधारे विभाग वर्षाची आकारणी करतेे.

उत्तम कासोटे (अध्यक्ष, सांगरुळ धरण संस्था)