शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

सहकारी धरण संस्थांच्या पाण्यावर दुप्पट पाणीपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:21 IST

प्रचंड पाऊस पडूनही एप्रिल, मे महिन्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने स्वातंत्र्यपूर्व काळात सांगरुळ (ता. करवीर) येथे कुंभी ...

प्रचंड पाऊस पडूनही एप्रिल, मे महिन्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने स्वातंत्र्यपूर्व काळात सांगरुळ (ता. करवीर) येथे कुंभी नदीवर ११ गावांतील शेतकरी एकत्र आले आणि सहकार तत्त्वावर धरण बांधण्यात आले.

हाच बंधारा ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या शासनाच्या योजनेचा रोलमॉडेल ठरला आहे. सांगरुळ धरणाच्या प्रेरणेतून कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल आठ धरणे (बंधारे) सहकारी तत्त्वावर बांधली आहेत. या बंधाऱ्याच्या दुरुस्ती व देखभालीसाठी स्वतः धरण संस्था निधी उभारते. शेतकऱ्यांकडून शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंपावर प्रति हॉर्सपॉवर २०० ते ३५० आकारणी करून हा खर्च आजही केला जातो. यासाठी शासन निधी देत नाही.

शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी शासन वसूल करते. याबाबत धरण संस्थांनी आघाडी शासन असताना ज्या नद्यांवर सहकारी धरणसंस्था आहेत, त्याच्या पाण्यावर जे क्षेत्र सिंचन केले जाते, यासाठी पाणीपट्टीच्या निम्मी हेक्टरी ५११ रुपये आकारणी करण्यात येत होती.

यामुळे धरण संस्था प्रति हॉर्सपॉवर वेगळी आकारणी करू शकत होते; पण शासनाने धरण संस्थांच्या पाण्यावर सिंचन करणाऱ्या क्षेत्रालाही शासनाच्या पाणीपट्टीप्रमाणे १०० टक्के करावी, असा आदेश काढला आहे. यामुळे धरण संस्था प्रति हॉर्सपॉवर वेगळी आकारणी करू शकणार नाहीत. धरण संस्थांत कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. जर निधीच निर्माण झाला नाही, तर धरणावर देखभाल दुरूस्ती करणार कशी आणि शासन या धरणांना सहकारी धरण असल्याने जर देखभाल दुरुस्ती करणार नसेल, तर ही सहकारी धरणे व संस्था नामशेष होणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

प्रतिक्रिया

- शासनाचा धरण संस्थांच्या कार्यक्षेत्रातील सिंचन क्षेत्रावर पाणीपट्टी दुप्पट दराने वसूल करण्याच्या आदेशाने शेतकरी अडचणीत येणार आहे. वर्षातील केवळ दोनच महिने धरणातील पाणी नदीत सोडले जात असताना, पाटबंधारे विभाग वर्षाची आकारणी करतेे.

उत्तम कासोटे (अध्यक्ष, सांगरुळ धरण संस्था)