शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या रिक्षा व्यावसायिकांसमोर दुहेरी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘भाडेवाढ करावी तर प्रवासी पाठ फिरवणार’, ‘वाढ केली नाही तर रोजच्या उत्पन्नावर परिणाम’, असे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘भाडेवाढ करावी तर प्रवासी पाठ फिरवणार’, ‘वाढ केली नाही तर रोजच्या उत्पन्नावर परिणाम’, असे दुहेरी संकट कोल्हापुरातील रिक्षा व्यावसायिकांसमोर आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांना शासनाकडूनच थेट मदत मिळावी, अशी मागणीही जोर धरत आहे. मुंबईतील रिक्षा व्यावसायिकांना तीन रुपयांच्या भाडेवाढीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे कोल्हापुरातही रिक्षा व्यावसायिकांचा भाडेवाढीचा विषय चर्चेत आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर प्रचंड वाढले आहेत. याचा फटका रिक्षा व्यावसायिकांना बसत आहे. दरम्यान, कोरोनात लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय करता आला नाही. त्यांचे बँकेतील कर्जाचे हप्ते थकले असून फायनान्स कंपनीकडून वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. रिक्षा संघटनाकडून शासनाकडे आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, कोणताही निर्णय घेतलेला नाही. या सर्वांचा विचार करून मुंबईतील रिक्षा व्यावसायिकांना तीन रुपये भाडेवाढीला मंजुरी मिळाली आहे. कोल्हापुरातील रिक्षा व्यावसायिक नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र, दरवाढीबाबत फारसे कोणी उत्सुक दिसत नाही.

प्रतिक्रिया

भाडेवाढ मिळेल पण प्रवाशांचाही विचार करावा लागेल. अगोदरच कोरोनामुळे नागरिक आर्थिक संकटात आहेत. प्रवासीच आले नाही तर भाडेवाढ काय उपयोगाची आहे. यावर पर्याय म्हणजे रिक्षा व्यावसायिकाचा खर्च कमी करणे गरजेचा आहे. सीएनजीवर रिक्षा केल्यास खर्च कमी होणार आहे. यासाठी शासनाने सीएनजी पंप कोल्हापूर शहरात मोठ्या प्रमाणात सुरू करावेत.

सुभाष शेटे, अध्यक्ष, करवीर ॲटो रिक्षा युनियन

प्रतिक्रिया

वाढलेली महागाई, खर्च विचार करता भाडेवाढ करणे गरजेचे असले तरी व्यवहार्य नाही. रिक्षा व्यावसायिकांची स्थिती बिकट असली तरी कोरोनामुळे नागरिकही अडचणीत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या हितासाठी भाडेवाढ करणे सध्या तरी योग्य वाटत नाही.

मोहन बागडी, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा व्यावसायिक संघटना

प्रतिक्रिया

कोरोनामुळे अगोदरच प्रवासी संख्या कमी झाली असून रोज १५० रुपयांवर व्यवसाय होताना अडचणी येत आहेत. अशा स्थितीत भाडेवाढीमुळे फायद्यापेक्षा तोटाच होणार आहे. अडचणीत असलेल्या रिक्षा व्यावसायिकाला उभारी देण्यासाठी भाडेवाढ नको, तर शासनाने थेट अनुदान स्वरूपात मदत करावी.

राजू जाधव, जिल्हाप्रमुख महाराष्ट्र रिक्षाचालक सेना